शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

“सत्ताधाऱ्यांकडून बळीराजाची लूट, शेतकऱ्यांना टोपी घालण्यात नरेंद्र मोदी, शरद पवार एकसारखेच”

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 10:47 IST

गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी नेते राजू शेट्टी सातत्याने केंद्रातील मोदी सरकार (PM Modi) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत आहेत.

ठळक मुद्देकेंद्र आणि राज्य सरकार एकमेकांना बघून घेण्याची भाषा करतातशेतकऱ्यांची लूट करताना केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येतातशेतकऱ्यांनी काढलेले कर्ज का दिसत नाही? राजू शेट्टींचा सवाल

कोल्हापूर: गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी नेते राजू शेट्टी सातत्याने केंद्रातील मोदी सरकार (PM Modi) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत आहेत. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीवरून नाव कमी करण्यात आल्याच्या चर्चांनंतर राजू शेट्टी (Raju Shetti) आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. तसेच पूरात प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळत नसल्याबाबतही राजू शेट्टी ठाकरे सरकारवर निशाणा साधत आहेत. यातच आता शेतकऱ्यांना टोपी घालण्याच्या बाबतीत नरेंद्र मोदी, शरद पवार एकसारखेच असून, किंबहुना त्यांचे एकमत असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. 

केंद्र सरकारने एफआरपीचे तुकडे करण्याचा घाट घातला आहे. त्याला राज्य सरकारने संमती दिली आहे. एरव्ही केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांना बघून घेण्याची भाषा करतात. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करताना केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येतात, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. 

शेतकऱ्यांनी काढलेले कर्ज का दिसत नाही?

साखर कारखान्यांनी उसाच्या पोत्यावर काढलेले कर्ज दिसते मग ऊस पिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी काढलेले कर्ज का दिसत नाही? एरवी एकमेकांविरोधात बोलणाऱ्यांचे एफआरपीचे तुकडे करण्यावर एकमत कसे, असा सवाल करत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलो, तरी शेतकरी विरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्या विरोधात जाणाऱ्यांत आघाडीवर असेन, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना उसाची सगळी रक्कम एकाच टप्प्यात दिली पाहिजे, अशी भूमिका राजू शेट्टी यांची घेतली असून, याउलट शरद पवार यांनी मात्र उसाची रक्कम एका टप्प्यात न देता तीन टप्प्यात द्यावी, असे म्हटले आहे. साखर कारखानदार नाही. उसाला एक रकमी रक्कम द्या, असा एक शब्द निघाला आहे. तुमचे मत असेल तर त्यासाठी आग्रह धरेन. परंतु, ऊस गेला की रक्कम द्या, असे म्हणतात. ऊस घातला की साखर तयार झाली आणि ती विकली जाते असे होत नाही. कारखान्यात वर्षानुवर्षे साखर पडून राहते. गुजरातमध्ये पहिला, दुसरा, तिसरा हप्ता केल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला. एक रकमीमध्ये शेतकऱ्यांचे हित किती हे पाहिले पाहिजे, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारRaju Shettyराजू शेट्टी