शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

“सत्ताधाऱ्यांकडून बळीराजाची लूट, शेतकऱ्यांना टोपी घालण्यात नरेंद्र मोदी, शरद पवार एकसारखेच”

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 10:47 IST

गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी नेते राजू शेट्टी सातत्याने केंद्रातील मोदी सरकार (PM Modi) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत आहेत.

ठळक मुद्देकेंद्र आणि राज्य सरकार एकमेकांना बघून घेण्याची भाषा करतातशेतकऱ्यांची लूट करताना केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येतातशेतकऱ्यांनी काढलेले कर्ज का दिसत नाही? राजू शेट्टींचा सवाल

कोल्हापूर: गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी नेते राजू शेट्टी सातत्याने केंद्रातील मोदी सरकार (PM Modi) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत आहेत. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीवरून नाव कमी करण्यात आल्याच्या चर्चांनंतर राजू शेट्टी (Raju Shetti) आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. तसेच पूरात प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळत नसल्याबाबतही राजू शेट्टी ठाकरे सरकारवर निशाणा साधत आहेत. यातच आता शेतकऱ्यांना टोपी घालण्याच्या बाबतीत नरेंद्र मोदी, शरद पवार एकसारखेच असून, किंबहुना त्यांचे एकमत असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. 

केंद्र सरकारने एफआरपीचे तुकडे करण्याचा घाट घातला आहे. त्याला राज्य सरकारने संमती दिली आहे. एरव्ही केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांना बघून घेण्याची भाषा करतात. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करताना केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येतात, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. 

शेतकऱ्यांनी काढलेले कर्ज का दिसत नाही?

साखर कारखान्यांनी उसाच्या पोत्यावर काढलेले कर्ज दिसते मग ऊस पिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी काढलेले कर्ज का दिसत नाही? एरवी एकमेकांविरोधात बोलणाऱ्यांचे एफआरपीचे तुकडे करण्यावर एकमत कसे, असा सवाल करत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलो, तरी शेतकरी विरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्या विरोधात जाणाऱ्यांत आघाडीवर असेन, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना उसाची सगळी रक्कम एकाच टप्प्यात दिली पाहिजे, अशी भूमिका राजू शेट्टी यांची घेतली असून, याउलट शरद पवार यांनी मात्र उसाची रक्कम एका टप्प्यात न देता तीन टप्प्यात द्यावी, असे म्हटले आहे. साखर कारखानदार नाही. उसाला एक रकमी रक्कम द्या, असा एक शब्द निघाला आहे. तुमचे मत असेल तर त्यासाठी आग्रह धरेन. परंतु, ऊस गेला की रक्कम द्या, असे म्हणतात. ऊस घातला की साखर तयार झाली आणि ती विकली जाते असे होत नाही. कारखान्यात वर्षानुवर्षे साखर पडून राहते. गुजरातमध्ये पहिला, दुसरा, तिसरा हप्ता केल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला. एक रकमीमध्ये शेतकऱ्यांचे हित किती हे पाहिले पाहिजे, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारRaju Shettyराजू शेट्टी