शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

राजू नेर्लेकर यांनी ४० लाख दिल्याने वादावर पडदा; निमित्तसागर महाराज यांची माहिती

By विश्वास पाटील | Updated: December 24, 2023 09:10 IST

उपोषण मागे घेतल्याचे जाहीर

विश्वास पाटील

कोल्हापूर : हुपरी (ता.हातकणंगले ) येथे जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून राजेंद्र भीमराव नेर्लेकर यांनी निमित्तसागर महाराजांच्या श्रावकाकडून घेतलेले ४० लाख रुपये परत दिल्याने या प्रश्नी निर्माण झालेल्या वादावर शनिवारी पडदा पडला. निमित्तसागर महाराज, महावीर गाट, जैन समाजाचे प्रतिनिधी व राजेंद्र नेर्लेकर आदींची बैठक होऊन हा तोडगा काढण्यात आल्याची माहिती स्वत: निमित्तसागर महाराज व राजेंद्र नेर्लेकर यांनी दिली. यावेळी महावीर गाट, अजित पाटील, अमोल गाट आदी उपस्थित होते. हा निर्णय दोन्हीकडून मान्य करण्यात, तसेच रकमेबाबत काही समज-गैरसमज निर्माण झाले होते ते आता दूर झाल्याने आपले आंदोलन थांबवत असल्याचे निमित्तसागर महाराजांनी यावेळी सांगितले.

विविध प्रकारचे उद्योग उभारणी करून व विविध करन्सीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून राजेंद्र नेर्लेकर यांनी आपल्या श्रावकांना कोट्यवधी रुपयांना फसविले आहे, असा आरोप करीत निमित्तसागर महाराजांनी नेर्लेकर याच्या दारातच १८ डिसेंबरला उपोषण सुरू केले होते. श्रावकांची ही रक्कम परत न मिळाल्यास आपण पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा इशाराही महाराजांनी दिला होता. दक्षिण भारत जैन सभा व वीर सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी येऊन महाराजांचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला; पण महाराज आपल्या निर्णयावर ठाम राहिले. याप्रश्नी नेर्लेकर यांच्या घरातच बंद दाराआड गेल्या चार दिवसांपासून चर्चा सुरू होती. २० डिसेंबरला उपोषण स्थगित करताना चर्चेत काय ठरले याची माहिती नंतर जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यासाठी शनिवारी पत्रकार परिषद झाली.

विश्वासाला तडा..

हुपरीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या चांदीचे व्यवहार हे कोणत्याही प्रकारची लिखापढी न करता एकमेकांवरील विश्वासावर होत असतात. त्या विश्वासाला तुम्ही तडा देण्याचे काम करीत आहात. हे आता थांबवा असा सज्जड दम महावीर गाट यांनी नेर्लेकर याला यावेळी दिला. राजू नेर्लेकर म्हणाला, आतापर्यंत माझ्या हातून ज्या काय चुका झाल्या आहेत त्याबद्दल मला अद्दल घडली असल्याने यापुढे असा प्रकार माझ्या हातून घडणार नाही.३५० कोटी, २३ कोटी ते ४० लाख

उपोषण सुरू करताना नेर्लेकर यांच्याकडून तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती स्वत: निमित्तसागर महाराज यांनीच दिली होती. नंतरच्या बैठकीत बँकेच्या माध्यमातून झालेले व्यवहार २३ कोटी रुपयांचे असल्याचे सांगण्यात आले; परंतु प्रत्यक्षात तोडगा ४० लाखांवरच मिटला. त्यामुळे नक्की किती रकमेची फसवणूक झाली याबद्दलचा संभ्रम कायम राहिला. आपण तपस्वी आहात, साडेतीनशे कोटींचा व्यवहार झाल्याचे आपणच सांगितले होते आणि आता ४० लाखांवर तोडगा यातून काय अर्थ काढायचा, अशी विचारणा पत्रकारांनी केल्यावर महाराज गप्पच राहिले. इतरांनी मग समज-गैरसमजातून हे आकडे सांगितले गेल्याची सारवासारव केली.