शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

राजू नेर्लेकर यांनी ४० लाख दिल्याने वादावर पडदा; निमित्तसागर महाराज यांची माहिती

By विश्वास पाटील | Updated: December 24, 2023 09:10 IST

उपोषण मागे घेतल्याचे जाहीर

विश्वास पाटील

कोल्हापूर : हुपरी (ता.हातकणंगले ) येथे जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून राजेंद्र भीमराव नेर्लेकर यांनी निमित्तसागर महाराजांच्या श्रावकाकडून घेतलेले ४० लाख रुपये परत दिल्याने या प्रश्नी निर्माण झालेल्या वादावर शनिवारी पडदा पडला. निमित्तसागर महाराज, महावीर गाट, जैन समाजाचे प्रतिनिधी व राजेंद्र नेर्लेकर आदींची बैठक होऊन हा तोडगा काढण्यात आल्याची माहिती स्वत: निमित्तसागर महाराज व राजेंद्र नेर्लेकर यांनी दिली. यावेळी महावीर गाट, अजित पाटील, अमोल गाट आदी उपस्थित होते. हा निर्णय दोन्हीकडून मान्य करण्यात, तसेच रकमेबाबत काही समज-गैरसमज निर्माण झाले होते ते आता दूर झाल्याने आपले आंदोलन थांबवत असल्याचे निमित्तसागर महाराजांनी यावेळी सांगितले.

विविध प्रकारचे उद्योग उभारणी करून व विविध करन्सीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून राजेंद्र नेर्लेकर यांनी आपल्या श्रावकांना कोट्यवधी रुपयांना फसविले आहे, असा आरोप करीत निमित्तसागर महाराजांनी नेर्लेकर याच्या दारातच १८ डिसेंबरला उपोषण सुरू केले होते. श्रावकांची ही रक्कम परत न मिळाल्यास आपण पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा इशाराही महाराजांनी दिला होता. दक्षिण भारत जैन सभा व वीर सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी येऊन महाराजांचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला; पण महाराज आपल्या निर्णयावर ठाम राहिले. याप्रश्नी नेर्लेकर यांच्या घरातच बंद दाराआड गेल्या चार दिवसांपासून चर्चा सुरू होती. २० डिसेंबरला उपोषण स्थगित करताना चर्चेत काय ठरले याची माहिती नंतर जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यासाठी शनिवारी पत्रकार परिषद झाली.

विश्वासाला तडा..

हुपरीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या चांदीचे व्यवहार हे कोणत्याही प्रकारची लिखापढी न करता एकमेकांवरील विश्वासावर होत असतात. त्या विश्वासाला तुम्ही तडा देण्याचे काम करीत आहात. हे आता थांबवा असा सज्जड दम महावीर गाट यांनी नेर्लेकर याला यावेळी दिला. राजू नेर्लेकर म्हणाला, आतापर्यंत माझ्या हातून ज्या काय चुका झाल्या आहेत त्याबद्दल मला अद्दल घडली असल्याने यापुढे असा प्रकार माझ्या हातून घडणार नाही.३५० कोटी, २३ कोटी ते ४० लाख

उपोषण सुरू करताना नेर्लेकर यांच्याकडून तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती स्वत: निमित्तसागर महाराज यांनीच दिली होती. नंतरच्या बैठकीत बँकेच्या माध्यमातून झालेले व्यवहार २३ कोटी रुपयांचे असल्याचे सांगण्यात आले; परंतु प्रत्यक्षात तोडगा ४० लाखांवरच मिटला. त्यामुळे नक्की किती रकमेची फसवणूक झाली याबद्दलचा संभ्रम कायम राहिला. आपण तपस्वी आहात, साडेतीनशे कोटींचा व्यवहार झाल्याचे आपणच सांगितले होते आणि आता ४० लाखांवर तोडगा यातून काय अर्थ काढायचा, अशी विचारणा पत्रकारांनी केल्यावर महाराज गप्पच राहिले. इतरांनी मग समज-गैरसमजातून हे आकडे सांगितले गेल्याची सारवासारव केली.