शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘कुंभी’च्या राजकारणात राजर्षी शाहू आघाडी अभेद्य राहणार?

By admin | Updated: June 12, 2015 00:31 IST

साखर कारखान्याचे राजकारण : यशवंत मंच, बचाव मंचची सवतासुभ्याची तयारी

मच्छिंद्र मगदूम - सांगरूळ -कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणात गेली अनेक वर्षे विरोधी गटाची महत्त्वाची भूमिका बजावणारी राजर्षी शाहू आघाडी यावेळी अभेद्य राहणार ? यशवंत मंच व कुंभी बचाव मंच सवतासुभा मांडण्याचा हालचाली गतिमान झाल्याने निवडणूक दुरंगी की तिरंगी याविषयी ‘कुंभी’ परिसरात उत्सुकता लागली आहे. -कुंभी कासारीचा निवडणुकीचा आखाडा आतापर्यंत तुल्यबळ लढतीमुळे गाजला आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय डी. सी. नरके यांनी पाच वर्षांचा अपवाद वगळता कारखान्याच्या स्थापनेपासून कारखान्यावर पकड कायम ठेवली. स्वर्गीय श्रीपतराव बोदं्रे, मारुतराव खाडे, पा. वि. पाटील, नी. आर. देसाई या दिग्गज नेत्यांना त्यांनी टक्कर दिली. डी. सी. नरके यांच्यानंतर त्यांचे विरोधक अधिक आक्रमक झाले. त्यात आमदार चंद्रदीप नरके ‘कुंभी’ च्या राजकरणात नवनवे असल्याने त्याचा फायदा उठवत राजर्षी शाहू आघाडी सत्तांतर घडविले; पण सभासदांना दिलेले आश्वासन त्यांना पाळता आले नसल्याने त्यानंतर सलग दोन निवडणुका आमदार नरके यांनी एकतर्फी जिकल्या. प्रत्येक निवडणुकीत नरके यांना शाहू आघाडीचा माध्यमातून विरोधकांनी कडवे आव्हान दिले; पण गेल्१ँ दीड वर्षांपासून ‘गोकुळ’ चे संचालक बाळासाहेब खाडे यांचे बंधू बाजीराव खाडे यांनी ‘कुंभी’ बचाव मंचची स्थापना करून स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कुंभी च्या कारभारावर विविध मार्गाने टीकेचा झोड उठवून त्यांनी परिसरात वातावरण चांगले तयार केले. आंदोलनापुरती त्यांची भूमिका ठीक होती. ‘बचाव मंच’ चे काम करत असताना त्यांनी कुभीच्या निवडणुकीची तयारी सुरू केली. मंच अंतर्गत सभासदाची नोंदणी करून त्यांनी स्वत:च्या नेतृत्वाखाली निवडणूक कार्य केले आहे. सभासदांना विश्वासात घेतले नसल्याचा तक्रारी आहेत. यशवंत बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड़ प्रकाश देसाई यांनीही यशवंत मंचच्या माध्यमातून जुन्या जानकार लोकांना बरोबर घेऊन निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यांनी उमेदवारांची चाचपणी करत सावध हालचाली सरू केल्या आहेत. खाडे हे तरुण व नवनवे आहेत. पण, त्यांच्या नेतृत्वाखाली शाहू आघाडीचे ज्येष्ठ नेते काम करतील का? हा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करू लागले आहेत. दोन्ही मंचची तयारी पाहिली, तर तिरंगी लढतीचे चित्र दिसते. तिरंगी लढत झाली, तर निवडणुकीचे काय चित्र असेल, हे समजण्यासाठी निकालाची वाट पाहावी लागणार नाही. हे मात्र निश्चित आहे.चंद्रदीप नरकेंची सावध भूमिकाविरोधकांमध्ये दोन मतप्रवाह झाल्याने ‘कुंभी’ ची निवडणूक आमदार नरके यांच्यासाठी तशी अवघड दिसत नाही. विरोधक एकसंघ असताना त्यांनी एकहाती सत्ता हस्तगत केल्या आहेत, तरीही त्यांनी सावध भूमिका घेतली आहेत. मनोमिलनासाठी ‘पी. एन’ यांची कसोटी अ‍ॅड़ प्रकाश देसाई व बाजीराव खाडे हे दोेघेही पी. एन. पाटील यांचे नेतृत्व मानतात. त्यामुळे दोघांनी आता कितीही सवतासुभ्याची तयारी केली असली, तरी शेवटच्याक्षणी पाटील एकत्रित मोट बांधतील त्यासाठी त्यांना कसरत करावी लागणार, हे नक्की आहे.