शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

‘कुंभी’च्या राजकारणात राजर्षी शाहू आघाडी अभेद्य राहणार?

By admin | Updated: June 12, 2015 00:31 IST

साखर कारखान्याचे राजकारण : यशवंत मंच, बचाव मंचची सवतासुभ्याची तयारी

मच्छिंद्र मगदूम - सांगरूळ -कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणात गेली अनेक वर्षे विरोधी गटाची महत्त्वाची भूमिका बजावणारी राजर्षी शाहू आघाडी यावेळी अभेद्य राहणार ? यशवंत मंच व कुंभी बचाव मंच सवतासुभा मांडण्याचा हालचाली गतिमान झाल्याने निवडणूक दुरंगी की तिरंगी याविषयी ‘कुंभी’ परिसरात उत्सुकता लागली आहे. -कुंभी कासारीचा निवडणुकीचा आखाडा आतापर्यंत तुल्यबळ लढतीमुळे गाजला आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय डी. सी. नरके यांनी पाच वर्षांचा अपवाद वगळता कारखान्याच्या स्थापनेपासून कारखान्यावर पकड कायम ठेवली. स्वर्गीय श्रीपतराव बोदं्रे, मारुतराव खाडे, पा. वि. पाटील, नी. आर. देसाई या दिग्गज नेत्यांना त्यांनी टक्कर दिली. डी. सी. नरके यांच्यानंतर त्यांचे विरोधक अधिक आक्रमक झाले. त्यात आमदार चंद्रदीप नरके ‘कुंभी’ च्या राजकरणात नवनवे असल्याने त्याचा फायदा उठवत राजर्षी शाहू आघाडी सत्तांतर घडविले; पण सभासदांना दिलेले आश्वासन त्यांना पाळता आले नसल्याने त्यानंतर सलग दोन निवडणुका आमदार नरके यांनी एकतर्फी जिकल्या. प्रत्येक निवडणुकीत नरके यांना शाहू आघाडीचा माध्यमातून विरोधकांनी कडवे आव्हान दिले; पण गेल्१ँ दीड वर्षांपासून ‘गोकुळ’ चे संचालक बाळासाहेब खाडे यांचे बंधू बाजीराव खाडे यांनी ‘कुंभी’ बचाव मंचची स्थापना करून स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कुंभी च्या कारभारावर विविध मार्गाने टीकेचा झोड उठवून त्यांनी परिसरात वातावरण चांगले तयार केले. आंदोलनापुरती त्यांची भूमिका ठीक होती. ‘बचाव मंच’ चे काम करत असताना त्यांनी कुभीच्या निवडणुकीची तयारी सुरू केली. मंच अंतर्गत सभासदाची नोंदणी करून त्यांनी स्वत:च्या नेतृत्वाखाली निवडणूक कार्य केले आहे. सभासदांना विश्वासात घेतले नसल्याचा तक्रारी आहेत. यशवंत बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड़ प्रकाश देसाई यांनीही यशवंत मंचच्या माध्यमातून जुन्या जानकार लोकांना बरोबर घेऊन निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यांनी उमेदवारांची चाचपणी करत सावध हालचाली सरू केल्या आहेत. खाडे हे तरुण व नवनवे आहेत. पण, त्यांच्या नेतृत्वाखाली शाहू आघाडीचे ज्येष्ठ नेते काम करतील का? हा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करू लागले आहेत. दोन्ही मंचची तयारी पाहिली, तर तिरंगी लढतीचे चित्र दिसते. तिरंगी लढत झाली, तर निवडणुकीचे काय चित्र असेल, हे समजण्यासाठी निकालाची वाट पाहावी लागणार नाही. हे मात्र निश्चित आहे.चंद्रदीप नरकेंची सावध भूमिकाविरोधकांमध्ये दोन मतप्रवाह झाल्याने ‘कुंभी’ ची निवडणूक आमदार नरके यांच्यासाठी तशी अवघड दिसत नाही. विरोधक एकसंघ असताना त्यांनी एकहाती सत्ता हस्तगत केल्या आहेत, तरीही त्यांनी सावध भूमिका घेतली आहेत. मनोमिलनासाठी ‘पी. एन’ यांची कसोटी अ‍ॅड़ प्रकाश देसाई व बाजीराव खाडे हे दोेघेही पी. एन. पाटील यांचे नेतृत्व मानतात. त्यामुळे दोघांनी आता कितीही सवतासुभ्याची तयारी केली असली, तरी शेवटच्याक्षणी पाटील एकत्रित मोट बांधतील त्यासाठी त्यांना कसरत करावी लागणार, हे नक्की आहे.