शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
3
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
4
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

जिल्ह्यात राजर्षी शाहू अभियान कागदावरच

By admin | Updated: October 6, 2015 23:46 IST

हातातले झाडू कोपऱ्यात : स्वच्छतेचे सातत्य कायम राखण्याच्या मुख्य हेतूलाच हरताळ

एम. ए. शिंदे -हलकर्णी -स्वच्छ भारत अभियानाला राष्ट्रपिता म. गांधी यांच्या जयंतीदिनी एक वर्ष पूर्ण झाले. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या पुढाऱ्यांनी हातात झाडू घेऊन साफसफाई केली. काळाच्या ओघात हातातले झाडू कोपऱ्यात विसावले. या अभियानाला कायम राखण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेने राजर्षी शाहू ग्राम स्वच्छता अभियान स्वातंत्र्यदिनी हाती घेतले. सध्या राजर्षी शाहू ग्राम स्वच्छता अभियान कागदावरच आहे, अशी स्थिती गावागावांत आहे.श्रमदानातून गावे स्वच्छ व्हावीत, ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे, वैयक्तिक शौचालयांची संख्या वाढावी, पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण व्हावे, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन सुविधा उपलब्ध व्हावी, शाळा, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेची सवय लागावी, हे उदात्त उद्देश नजरेसमोर ठेवून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, उपाध्यक्ष शशिकांत खोत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी राजर्षी शाहू स्वच्छता अभियानाची घोषणा केली.अभियानाचा कालावधी १५ आॅगस्ट ते ३१ मार्च २०१६ असा जाहीर करतानाच जिल्हा परिषद मतदारसंघ, तालुकास्तर, जिल्हास्तर अशा बंपर बक्षिसांची घोषणा केली. आतापर्यंत दोन ग्रामसभा झाल्याच्या कागदोपत्री नोंदी झाल्या. मात्र, स्वच्छता अभियान कुठेच चालू नाही. श्रमदानातून स्वच्छता करताना ग्रामस्थ कोठे दिसतच नाहीत. आजही अनेक गावांतून गावकरी उघड्यावर शौचाला जाताना दिसतात. त्यांच्यासाठी शौचालये बांधण्याची मानसिकता कधी होणार हाच खरा प्रश्न आहे. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामस्थ मिळेल तेथून पाणी आणून पित आहेत. पाण्याचे स्त्रोतच आटले आहे, तर त्यांचे बळकटीकरण कसे होणार. सांडपाणी व्यस्थापनाची तर बिकट अवस्था आहे. जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतींना अनुक्रमे पाच लाख, तीन लाख, दोन लाख अशीे बक्षिसे दिलेी जाणार आहेत. ३० लाखांच्या बक्षिसांच्या रकमेची तरतूद जिल्हा परिषदेच्या स्व:निधीतून केली जाणार आहे.सध्या हे अभियान ठप्प अवस्थेत आहे. कालावधी जसा अंतिम टप्यात येईल तशी गावपातळीवरील पुढाऱ्यांना अभियानाची जाग येईल, उपक्रम राबविले जातील, फोटो सेशन होईल, प्रसिद्धी दिली जाईल, अल्बम तयार होतील आणि परीक्षकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न होईल. मात्र, अभियानात संपूर्ण कालावधीत सातत्य राहणार नाही. भपकेबाज कार्यक्रम होतील. बक्षिसांची लयलूट होईल. जिल्हा परिषदेच्या स्व:निधीतून ३० लाख खर्ची पडतील. मात्र, स्वच्छतेचे सातत्य कायम राखण्याच्या मुख्य हेतूलाच हरताळ फासला जाईल. प्रत्येक ग्रामस्थ स्व:मनाने स्वच्छतेचे महत्त्व बिंबवून घेऊन स्वत:पासूनच स्वच्छतेला प्रारंभ करेल, तो दिवस गावच्या भाग्यात ‘सुदिन’ असेल.जिल्हा आणि तालुका पातळीवर बक्षिसेजिल्हा परिषदेच्या ६९ मतदारसंघांतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांच्या ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५०००, ३०००, २००० रुपये व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तालुकास्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीस ५० हजार, द्वितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतीस २५ हजार, तर तृतीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतीस दहा हजार रुपये व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.