शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

राजेश क्षीरसागर यांची आमदारकी रद्द करा

By admin | Updated: December 4, 2014 00:56 IST

सत्यजित कदम यांची याचिका : निवडणूक प्रतिज्ञापत्रात १५ गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा आरोप

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आमदार राजेश क्षीरसागर यांनी निवडणूक विभागास सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दाखल गुन्हे व त्यांचा तपशील याची पूर्ण माहिती दिलेली नाही. पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे व प्रतिज्ञापत्राद्वारे दिलेली माहिती यांमध्ये मोठी तफावत आहे. क्षीरसागर यांनी १५ गुन्ह्यांची माहिती लपविली आहे. त्यामुळे क्षीरसागर यांची निवड रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी कॉँग्रेसचे पराभूत उमेदवार व नगरसेवक सत्यजित कदम यांनी आज, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे (याचिका क्रमांक २३/२०१४) केली. कदम यांनी लेखी निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. याबाबत क्षीरसागर यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता, उद्या, गुरुवारी सविस्तर स्पष्टीकरण करू, असे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीदरम्यान क्षीरसागर यांनी २० सप्टेंबर २०१४ रोजी निवडणूक आयोगास दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन वर्षे किंवा अधिक कालावधीच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध किंवा दोषारोप नसल्याचे म्हटले आहे. न्यायालयाचे नाव असलेले किंवा दखल घेतलेले २० गुन्हे शहर व जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात नोंद आहेत; तर विविध आंदोलने, मोर्चा, रास्ता रोको, आदी स्वरूपांचे इतर आणखी २० गुन्हे पोलिसांत नोंद असल्याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे क्षीरसागर यांनी दिली आहे. मात्र, याव्यतिरिक्त क्षीरसागर यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात (गुन्हा रजिस्टर नंबर ४६/२०१३, १५/२००४) लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे (४२/२००६, १०/२००९, १२४/२०१०, ९४/२०११, १५१/२०११, ३६/२०१२, १०/२००३, २/ २०१४), शाहूपुरी पोलीस ठाण्यात (१२/२००४, ९६/२०१३, १२०/२०१३, १०३/२०१२, ३६१/२००८) आदी १५ गुन्ह्णांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली नसल्याचे कदम यांनी न्यायालयात सादर केलेल्या याचिकेत म्हटले आहे. क्षीरसागर यांनी गुन्ह्णाची अपुरी माहिती दिल्याने त्यांची निवड रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी कदम यांनी न्यायालयाकडे केली आहे. पक्षांतर्गत विरोधकांना आयते कोलीत राजेश क्षीरसागर व सत्यजित कदम यांच्यात चुरशीची लढत झाली. निवडणुकीनंतर दोघांत शहरातील रस्त्यांच्या उद्घाटन समारंभावरून संघर्ष सुरू झाला. यामध्ये महापालिका आयुक्तांनी हस्तक्षेप करीत राजशिष्टाचाराप्रमाणेच रस्त्यांची उद्घाटने होतील, असे स्पष्टीकरण केले; परंतु हा वाद तेथेच न थांबता आता उच्च न्यायालयापर्यंत गेला आहे. गेले दोन दिवस क्षीरसागर यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर कदम यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्याने खळबळ उडाली. कदम यांच्या याचिकेमुळे क्षीरसागर यांच्या मंत्रिमंडळातील सहभागास अडचणी निर्माण होऊ शकतात. याचिकेमुळे पक्षांतर्गत विरोधकांनाही आयते भांडवल मिळणार आहे.(प्रतिनिधी)