शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

राजेश क्षीरसागर यांची आमदारकी रद्द करा

By admin | Updated: December 4, 2014 00:56 IST

सत्यजित कदम यांची याचिका : निवडणूक प्रतिज्ञापत्रात १५ गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा आरोप

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आमदार राजेश क्षीरसागर यांनी निवडणूक विभागास सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दाखल गुन्हे व त्यांचा तपशील याची पूर्ण माहिती दिलेली नाही. पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे व प्रतिज्ञापत्राद्वारे दिलेली माहिती यांमध्ये मोठी तफावत आहे. क्षीरसागर यांनी १५ गुन्ह्यांची माहिती लपविली आहे. त्यामुळे क्षीरसागर यांची निवड रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी कॉँग्रेसचे पराभूत उमेदवार व नगरसेवक सत्यजित कदम यांनी आज, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे (याचिका क्रमांक २३/२०१४) केली. कदम यांनी लेखी निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. याबाबत क्षीरसागर यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता, उद्या, गुरुवारी सविस्तर स्पष्टीकरण करू, असे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीदरम्यान क्षीरसागर यांनी २० सप्टेंबर २०१४ रोजी निवडणूक आयोगास दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन वर्षे किंवा अधिक कालावधीच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध किंवा दोषारोप नसल्याचे म्हटले आहे. न्यायालयाचे नाव असलेले किंवा दखल घेतलेले २० गुन्हे शहर व जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात नोंद आहेत; तर विविध आंदोलने, मोर्चा, रास्ता रोको, आदी स्वरूपांचे इतर आणखी २० गुन्हे पोलिसांत नोंद असल्याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे क्षीरसागर यांनी दिली आहे. मात्र, याव्यतिरिक्त क्षीरसागर यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात (गुन्हा रजिस्टर नंबर ४६/२०१३, १५/२००४) लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे (४२/२००६, १०/२००९, १२४/२०१०, ९४/२०११, १५१/२०११, ३६/२०१२, १०/२००३, २/ २०१४), शाहूपुरी पोलीस ठाण्यात (१२/२००४, ९६/२०१३, १२०/२०१३, १०३/२०१२, ३६१/२००८) आदी १५ गुन्ह्णांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली नसल्याचे कदम यांनी न्यायालयात सादर केलेल्या याचिकेत म्हटले आहे. क्षीरसागर यांनी गुन्ह्णाची अपुरी माहिती दिल्याने त्यांची निवड रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी कदम यांनी न्यायालयाकडे केली आहे. पक्षांतर्गत विरोधकांना आयते कोलीत राजेश क्षीरसागर व सत्यजित कदम यांच्यात चुरशीची लढत झाली. निवडणुकीनंतर दोघांत शहरातील रस्त्यांच्या उद्घाटन समारंभावरून संघर्ष सुरू झाला. यामध्ये महापालिका आयुक्तांनी हस्तक्षेप करीत राजशिष्टाचाराप्रमाणेच रस्त्यांची उद्घाटने होतील, असे स्पष्टीकरण केले; परंतु हा वाद तेथेच न थांबता आता उच्च न्यायालयापर्यंत गेला आहे. गेले दोन दिवस क्षीरसागर यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर कदम यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्याने खळबळ उडाली. कदम यांच्या याचिकेमुळे क्षीरसागर यांच्या मंत्रिमंडळातील सहभागास अडचणी निर्माण होऊ शकतात. याचिकेमुळे पक्षांतर्गत विरोधकांनाही आयते भांडवल मिळणार आहे.(प्रतिनिधी)