शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

राजर्षी शाहूंचे विचार जयसिंगपूरकरांनी जोपासले

By admin | Updated: September 22, 2016 00:44 IST

शाहू महाराज : जयसिंगपूर येथे शताब्दी वर्षारंभ दिमाखात सुरू; विविध रंगारंग कार्यक्रम उत्साहात

जयसिंगपूर : जयसिंगपूर शहराचा शताब्दी प्रारंभ दिवस हा ऐतिहासिक असून, या शहराने राजर्षी शाहू महाराजांच्या आदर्श विचारांची परंपरा कायम जोपासली आहे. शहराची औद्योगिक व विकासात्मक दृष्टी पाहता ज्या दूरदृष्टीने शाहू महाराजांनी हे शहर वसविले ते शाहू महाराजांचे स्वप्न सत्यात उतरले. या शहराचा मला अभिमान वाटतो, असे प्रतिपादन श्रीमंत शाहू महाराज यांनी केले. येथील पालिकेच्या खुल्या नाट्यगृहात जयसिंगपूर शहराच्या शताब्दी वर्षारंभ समारंभात अध्यक्षस्थानावरून श्रीमंत शाहू महाराज बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजू शेट्टी, जिल्हाधिकारी अमित सैनी, शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार सुरेश हाळवणकर उपस्थित होते. यावेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून समारंभास प्रारंभ झाला. श्रीमंत शाहू महाराज पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी चळवळीचा आहे. जयसिंगपूर शहरातील वाढती लोकसंख्या व अन्य परिसरातील गावांचा विचार करता हद्दवाढ करताना शहरवासीयांनी नेमका निर्णय घ्यावा. एकजुटीने व एकदिलाने एकत्र येऊन हा महोत्सव साजरा करणाऱ्या जयसिंगपूरवासीयांचे कौतुक वाटते, असे सांगून त्यांनी शताब्दी वर्षपूर्ती प्रसंगी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देऊन कार्यक्रमही आयोजित करण्याबाबत पुढाकार घेऊ, असे सांगितले. खासदार राजू शेट्टी म्हणाले, जयसिंगपूर शहराला मोठा इतिहास आहे. शताब्दीच्या निमित्ताने सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र आले आहेत. अशाच पद्धतीने शताब्दी महोत्सवाचा समारोपही व्हावा. शाहू महाराज यांनी बांधलेल्या राधानगरी धरणाचा आदर्श घेऊन जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची निर्मिती झाली. त्यामुळे शेती व शेतकऱ्यांना हे वरदान ठरले आहे. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार उल्हास पाटील यांची पत्नी उज्ज्वला पाटील, शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मनोगते व्यक्त केली. प्रारंभी स्वागत नगराध्यक्ष रेखा राजीव देशमुख यांनी केले. प्रास्ताविक भाषणात पक्षप्रतोद संजय पाटील-यड्रावकर यांनी, गेल्या पंधरा वर्षांतील विकासात्मक वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी श्री दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार किरण काकडे, मुख्याधिकारी हेमंत निकम, सुरेशदादा पाटील, सावकर मादनाईक, अशोकराव कोळेकर, अमरसिंह निकम, अ‍ॅड. संभाजीराजे नाईक, सतीश मलमे, सुरज भोसले, मिलिंद भिडे, विठ्ठल पाटील, शंकर बिराजदार, शैलेश आडके, रमेश शिंदे, श्रीपती सावंत, सुनील शेळके, अमरदीप कांबळे, भगवंत जांभळे, पराग पाटील, मिलिंद शिंदे, सुभाष भोजणे, डॉ. अतिक पटेल, प्रकाश झेले, दादा पाटील-चिंचवाडकर, नंदू बलदवा, धनाजीराव देसाई, संभाजी मोरे, शिवाजी कुंभार, राजेंद्र नांद्रेकर, राजू झेले, डॉ. महावीर अक्कोळे, स्वरुपा पाटील-यड्रावकर, उपनगराध्यक्ष स्वाती पडूळकर, अनुराधा आडके, स्नेहा शिंदे, राजश्री जाधव, अलका खाडे, राणी धनवडे, आदी उपस्थित होते. प्राजक्ता पाटील आणि बबन यादव यांनी सूत्रसंचालन केले. अन् हशा पिकला या समारंभात एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने अचानक माईकचा ताबा घेऊन सातवा वेतन कधी मिळणार याचे मान्यवरांनी उत्तर द्यावे, असे विचारले. त्यावर जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी मीसुद्धा सातव्या वेतनाची वाट पाहत आहे, असे म्हणताच उपस्थितात हशा पिकला. झोपडपट्टीप्रश्नी लक्ष घालू शहराच्या हद्दवाढीबाबत पालिकेने दिलेल्या प्रस्तावावार ताबडतोब विचार करून निर्णय घेतला जाईल. तसेच या शिरोळ तालुक्यात जे काही कार्यक्रम होतात ते वर्षभर चालणारे असतात, राज्यात हा एकमेव तालुका असेल असे सांगून जिल्हाधिकारी सैनी यांनी झोपडपट्टी नियमित करण्याबाबत आपण पालिका प्रशासनास सहकार्य करू, असे त्यांनी सांगितले.