शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

समता रॅलीतून उलगडला राजर्षींचा जीवनपट

By admin | Updated: June 27, 2017 01:10 IST

सामाजिक न्याय विभागातर्फे आयोजन : विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; प्रबोधनपर फलकांनी वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क---कोल्हापूर : ‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय...’ असा अखंड जयघोष... आकर्षक चित्ररथांतून उलगडलेला राजर्षी शाहूंचा जीवनपट... प्रबोधनपर फलक... झांजपथकांचा दणदणाट.... लेझीम पथकांचा कलाविष्कार... असे उत्साही वातावरण सोमवारी सकाळी पाहावयास मिळाले. निमित्त होते, राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे आयोजित समता रॅलीचे. यावेळी शाहूंच्या जयजयकाराने दसरा चौक दुमदुमला.सकाळी साडेआठच्या सुमारास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शाहू छत्रपती, महापौर हसिना फरास, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार सतेज पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, आदी प्रमुख उपस्थित होते.यानंतर समता रॅलीला सुरुवात झाली. यामध्ये शाहू महाराजांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राजर्षी शाहूंचा जीवनपट शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्ररथातून उलगडण्यात आला. विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाच्या कलाविष्काराने अंगावर रोमांच उभे राहत होते. ही रॅली व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी चौक, महापालिका, सीपीआर मार्गे दसरा चौक येथे येऊन रॅलीचा समारोप झाला.स्थायी समितीचे सभापती डॉ. संदीप नेजदार, माजी महापौर आर. के. पोवार, नगरसेवक अशोक जाधव, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, माजी नगरसेवक राजू लाटकर, शाहीर दिलीप सावंत, कादर मलबारी, राजदीप सुर्वे, महादेव पाटील, आर. डी. पाटील यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, आदि मान्यवर या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.‘विद्यापीठ’चे लक्षवेधी प्रबोधनपर फलकया रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यापीठ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या हातातील ‘जाणता राजा शाहू’, ‘समतावादी लोकराजा राजर्षी शाहू’, ‘राजर्षी शाहूंचा उपक्रम, प्राथमिक शिक्षणाला अग्रक्रम’ असे प्रबोधनपर फलक सर्वांचे लक्ष वेधत होते.‘महाराष्ट्र’च्या लेझीम पथकाचा आविष्कारसमता रॅलीमध्ये महाराष्ट्र हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने उत्कृष्ट कलाविष्कार सादर करीत उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले.