शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

राजर्षी शाहूंमुळेच घडले ‘बहुजनपर्व’

By admin | Updated: December 4, 2014 00:50 IST

रावसाहेब शिंदे : प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या ग्रंथाचे प्रकाशन

 कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांनी राजेपद भोगण्यापेक्षा मला काहीतरी सर्वधर्मिय गरीब जनतेसाठी केले पाहिजे. या क्रांतिकारक भूमिकेतून संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी वसतिगृहे निर्माण केली. त्यांच्या देण्याच्या दैवतपणामुळेआजच्या काळातही ‘बहुजनपर्व’सारख्या ग्रंथांची निर्मिती होते, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शिंदे यांनी काढले. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्यावतीने आयोजित ‘बहुजनपर्व’ या संस्थेच्या ९० वर्षांच्या वाटचालीच्या ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज होते. शिंदे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी त्याकाळी केवळ आपण राजे नसून जनतेचे काहीतरी देणे लागतो. आपल्या राजेपदापेक्षा मुक्ती महत्त्वाची आहे. स्वत:च्या राजे किंवा गादीच्या मोहात न रमता अनेक सामाजिक विचार, संस्कार आणि स्वत:हून कोल्हापुरात २३ वसतिगृहे त्याकाळी निर्माण केली. त्यांच्याप्रती आजही आपल्यासारख्या माणसांच्या शरीराच्या कातड्याचे जोडे करून त्यांना वाहिले तरी त्यांचे ऋण संपणार नाही. यावेळी त्यांनी प्रिन्स शिवाजी बोर्डिंगमधील वसतिगृहात राहताना ‘नाट्यसृष्टीची शंभर वर्षे ’ हा निबंध लिहून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविल्याचा किस्साही सांगितला. त्यासह ज्यांनी माझे पालकत्व घेतले, त्या राजाराम महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य व शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांच्याबद्दलची आठवणही सांगितली. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल कौतुक केले. प्रा. सी. एम. गायकवाड यांनी प्रास्ताविक, तर कार्यकारिणी सदस्य ए. जी. वणिरे यांनी ग्रंथाबद्दल माहिती दिली. यावेळी माजी कुलगुरु रा. कृ. कणबरकर, संस्थाध्यक्ष एस. आर. चरापले, चेअरमन डी. बी.पाटील, शशिकला शिंदे, ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे, ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, आर.डी.आतकिरे, प्राचार्य एन.व्ही.नलवडे, आर. डी. पाटील आदी उपस्थित होते.