शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

‘राजाराम’चे वीज, पाणी तोडा

By admin | Updated: April 19, 2015 01:15 IST

पंचगंगा प्रदूषणप्रश्नी कारवाई : इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्स युनिटनाही बंदचे आदेश

 कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी कसबा बावड्यातील राजाराम सहकारी साखर कारखान्याचे उत्पादन बंद करून वीज, पाणी कनेक्शन तोडावे, असा आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य डॉ. पी. अनबालगन यांनी शनिवारी काढला. यासह इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्सवरही अशीच कारवाई करावी, असाही आदेश आहे. विभागीय महसूल आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून विचारणा केल्यानंतर हा कारवाईचा आदेश झाला. राजाराम कारखान्याच्या मतदानाच्या पूर्वसंध्येलाच कारवाईचा आदेश आल्यामुळे खळबळ उडाली. प्रदूषणप्रश्नी येथील महानगरपालिका आणि इचलकरंजी नगरपालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शिये (ता. करवीर) हद्दीत ५ एप्रिलला पंचगंगा नदीत मोठ्या प्रमाणात मासे मृत झाले. उच्च न्यायालयात पंचगंगा प्रदूषणप्रश्नी २३ एप्रिलला सुनावणी होणार आहे. त्यातच मासे मृत झाल्याने प्रदूषण नियंत्रणमंडळ प्रशासनाने गंभीर दखल घेतली. सामाजिक कार्यकर्ते व प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांच्या तक्रारीवरून मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके, उपप्रादेशिक अधिकारी मनीष होळकर, नायब तहसीलदार एम. ए. शिंदे, मत्स्य विभागाचे प्रतिनिधी एच. एस. जाधव, महापालिके च्या प्रतिनिधी तेजस्विनी माळी, राजाराम कारखान्याचे प्रतिनिधी नंदकुमार जाधव यांनी राजाराम बंधारा ते शियेपर्यंत नदीपात्राची पाहणी करून पंचनामा केला होता. राजाराम कारखान्याच्या पश्चिमेच्या बाजूस सुमारे पाचशे मीटरच्या अंतरावर असणाऱ्या उंबरमळी या भागात शेतालगत भूमिगत पाईपलाईनद्वारे सांडपाणी नदीत मिसळत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. तेथील दूषित पाण्याचे नमुने घेतले. जलप्रदूषण कायदा १९७४ व हवा प्रदूषण कायदा १९८१ तसेच दूषित पाणी विल्हेवाट अधिनियम २००८ नुसार कारवाईची नोटीस राजाराम कारखाना व्यवस्थापनास बजावली होती. त्याचवेळी बँक हमीची जप्तीही केली होती. दरम्यान, साखर कारखाना व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांच्यात सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. कारखान्याचा हंगाम ३० मार्चला संपला आहे. वजनदार राजकीय वरदहस्त असलेल्या या कारखान्याला ‘प्रदूषण’ने दणका दिला. इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्सवरही जलस्रोत व अप्रत्यक्षपणे पंचगंगा नदी प्रदूषणास कारणीभूत ठरल्याप्रकरणीच कारवाईचा आदेश झाला आहे.