शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘राजाराम’ची पाच लाखांची बँक गॅरंटी जप्त

By admin | Updated: April 8, 2015 00:33 IST

मासे कुजले : इचलकरंजीसह नदीकाठच्या गावांना धोका करवीरच्या तहसीलदारांचे कानावर हात

कोल्हापूर : राजाराम साखर कारखान्याने १ एप्रिल २०१५ला भरलेली पाच लाखांची बँक गॅरंटी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शुक्रवारी (दि.४) जप्त केली. कारवाईनंतर चोवीस तासांतच कारखान्याने मळीमिश्रीत पाणी नदीत सोडले. बॅँक गॅरंटी जप्तीव्यतिरिक्त काहीही कारवाई होत नाही, हे माहिती असल्यानेच नदीत दूषीत पाणी सोडण्याचे कारखान्यांचे धाडस वाढत आहे, हा सर्व प्रकार २३ एप्रिलला उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करणार असल्याची माहिती प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी ‘लोकमत’ला दिली.मंडळाने जिल्ह्णातील १३ साखर कारखाने व डिस्टीलरीज् यांना प्रत्येकी पाच लाख रुपये बँक गॅरंटी भरण्याचे आदेश ३ मार्चला दिले होते. त्यानुसार दत्त कारखाना, कुंभी-कासारी, भोगावती, दालमिया (दहा लाख रुपये), राजाराम, कोल्हापूर शुगर मिल, एस. एस. डिस्टीलरीज्, डी. वाय. पाटील साखर कारखाना, ओरिएंट ग्रीनपॉवर कंपनी, साईदीप ट्रेडर्स, रेणुका शुगर्स, जवाहर साखर कारखाना यांनी ३१ मार्चअखेर पाच लाख रुपयांची बँक गॅरंटी मंडळाकडे जमा केली. राजाराम कारखान्याने मागीलवेळी केलेल्या प्रदूषणाच्या दंडापोटी इतर कारखान्यांप्रमाणेच भरलेली पाच लाख रुपयांची बॅँक गॅरंटी मंडळाने जप्त केली.दूषित पाणी सोडल्यानंतर फार तर पाच लाख रुपये बँक गॅरंटी जप्तीव्यतिरिक्त काहीही होणार नाही. याची खात्री असल्यानेच कारखान्यांची प्रदूषणाबाबतची मुजोरी वाढत आहे. मंडळाने कागदी घोडी नाचविण्याव्यतिरिक्त कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. पंचगंगेत मेलेल्या माशांच्या खच पडला आहे, असे असतानाही महापालिका, जिल्हा परिषद किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील एकही अधिकारी नदीकडे फिरकला नाही किंवा मासे बाहेर काढण्यासाठी यंत्रणा राबविलेली नाही. मासे मरून ते कुजू लागले आहेत. इचलकरंजीसह सर्व नदीकाठच्या गावांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)नदीत मेलेले मासे बाहेर काढण्यासाठी संबंधित यंत्रणेला आदेश व्हावेत, अशी विनंती दिलीप देसाई यांनी करवीरचे तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे यांना केली. मात्र, खरमाटे यांनी याकडे साफ दुर्लक्ष करत हे काम मंडळाचे आहे. जिल्हा प्रशासनाचा काहीही संबंध नाही, असे सांगत साफ हात वर केले. अधिकाऱ्यांच्या अशा मानसिकतेमुळेच पंचगंगेचे प्रदूषणाचे दुखणे दिवसें-दिवस वाढत आहे. ही बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.