शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
4
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
5
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
6
Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!
7
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
8
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
9
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
10
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
11
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
12
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
13
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
14
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
15
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
16
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
17
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
18
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
19
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
20
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...

‘राजाराम’ची पाच लाखांची बँक गॅरंटी जप्त

By admin | Updated: April 8, 2015 00:33 IST

मासे कुजले : इचलकरंजीसह नदीकाठच्या गावांना धोका करवीरच्या तहसीलदारांचे कानावर हात

कोल्हापूर : राजाराम साखर कारखान्याने १ एप्रिल २०१५ला भरलेली पाच लाखांची बँक गॅरंटी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शुक्रवारी (दि.४) जप्त केली. कारवाईनंतर चोवीस तासांतच कारखान्याने मळीमिश्रीत पाणी नदीत सोडले. बॅँक गॅरंटी जप्तीव्यतिरिक्त काहीही कारवाई होत नाही, हे माहिती असल्यानेच नदीत दूषीत पाणी सोडण्याचे कारखान्यांचे धाडस वाढत आहे, हा सर्व प्रकार २३ एप्रिलला उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करणार असल्याची माहिती प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी ‘लोकमत’ला दिली.मंडळाने जिल्ह्णातील १३ साखर कारखाने व डिस्टीलरीज् यांना प्रत्येकी पाच लाख रुपये बँक गॅरंटी भरण्याचे आदेश ३ मार्चला दिले होते. त्यानुसार दत्त कारखाना, कुंभी-कासारी, भोगावती, दालमिया (दहा लाख रुपये), राजाराम, कोल्हापूर शुगर मिल, एस. एस. डिस्टीलरीज्, डी. वाय. पाटील साखर कारखाना, ओरिएंट ग्रीनपॉवर कंपनी, साईदीप ट्रेडर्स, रेणुका शुगर्स, जवाहर साखर कारखाना यांनी ३१ मार्चअखेर पाच लाख रुपयांची बँक गॅरंटी मंडळाकडे जमा केली. राजाराम कारखान्याने मागीलवेळी केलेल्या प्रदूषणाच्या दंडापोटी इतर कारखान्यांप्रमाणेच भरलेली पाच लाख रुपयांची बॅँक गॅरंटी मंडळाने जप्त केली.दूषित पाणी सोडल्यानंतर फार तर पाच लाख रुपये बँक गॅरंटी जप्तीव्यतिरिक्त काहीही होणार नाही. याची खात्री असल्यानेच कारखान्यांची प्रदूषणाबाबतची मुजोरी वाढत आहे. मंडळाने कागदी घोडी नाचविण्याव्यतिरिक्त कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. पंचगंगेत मेलेल्या माशांच्या खच पडला आहे, असे असतानाही महापालिका, जिल्हा परिषद किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील एकही अधिकारी नदीकडे फिरकला नाही किंवा मासे बाहेर काढण्यासाठी यंत्रणा राबविलेली नाही. मासे मरून ते कुजू लागले आहेत. इचलकरंजीसह सर्व नदीकाठच्या गावांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)नदीत मेलेले मासे बाहेर काढण्यासाठी संबंधित यंत्रणेला आदेश व्हावेत, अशी विनंती दिलीप देसाई यांनी करवीरचे तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे यांना केली. मात्र, खरमाटे यांनी याकडे साफ दुर्लक्ष करत हे काम मंडळाचे आहे. जिल्हा प्रशासनाचा काहीही संबंध नाही, असे सांगत साफ हात वर केले. अधिकाऱ्यांच्या अशा मानसिकतेमुळेच पंचगंगेचे प्रदूषणाचे दुखणे दिवसें-दिवस वाढत आहे. ही बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.