शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

वादळी पावसाने 'राजाराम'ची चिमणी  जमीनदोस्त ; झाडे पडली,  पॅव्हेलियनचे पत्रे निखळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 19:43 IST

या वादळाच्या तडाख्यात राजाराम कारखान्याची चाळीस फूट उंचीची व अडीच फूट रुंदीची चिमणी कोसळली. चिमणी जुनी होती. चिमणी कोसळल्याने राजाराम कारखान्याच्या शेडचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी कारखान्याच्या काही अधिकाऱ्यांनी भेट दिली.

ठळक मुद्देसव्वा पाच ते सव्वासहा असा सुमारे तासभर गारांसह वादळी पाऊस पडला. पावसामुळे काही काळा वीजपुरवठाही खंडित झाला.

कसबा बावडा :  वीजांचा चमचमाट आणि ढगांच्या गडगडाटासह आज कसबा बावडा परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे छत्रपती राजाराम साखर कारखान्याची ४० फूट उंचीची जुनी चिमणी जमीनदोस्त झाली. कारखाना गेली महिनाभर बंद असल्याने सुदैवाने जीवित हानी टळली. या वादळी पावसाने बावडा पॅव्हेलियनचे पत्रे निखळले. परिसरात आजही अनेक झाडे कोसळली. सव्वा पाच ते सव्वासहा असा सुमारे तासभर गारांसह वादळी पाऊस पडला. पावसामुळे काही काळा वीजपुरवठाही खंडित झाला.        सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. गारांसह पाऊस पडत असतानाच वादळही मोठ्या प्रमाणात सुटले. या वादळाच्या तडाख्यात राजाराम कारखान्याची चाळीस फूट उंचीची व अडीच फूट रुंदीची चिमणी कोसळली. चिमणी जुनी होती. चिमणी कोसळल्याने राजाराम कारखान्याच्या शेडचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी कारखान्याच्या काही अधिकाऱ्यांनी भेट दिली.        दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह परिसरात झालेल्या या वादळी पावसामुळे आजही अनेक ठिकाणांची झाडे कोसळली. हा पाऊस ऊस  पिकाला पोषक असल्याने बळीराजा मात्र सुकावला. परिसरात पडलेल्या वळीव पावसामुळे खरीप हंगाम पेरणीपूर्व मशागतीला  आता गती येण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस