शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

राजापूरच्या गंगेचे विक्रमी वास्तव्य, प्रवाहाला पुन्हा जोर

By admin | Updated: July 24, 2014 23:13 IST

भाविकांचे श्रध्दास्थान : तीन वर्षांनी प्रकट होणारी गंगा भर पावसात प्रवाहीत

विनोद पवार -राजापूर ,,साधारण दर तीन वर्षांनी प्रकट होणारी राजापूरची गंगा गेले वर्षभर कमी अधिक प्रमाणात अखंडपणे प्रवाहीत होती. मंगळवारी गंगेचा प्रवाह पुन्हा जोराने वाहू लागला आहे. निसर्गाचा अद्भूत चमत्कार मानली जाणारी राजापूरची गंगा महाराष्ट्राबरोबरच परराज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान बनून राहिली आहे. गेले वर्षभर सातत्याने प्रवाहीत राहणारी राजापूरची गंगा गेल्या तीन वर्षांत तीन वेळा प्रकट झाली असून, हादेखील एक दैवी चमत्कारच मानला जात आहे. अनादी काळापासून दर तीन वर्षांनी प्रकट होणाऱ्या राजापूरच्या गंगेत स्नान केल्यानंतर मानवाच्या पापांचे क्षालन होते, असे भाविकांमधून मानले जाते.राजापूरच्या गंगेच्या संदर्भातील सन १८८३ पासूनच्या उपलब्ध नोदींनुसार राजापूरची गंगा प्रकट होऊन अंतर्धान पावल्यानंतर साधारणत तिसऱ्या वर्षी पुन्हा प्रकट होते. असा प्रघात आहे.राजापूरच्या गंगेच्या बाबतीतला हा प्रघात सन २००९ पर्यंत जवळजवळ कायम होता. २८ मे २००९ रोजी प्रकट झालेली राजापूरची गंगा सुमारे १०५ दिवस प्रवाहीत राहून ९ सप्टेंबर २००९ रोजी अंतर्धान पावली होती. त्यानंतर एक वर्ष पाच महिने उलटल्यानंतर म्हणजेच १० फेब्रुवारी २०११ मध्ये गंगेचे पुन्हा आगमन झाले. यावेळी गंगा ११६ दिवस प्रवाहीत राहून ५ जून २०११ रोजी अंतर्धान पावली. त्यानंतर दरवर्षी म्हणजेच सन २०११ , २०१२ व २०१३ या तीन वर्षी सातत्याने प्रकट झाली आहे. ५ जून २०११ रोजी अंतर्धान पावलेली राजापूरची गंगा केवळ दहा महिन्यांच्या कालावधीत ११ एप्रिल २०१२ रोजी पुन्हा प्रकट झाली. यावेळी गंगा अखंडपणे प्रवाहीत राहण्याचा कालावधी ३४७ दिवसांचा असल्याची व्रिकमी नोंद झाली आहे. आजपर्यंतच्या इतिहासात गंगा प्रवाहीत राहण्याचा कालावधी हा साधारणत तीन महिन्यांचा राहिला असला तरी ११ एप्रिल २०१२ रोजी प्रकट झालेली गंगा ३४७ दिवसांनी म्हणजेच २३ मार्च २०१३ रोजी अंतर्धान पावली. यावेळी अंतर्धान पावलेली गंगा नेहमीप्रमाणे तीन वर्षानी येईल, असे वाटत असतानाच केवळ तीन महिन्यांच्या कालखंडानंतर २३ जून २०१३ रोजी पुन्हा प्रकट झाली ती कधी अंतर्धान पावली, याची कुणालाच कल्पना आली नाही. कारण यावेळी राजापूरची गंगा जवळ जवळ वर्षभर प्रवाहीत राहिली होती.साधारण गंगा आगमनाचा कालावधी हा सर्वसाधारणपणे उन्हाचा कडाका असताना फेब्रुवारी, मार्च महिन्यात असल्याचे मागील नोंदीवरून स्पष्ट होत आहे. मात्र, यावेळी राजापूरची गंगा ऐन पावसाळ्यात म्हणजेच मंगळवार, दि. २२ जुलै रोजी प्रकट झाली आहे.