शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

धुवाधार पाऊस!

By admin | Updated: August 6, 2016 00:56 IST

जनजीवन विस्कळीत : पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीकडे; पडझडीत सुमारे ४० लाखांचे नुकसान; चांदोली धरणाचे दरवाजे उघडले; शिये-कसबा बावडा मार्ग बंद

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर धुवाधार पाऊस सुरू असून, ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राधानगरीसह बहुतांश धरणांतून विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेने धोका पातळीकडे आगेकूच केल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तब्बल ६७ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या चार दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी पावसाचा नूर काही वेगळाच होता. पहाटेपासून एकसारखा पाऊस सुरू राहिल्याने गटारी सोडाच, पण रस्त्यांवर पाणी मावेना इतका वेग पाण्याला होता. जमिनी उमळल्याने शेतवडीत पाणीच पाणी दिसत आहे. बांधफुटीमुळे भात, नागली, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीबरोबर घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पंचगंगा, भोगावती, तुळशी, वारणा, कासारी, कुंभी, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी, दूधगंगा, शाळी, धामणी व जांबरे या नद्यांवरील ६७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धुवाधार पावसात आठ सार्वजनिक मालमत्तेची पडझड होऊन २४ लाख ६० हजार, तर ७० घरांची अंशत: पडझड होऊन १५ लाख ४० हजार असे ४० लाखांचे नुकसान झाले आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ७९१२ घनफूट विसर्ग सुरू असल्याने भोगावती नदीच्या पाण्याला फुग अधिक आहे. वारणा धरण ९१ टक्के भरल्याने सतर्कता म्हणून ८३१ घनफूट विसर्ग सुरू ठेवला आहे. त्याशिवाय कासारी, कडवी, कुंभी, घटप्रभा धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू राहिल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी शुक्रवारी सकाळी आठ वाजता ३९.७ फुटांपर्यंत होती.सायंकाळी सहा वाजता त्यामध्ये तब्बल तीन फुटांनी वाढ होऊन ती ४१.८ पर्यंत पोहोचली आहे. अलमट्टी धरणात प्रतिसेकंद १ लाख २१ हजार ९३३ घनफूटची आवक, तर २ लाख ४० हजार ६९३ घनफूट पाण्याचा विसर्ग म्हणजे आवकापेक्षा दुप्पट विसर्ग होत असल्याने पंचगंगेच्या पाण्याची फुग काही प्रमाणात नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे. ओढे-नाले तुटलेपावसाचा जोर इतका भयंकर आहे की, ओढे-नाल्यांनीही रौद्र रूप धारण केले आहे. ओढे ओव्हरफुल होऊन शेतवडीत पाणी घुसत असल्याने अनेक ठिकाणी ओढे-नाले तुटल्याच्या घटना घडल्या आहेत. नऊ मार्गांवरील एस. टी. वाहतूक अंशत: बंदरंकाळा-अणुस्कुरा, भोगाव, चौके, आरळे, चंदगड ते मांदवडे, भुजवडे, इब्राहिमपूर, कुरणे, गगनबावडा ते सांगशी या मार्गांवर पाणी आल्याने एस.टी.ची वाहतूक अंशत: बंद झाली आहे. जिथे पर्यायी वाहतूक उपलब्ध आहे, त्या मार्गे वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये असा-हातकणंगले-२०.७५, शिरोळ-१८.८५, पन्हाळा-७१.४२, शाहूवाडी-७३, राधानगरी-६६, गगनबावडा-७६, करवीर-३५.२७, कागल-४०.७५, गडहिंग्लज-१९.५७, भुदरगड-४५.६०, आजरा-४५.२५, चंदगड-४३.८३.धरणसाठा टी.एम.सी.मध्ये असा-धरण क्षमता सध्याचा साठा टक्केवारी धरण क्षेत्रातील पाऊस राधानगरी ८.३६१ ८.२९६ ९९ १२६तुळशी ३.४७१ २.५८७ ७४ ११७वारणा ३४.३९९ ३१.४९८ ९१ ७५दूधगंगा २५.३९२ १६.६९० ६५ ११५कासारी २.७५२ २.५३८ ९२ २३०कुंभी २.७१३ २.६०५ ९६ १४७पाटगाव ३.७१६ २.६३० ७० ६४शिवाजी पूल अखेर बंदकोल्हापूर : महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील १३८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेल्या शिवाजी पुलावरील वाहतूक शुक्रवारी पूर्णत: बंद केली. वाहतूक बंद झाली तरी हौशी बघ्यांची गर्दी लक्षणीय होती. त्यामुळे या परिसराला अगदी पर्यटनस्थळासारखे स्वरूप आले होते. संततधार पावसामुळे दिवसभरात वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले. -वृत्त/पान २पूररेषेतील नागरिकांचे स्थलांतर सुरू पावसाचा जोर असल्याने राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला असून, नदीपात्रांसह नाल्यांमध्येही पाणी वाढत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव पूररेषेत येणाऱ्या शहर, आसपासच्या भागांसह जिल्ह्यात रात्रीपासून नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. -वृत्त/पान २महाद्वार रोडवर घराची भिंत कोसळून वृद्धा ठारदोघे जखमी : अतिवृष्टीचा परिणाम