शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धुवाधार पाऊस!

By admin | Updated: August 6, 2016 00:56 IST

जनजीवन विस्कळीत : पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीकडे; पडझडीत सुमारे ४० लाखांचे नुकसान; चांदोली धरणाचे दरवाजे उघडले; शिये-कसबा बावडा मार्ग बंद

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर धुवाधार पाऊस सुरू असून, ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राधानगरीसह बहुतांश धरणांतून विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेने धोका पातळीकडे आगेकूच केल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तब्बल ६७ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या चार दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी पावसाचा नूर काही वेगळाच होता. पहाटेपासून एकसारखा पाऊस सुरू राहिल्याने गटारी सोडाच, पण रस्त्यांवर पाणी मावेना इतका वेग पाण्याला होता. जमिनी उमळल्याने शेतवडीत पाणीच पाणी दिसत आहे. बांधफुटीमुळे भात, नागली, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीबरोबर घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पंचगंगा, भोगावती, तुळशी, वारणा, कासारी, कुंभी, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी, दूधगंगा, शाळी, धामणी व जांबरे या नद्यांवरील ६७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धुवाधार पावसात आठ सार्वजनिक मालमत्तेची पडझड होऊन २४ लाख ६० हजार, तर ७० घरांची अंशत: पडझड होऊन १५ लाख ४० हजार असे ४० लाखांचे नुकसान झाले आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ७९१२ घनफूट विसर्ग सुरू असल्याने भोगावती नदीच्या पाण्याला फुग अधिक आहे. वारणा धरण ९१ टक्के भरल्याने सतर्कता म्हणून ८३१ घनफूट विसर्ग सुरू ठेवला आहे. त्याशिवाय कासारी, कडवी, कुंभी, घटप्रभा धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू राहिल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी शुक्रवारी सकाळी आठ वाजता ३९.७ फुटांपर्यंत होती.सायंकाळी सहा वाजता त्यामध्ये तब्बल तीन फुटांनी वाढ होऊन ती ४१.८ पर्यंत पोहोचली आहे. अलमट्टी धरणात प्रतिसेकंद १ लाख २१ हजार ९३३ घनफूटची आवक, तर २ लाख ४० हजार ६९३ घनफूट पाण्याचा विसर्ग म्हणजे आवकापेक्षा दुप्पट विसर्ग होत असल्याने पंचगंगेच्या पाण्याची फुग काही प्रमाणात नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे. ओढे-नाले तुटलेपावसाचा जोर इतका भयंकर आहे की, ओढे-नाल्यांनीही रौद्र रूप धारण केले आहे. ओढे ओव्हरफुल होऊन शेतवडीत पाणी घुसत असल्याने अनेक ठिकाणी ओढे-नाले तुटल्याच्या घटना घडल्या आहेत. नऊ मार्गांवरील एस. टी. वाहतूक अंशत: बंदरंकाळा-अणुस्कुरा, भोगाव, चौके, आरळे, चंदगड ते मांदवडे, भुजवडे, इब्राहिमपूर, कुरणे, गगनबावडा ते सांगशी या मार्गांवर पाणी आल्याने एस.टी.ची वाहतूक अंशत: बंद झाली आहे. जिथे पर्यायी वाहतूक उपलब्ध आहे, त्या मार्गे वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये असा-हातकणंगले-२०.७५, शिरोळ-१८.८५, पन्हाळा-७१.४२, शाहूवाडी-७३, राधानगरी-६६, गगनबावडा-७६, करवीर-३५.२७, कागल-४०.७५, गडहिंग्लज-१९.५७, भुदरगड-४५.६०, आजरा-४५.२५, चंदगड-४३.८३.धरणसाठा टी.एम.सी.मध्ये असा-धरण क्षमता सध्याचा साठा टक्केवारी धरण क्षेत्रातील पाऊस राधानगरी ८.३६१ ८.२९६ ९९ १२६तुळशी ३.४७१ २.५८७ ७४ ११७वारणा ३४.३९९ ३१.४९८ ९१ ७५दूधगंगा २५.३९२ १६.६९० ६५ ११५कासारी २.७५२ २.५३८ ९२ २३०कुंभी २.७१३ २.६०५ ९६ १४७पाटगाव ३.७१६ २.६३० ७० ६४शिवाजी पूल अखेर बंदकोल्हापूर : महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील १३८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेल्या शिवाजी पुलावरील वाहतूक शुक्रवारी पूर्णत: बंद केली. वाहतूक बंद झाली तरी हौशी बघ्यांची गर्दी लक्षणीय होती. त्यामुळे या परिसराला अगदी पर्यटनस्थळासारखे स्वरूप आले होते. संततधार पावसामुळे दिवसभरात वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले. -वृत्त/पान २पूररेषेतील नागरिकांचे स्थलांतर सुरू पावसाचा जोर असल्याने राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला असून, नदीपात्रांसह नाल्यांमध्येही पाणी वाढत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव पूररेषेत येणाऱ्या शहर, आसपासच्या भागांसह जिल्ह्यात रात्रीपासून नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. -वृत्त/पान २महाद्वार रोडवर घराची भिंत कोसळून वृद्धा ठारदोघे जखमी : अतिवृष्टीचा परिणाम