शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

धुवाधार पाऊस!

By admin | Updated: August 6, 2016 00:56 IST

जनजीवन विस्कळीत : पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीकडे; पडझडीत सुमारे ४० लाखांचे नुकसान; चांदोली धरणाचे दरवाजे उघडले; शिये-कसबा बावडा मार्ग बंद

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर धुवाधार पाऊस सुरू असून, ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राधानगरीसह बहुतांश धरणांतून विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेने धोका पातळीकडे आगेकूच केल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तब्बल ६७ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या चार दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी पावसाचा नूर काही वेगळाच होता. पहाटेपासून एकसारखा पाऊस सुरू राहिल्याने गटारी सोडाच, पण रस्त्यांवर पाणी मावेना इतका वेग पाण्याला होता. जमिनी उमळल्याने शेतवडीत पाणीच पाणी दिसत आहे. बांधफुटीमुळे भात, नागली, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीबरोबर घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पंचगंगा, भोगावती, तुळशी, वारणा, कासारी, कुंभी, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी, दूधगंगा, शाळी, धामणी व जांबरे या नद्यांवरील ६७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धुवाधार पावसात आठ सार्वजनिक मालमत्तेची पडझड होऊन २४ लाख ६० हजार, तर ७० घरांची अंशत: पडझड होऊन १५ लाख ४० हजार असे ४० लाखांचे नुकसान झाले आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ७९१२ घनफूट विसर्ग सुरू असल्याने भोगावती नदीच्या पाण्याला फुग अधिक आहे. वारणा धरण ९१ टक्के भरल्याने सतर्कता म्हणून ८३१ घनफूट विसर्ग सुरू ठेवला आहे. त्याशिवाय कासारी, कडवी, कुंभी, घटप्रभा धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू राहिल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी शुक्रवारी सकाळी आठ वाजता ३९.७ फुटांपर्यंत होती.सायंकाळी सहा वाजता त्यामध्ये तब्बल तीन फुटांनी वाढ होऊन ती ४१.८ पर्यंत पोहोचली आहे. अलमट्टी धरणात प्रतिसेकंद १ लाख २१ हजार ९३३ घनफूटची आवक, तर २ लाख ४० हजार ६९३ घनफूट पाण्याचा विसर्ग म्हणजे आवकापेक्षा दुप्पट विसर्ग होत असल्याने पंचगंगेच्या पाण्याची फुग काही प्रमाणात नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे. ओढे-नाले तुटलेपावसाचा जोर इतका भयंकर आहे की, ओढे-नाल्यांनीही रौद्र रूप धारण केले आहे. ओढे ओव्हरफुल होऊन शेतवडीत पाणी घुसत असल्याने अनेक ठिकाणी ओढे-नाले तुटल्याच्या घटना घडल्या आहेत. नऊ मार्गांवरील एस. टी. वाहतूक अंशत: बंदरंकाळा-अणुस्कुरा, भोगाव, चौके, आरळे, चंदगड ते मांदवडे, भुजवडे, इब्राहिमपूर, कुरणे, गगनबावडा ते सांगशी या मार्गांवर पाणी आल्याने एस.टी.ची वाहतूक अंशत: बंद झाली आहे. जिथे पर्यायी वाहतूक उपलब्ध आहे, त्या मार्गे वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये असा-हातकणंगले-२०.७५, शिरोळ-१८.८५, पन्हाळा-७१.४२, शाहूवाडी-७३, राधानगरी-६६, गगनबावडा-७६, करवीर-३५.२७, कागल-४०.७५, गडहिंग्लज-१९.५७, भुदरगड-४५.६०, आजरा-४५.२५, चंदगड-४३.८३.धरणसाठा टी.एम.सी.मध्ये असा-धरण क्षमता सध्याचा साठा टक्केवारी धरण क्षेत्रातील पाऊस राधानगरी ८.३६१ ८.२९६ ९९ १२६तुळशी ३.४७१ २.५८७ ७४ ११७वारणा ३४.३९९ ३१.४९८ ९१ ७५दूधगंगा २५.३९२ १६.६९० ६५ ११५कासारी २.७५२ २.५३८ ९२ २३०कुंभी २.७१३ २.६०५ ९६ १४७पाटगाव ३.७१६ २.६३० ७० ६४शिवाजी पूल अखेर बंदकोल्हापूर : महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील १३८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेल्या शिवाजी पुलावरील वाहतूक शुक्रवारी पूर्णत: बंद केली. वाहतूक बंद झाली तरी हौशी बघ्यांची गर्दी लक्षणीय होती. त्यामुळे या परिसराला अगदी पर्यटनस्थळासारखे स्वरूप आले होते. संततधार पावसामुळे दिवसभरात वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले. -वृत्त/पान २पूररेषेतील नागरिकांचे स्थलांतर सुरू पावसाचा जोर असल्याने राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला असून, नदीपात्रांसह नाल्यांमध्येही पाणी वाढत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव पूररेषेत येणाऱ्या शहर, आसपासच्या भागांसह जिल्ह्यात रात्रीपासून नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. -वृत्त/पान २महाद्वार रोडवर घराची भिंत कोसळून वृद्धा ठारदोघे जखमी : अतिवृष्टीचा परिणाम