शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी पावसाची उघडीप राहिली. अधूनमधून सरी कोसळल्या मात्र बहुतांशी काळ कडकडीत ऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी पावसाची उघडीप राहिली. अधूनमधून सरी कोसळल्या मात्र बहुतांशी काळ कडकडीत ऊन राहिले. पावसाचा जोर कमी झाल्याने पुराचे पाणी उतरण्यास सुरूवात झाली आहे. पंचगंगेची पाणी पातळी दिवसभरात फुटाने कमी झाली.

गेले चार-पाच दिवस पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले होते. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने नद्यांचे पाणी पात्राबाहेर आले आहे. पहिल्या दोनच दिवसात नद्यांना पूर आल्याने तब्बल ५८ बंधारे पाण्याखाली गेले होते. मात्र, शनिवारी दुपारपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. रविवारी सकाळी ऊन पडले हाेते. दिवसभरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत राहिल्या मात्र दुपारनंतर कोल्हापूर शहरात कडकडीत ऊन होते. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात गगनबावडा व चंदगडमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली. उर्वरित ठिकाणी मात्र पावसाचा जोर कमी झाला आहे.

रविवारी सकाळी जिल्ह्यातील ४४ बंधाऱ्यावर पाणी होते, मात्र सायंकाळी तीन बंधाऱ्यावरील पाणी कमी झाले. पंचगंगा नदीची पाणी पातळी दिवसभरात फुटाने कमी होऊन रविवारी रात्री ती ३३ फुटावर आली होती. राधानगरी धरणातून वीज निर्मितीसाठी प्रतिसेंकद १३०० घनफुट पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

जिल्ह्यात पडझडीत ४.६४ लाखाचे नुकसान

जिल्ह्यात पावसामुळे घरांची पडझड होऊन ४ लाख ६४ हजाराचे नुकसान झाले आहे. यामध्ये आजरा ५१ हजार, गडहिंग्लज ६३ हजार, हातकणंगले ६५ हजार, शाहूवाडी १५ हजार, पन्हाळा १ लाख २० हजार, कागल ३० हजार तर करवीर मध्ये १ लाख २० हजाराचे नुकसान झाले आहे.

प्रमुख धरणातील पाणीसाठा टीएमसी मध्ये असा, कंसात क्षमता-

वारणा -१७.४२ (३४.४०), दूधगंगा - ९.४२ (२५.४०), राधानगरी -३.०८ (८.३६), तुळशी - १.८५ (३.४७), कुंभी - १.३५ (२.७२), कासारी -१.०४ (२.७७), पाटगाव - १.८२ (३.२२), चिकोत्रा - ०.७४ (१.५२).