शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

‘पर्जन्य जलसंचय’ नगरसेवकांच्या घरापासून

By admin | Updated: May 20, 2016 00:32 IST

महानगरपालिका, सतेज पाटील फौंडेशनचा निर्धार : उद्यानातील विहिरी, कूपनलिकांच्या पुनर्भरणाचा निर्णय

कोल्हापूर : महानगरपालिका आणि सतेज पाटील फौंडेशनतर्फे शहरात ‘पर्जन्य जलसंचय’ची (रेन वॉटर हार्वेस्टिंग) मोठी चळवळ उभी करण्याचा निर्धार गुरुवारी येथे झालेल्या या विषयावरील कार्यशाळेत करण्यात आला. चळवळीची सुरुवात या वर्षीच्या पावसाळ्यात नगरसेवकांनी त्यांच्या घरापासून करण्याचा तसेच महापालिकेच्या मालकीच्या उद्यानातील विहिरी, कूपनलिका पुनर्भरण करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. जनजागृतीबरोबरच पर्जन्य जलसंचयास प्रत्यक्ष मदत व मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच जलमित्रांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षी पाऊस कमी पडल्यामुळे जिल्ह्याबरोबरच संपूर्ण शहरालाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावतआहे. भविष्यात अशा प्रकारे जर पाण्याची टंचाई भासू लागली तर त्यावर पर्याय म्हणून पर्जन्य जलसंचय हाच एकमेव पर्याय असल्याने त्याबाबत जनजागृती व मार्गदर्शन म्हणून गुरुवारी येथील केशवराव भोसले नाट्यगृहात महानगरपालिका व सतेज पाटील फौंडेशनतर्फे ‘पर्जन्य जलसंचय’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, नगरसेवक, पर्यावरणवादी कार्यकर्ते, जलमित्र, महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार सतेज पाटील यांनी सुरुवातीला कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करून सांगितला. पावसाचे कमी होत असलेले प्रमाण, घटत चाललेली भूजल पातळी यांचा विचार करता पर्जन्य जलसंचयही आता आवश्यक बाब बनली असून, शहरातील प्रत्येक मिळकतधारकाने पावसाचे पाणी अडविले, जिरविले आणि त्याचा वापर केला तर पाणीटंचाईवर मात करता येईल. सध्या भेडसावत असलेल्या पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता कोल्हापूर शहरात पर्जन्य जलसंचय उपक्रम घरोघरी राबविण्याची आवश्यकता आहे, असे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)राजाराम रक्तवान : चाळीस वर्षे पावसाचे पाणी थेट स्वयंपाकघरातभारतीय वायुसेनेतील निवृत्त अधिकारी ८९ वर्षीय राजाराम रक्तवान यांनी स्वत:च्या घरातील पर्जन्य जलसंचयाची माहिती दिली. गेली ४0 वर्षे त्यांचा ‘ढगातून थेट स्वयंपाकघरात’ हा उपक्रम सुरू असून त्यामुळे आरोग्यास कसलीही बाधा निर्माण झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रक्तवान हे ११०० स्क्वेअर फुटांच्या छतावरील पावसाचे पाणी साठवितात. वर्षभराकरिता त्यांना १ लाख ३५ हजार लिटर पाणी उपलब्ध होते. दैनंदिन पाण्याचा हिशेबही त्यांनी लिहून ठेवला आहे. पाच व्यक्तींच्या कुटुंबाला दिवसाकाठी पिण्यासाठी १५ लिटर पाणी लागते. महिन्याला ४५० लिटर, तर वर्षाला ६००० हजार लिटर पाणी लागते. उरलेले सर्व पाणी ते घरखर्चासाठी वापरतात. यावेळी संदीप अध्यापकर (ठाणे), नितीन अतकरे (बार्शी), उदय गायकवाड, पारस ओसवाल, दीपक देवलापूरकर, अनिल चौगुले, आदींनी मार्गदर्शन केले; तर महापालिकेचे पर्यावरण अभियंता आर. के. पाटील यांनी आभार मानले. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव, परिवहन सभापती लाला भोसले, महिला बालकल्याण सभापती वृषाली कदम, उपायुक्त विजय खोराटे, सहायक आयुक्त उमेश रणदिवे, नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह महापालिकेचे सर्व अभियंते उपस्थित होते. तज्ज्ञांकडून प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन कार्यशाळेत पर्जन्य जलसंचय या विषयात तज्ज्ञ असलेल्या व्यक्तींनी प्रात्यक्षिकांसह उपस्थितांना मार्गदर्शन केले. युनिटी कन्सल्टंटचे मिलिंद कुलकर्णी यांनी १००० स्क्वेअर फुटांच्या छतावरील पावसाचे पाणी अडवून ते टाकीत साठविल्यास वर्षाला ६५ हजार लिटर पाणी मिळते. हेच पाणी पिण्यासाठी किंवा खर्चासाठीही वापरता येते. पावसाचे पाणी कूपनलिका, विहिरी यांचे पुनर्भरण करण्यासाठीही वापरता येते; त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढविता येते, असे सांगितले. नगरसेवकांपासूनच सुरुवात शहरातील ८१ नगरसेवकांनी स्वत:च्या घरापासून ही चळवळ राबविण्याची सूचना आमदार पाटील यांनी केली. त्याला सर्व नगरसेवकांनी तत्काळ होकार दिला. प्रत्येक नगरसेवकाने त्याच्या प्रभागातील ५० मिळकतधारकांना या उपक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन पाटील यांनी केले, त्याचाही स्वीकार नगरसेवकांनी केला.