शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

‘पर्जन्य जलसंचय’ नगरसेवकांच्या घरापासून

By admin | Updated: May 20, 2016 00:32 IST

महानगरपालिका, सतेज पाटील फौंडेशनचा निर्धार : उद्यानातील विहिरी, कूपनलिकांच्या पुनर्भरणाचा निर्णय

कोल्हापूर : महानगरपालिका आणि सतेज पाटील फौंडेशनतर्फे शहरात ‘पर्जन्य जलसंचय’ची (रेन वॉटर हार्वेस्टिंग) मोठी चळवळ उभी करण्याचा निर्धार गुरुवारी येथे झालेल्या या विषयावरील कार्यशाळेत करण्यात आला. चळवळीची सुरुवात या वर्षीच्या पावसाळ्यात नगरसेवकांनी त्यांच्या घरापासून करण्याचा तसेच महापालिकेच्या मालकीच्या उद्यानातील विहिरी, कूपनलिका पुनर्भरण करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. जनजागृतीबरोबरच पर्जन्य जलसंचयास प्रत्यक्ष मदत व मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच जलमित्रांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षी पाऊस कमी पडल्यामुळे जिल्ह्याबरोबरच संपूर्ण शहरालाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावतआहे. भविष्यात अशा प्रकारे जर पाण्याची टंचाई भासू लागली तर त्यावर पर्याय म्हणून पर्जन्य जलसंचय हाच एकमेव पर्याय असल्याने त्याबाबत जनजागृती व मार्गदर्शन म्हणून गुरुवारी येथील केशवराव भोसले नाट्यगृहात महानगरपालिका व सतेज पाटील फौंडेशनतर्फे ‘पर्जन्य जलसंचय’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, नगरसेवक, पर्यावरणवादी कार्यकर्ते, जलमित्र, महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार सतेज पाटील यांनी सुरुवातीला कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करून सांगितला. पावसाचे कमी होत असलेले प्रमाण, घटत चाललेली भूजल पातळी यांचा विचार करता पर्जन्य जलसंचयही आता आवश्यक बाब बनली असून, शहरातील प्रत्येक मिळकतधारकाने पावसाचे पाणी अडविले, जिरविले आणि त्याचा वापर केला तर पाणीटंचाईवर मात करता येईल. सध्या भेडसावत असलेल्या पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता कोल्हापूर शहरात पर्जन्य जलसंचय उपक्रम घरोघरी राबविण्याची आवश्यकता आहे, असे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)राजाराम रक्तवान : चाळीस वर्षे पावसाचे पाणी थेट स्वयंपाकघरातभारतीय वायुसेनेतील निवृत्त अधिकारी ८९ वर्षीय राजाराम रक्तवान यांनी स्वत:च्या घरातील पर्जन्य जलसंचयाची माहिती दिली. गेली ४0 वर्षे त्यांचा ‘ढगातून थेट स्वयंपाकघरात’ हा उपक्रम सुरू असून त्यामुळे आरोग्यास कसलीही बाधा निर्माण झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रक्तवान हे ११०० स्क्वेअर फुटांच्या छतावरील पावसाचे पाणी साठवितात. वर्षभराकरिता त्यांना १ लाख ३५ हजार लिटर पाणी उपलब्ध होते. दैनंदिन पाण्याचा हिशेबही त्यांनी लिहून ठेवला आहे. पाच व्यक्तींच्या कुटुंबाला दिवसाकाठी पिण्यासाठी १५ लिटर पाणी लागते. महिन्याला ४५० लिटर, तर वर्षाला ६००० हजार लिटर पाणी लागते. उरलेले सर्व पाणी ते घरखर्चासाठी वापरतात. यावेळी संदीप अध्यापकर (ठाणे), नितीन अतकरे (बार्शी), उदय गायकवाड, पारस ओसवाल, दीपक देवलापूरकर, अनिल चौगुले, आदींनी मार्गदर्शन केले; तर महापालिकेचे पर्यावरण अभियंता आर. के. पाटील यांनी आभार मानले. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव, परिवहन सभापती लाला भोसले, महिला बालकल्याण सभापती वृषाली कदम, उपायुक्त विजय खोराटे, सहायक आयुक्त उमेश रणदिवे, नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह महापालिकेचे सर्व अभियंते उपस्थित होते. तज्ज्ञांकडून प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन कार्यशाळेत पर्जन्य जलसंचय या विषयात तज्ज्ञ असलेल्या व्यक्तींनी प्रात्यक्षिकांसह उपस्थितांना मार्गदर्शन केले. युनिटी कन्सल्टंटचे मिलिंद कुलकर्णी यांनी १००० स्क्वेअर फुटांच्या छतावरील पावसाचे पाणी अडवून ते टाकीत साठविल्यास वर्षाला ६५ हजार लिटर पाणी मिळते. हेच पाणी पिण्यासाठी किंवा खर्चासाठीही वापरता येते. पावसाचे पाणी कूपनलिका, विहिरी यांचे पुनर्भरण करण्यासाठीही वापरता येते; त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढविता येते, असे सांगितले. नगरसेवकांपासूनच सुरुवात शहरातील ८१ नगरसेवकांनी स्वत:च्या घरापासून ही चळवळ राबविण्याची सूचना आमदार पाटील यांनी केली. त्याला सर्व नगरसेवकांनी तत्काळ होकार दिला. प्रत्येक नगरसेवकाने त्याच्या प्रभागातील ५० मिळकतधारकांना या उपक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन पाटील यांनी केले, त्याचाही स्वीकार नगरसेवकांनी केला.