शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रेल्वे, विमानसेवा सुरू; पण प्रवासी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:21 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील संचारबंदीमुळे कोल्हापुरातील रेल्वे, विमानसेवेची प्रवासी संख्या निम्म्यावर आली आहे. प्रवासी कमी झाल्याने विमानसेवेच्या काही मार्गावरील ...

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील संचारबंदीमुळे कोल्हापुरातील रेल्वे, विमानसेवेची प्रवासी संख्या निम्म्यावर आली आहे. प्रवासी कमी झाल्याने विमानसेवेच्या काही मार्गावरील फेऱ्या कमी होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर-नागपूर रेल्वे सेवा थांबविण्यात आली आहे.

यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी विमान आणि रेल्वे सेवा बंद करण्यात आलेली नाही. कोरोना नियमांचे पालन करून या दोन्ही माध्यमातून नागरिकांना प्रवास करता येत आहे. कोल्हापुरातून सध्या चार रेल्वे धावत आहेत. त्यामध्ये कोल्हापूर-गोंदिया, कोल्हापूर-मुंबई धावणारी महालक्ष्मी आणि कोयना एक्स्प्रेस, कोल्हापूर-तिरुपती यांचा समावेश आहे. दर शुक्रवारी, सोमवारी असलेली कोल्हापूर-नागपूर रद्द झाली आहे. मुंबई, गोंदिया, आदी ठिकाणांहून कोल्हापुरात येणाऱ्या आणि परराज्यातील कामगार वगळता कोल्हापुरातून जाणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण कमी आहे. त्यांच्या संख्या ५० टक्क्यांवर आली आहे. कोल्हापुरातून सध्या कोल्हापूर-तिरुपती, हैदराबाद-कोल्हापूर या मार्गांवर रोज, तर कोल्हापूर-मुंबई, कोल्हापूर-अहमदाबाद आणि कोल्हापूर-बंगलोर या मार्गांवर आठवड्यातील तीन दिवस विमानसेवा सुरू आहे. गेल्या वर्षातील मे महिन्यापासून यंदा संचारबंदी लागू होण्यापर्यंत एकूण ७५८०० जणांनी या मार्गांवरील विमानांतून प्रवास केला. संचारबंदी लागू झाल्यापासून विमान प्रवाशांची संख्या निम्म्यावर आली आहे.

प्रतिक्रिया

गेल्या आठवड्यात संचारबंदी लागू झाल्यापासून प्रवासी संख्या निम्म्यावर आली आहे. सध्या विमानसेवा सुरळीतपणे सुरू आहे. आणखी कमी झाल्यास काही मार्गांवरील विमान फेऱ्या कमी होऊ शकतात.

-कमलकुमार कटारिया, संचालक, कोल्हापूर विमानतळ.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सध्या कोल्हापूरहून चार रेल्वे सुरू आहेत. प्रवासी संख्या ५० टक्क्यांवर आली आहे. कोल्हापूर-धनबाद रेल्वेने जाण्यासाठी परराज्यांतील मजूर, कामगारांची गर्दी होत आहे.

-ए. आय. फर्नांडीस, प्रमुख, श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस.

चौकट

ट्रॅव्हल एजंटांना परवानगी द्यावी

रेल्वे, विमानसेवा सुरू आहे. मात्र, त्यासाठी तिकीट आरक्षण, नोंदणी करणे आवश्यक असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील संचारबंदीमुळे ट्रॅव्हल एजंटांना त्यांची कार्यालये बंद ठेवावी लागत आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी कोरोना नियम आणि काही दोन ते चार तास कार्यालय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे सदस्य बी. व्ही. वराडे यांनी केली.