शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कोल्हापूरचे रेल्वेस्थानक प्रवाशांनी फुल्ल

By admin | Updated: May 27, 2015 00:57 IST

आरक्षणासाठी रांगा : उन्हाळी सुटी संपवून प्रवासी परतीच्या मार्गावर

कोल्हापूर : उन्हाळी सुटी संपण्यास सुरुवात झाल्याने प्रवाशांना आता पुन्हा घरी परतण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे रेल्वेस्थानकासह एस. टी. बसस्थानक याठिकाणी प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. मंगळवारी कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे तिकीट आरक्षणासाठी रांगाच्या रांगा लागल्या होत्या.मध्य रेल्वेच्या अखत्यारीत कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस हे रेल्वेस्थानक येते. येथून रोज एक्स्प्रेस व पॅसेजर रेल्वेगाड्या जातात. सुटी सुरू झाल्यापासून आरक्षण खिडकीवर तिकीट घेण्यासाठी तोबाच्या तोबा गर्दी आहे. रोज सकाळी आठ ते दुपारी दोन व त्यानंतर अडीच ते रात्री आठ वाजेपर्यंत अशा तीन खिडक्यांवर तिकीट आरक्षणाची सोय आहे; पण तिकीट घेण्यासाठी पहाटे साडेपाच-सहा वाजल्यापासून रांगा असतात, तर रात्री आरक्षण कार्यालयाच्या दारातच काही प्रवासी तिकिटासाठी झोपलेले असतात, हे नित्याचेच चित्र आहे.दुसरीकडे, अनारक्षित तिकीट खिडकीवर प्रवाशांची संख्या वाढली आहे. या रेल्वेस्थानकावरून रोज सुटणाऱ्या १९ लांब पल्ल्याच्या गाड्यांना (एक्सप्रेस व पॅसेंजर मिळून) कोल्हापूर-सांगली, कोल्हापूर-मिरज, कोल्हापूर-पुणे, तर रात्री सुटणारी कोल्हापूर-सोलापूर प्रवाशांची गर्दी असते. त्याचबरोबर दुपारी एक वाजून २० मिनिटांनी राणी चन्नमा एक्सप्रेस (तिरूपतीला जाणारी) सुटते. याही रेल्वेला गर्दी असते, तर रात्री महालक्ष्मी एक्सप्रेस (कोल्हापूर ते मुंबई ) व सह्याद्री एक्सप्रेस (कोल्हापूर-मुंबई) या गाड्यांनाही कायम गर्दी असते. तिकीट आरक्षणासाठी सध्या तीन खिडक्या आहेत. पण, त्या अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे आरक्षण खिडक्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. मंगळवारी दुपारी एक वाजेपर्यंत प्रवासी भर उन्हात तिकीट आरक्षण कार्यालयाबाहेर रांगा लावून उभे होते. दुपारी दोन वाजल्यानंतर ही संख्या कमी झाली. परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांची गर्दी मोठी होती. (प्रतिनिधी)आॅनलाईन बुकिंगची सोय तरी गर्दीरेल्वे प्रशासनाने ग्राहकांच्या सोयीसाठी आॅनलाईन बुकिंग व्यवस्था सुरू केली आहे. त्याचबरोबर ९० दिवस (तीन महिने) अगोदर बुकिंग सेवाही उपलब्ध करून दिली आहे. पण, आॅनलाईन बुकिंग सुविधा असूनही आरक्षण तिकीट खिडकीवर प्रवाशांची तोबा गर्दी असते.