शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राफेल कागदपत्र चोरी ही गंभीर बाब- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 04:59 IST

आजवर केंद्र सरकारने राफेल विमान व्यवहारासंदर्भातील माहिती लपवून ठेवली.

कोल्हापूर : आजवर केंद्र सरकारने राफेल विमान व्यवहारासंदर्भातील माहिती लपवून ठेवली. आता राफेल व्यवहाराची कागदपत्रेच चोरीला गेल्याचे सरकार सांगत आहे. ही बाब अत्यंत गंभीर तसेच या संपूर्ण व्यवहारावरच संशय निर्माण करणारी असल्याचे राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटले आहे. पलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद झाल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारात व्यग्र होते, अशी टीकाही पवार यांनी केली.येथील राष्टÑवादी कॉँग्रेसचे बूथ अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी पवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. ते म्हणाले, जवानांच्या वाहनांवर जेव्हा हल्ला झाला, तेव्हा देशभरातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी लष्कराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला. मात्र सत्तेतील लोकच राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करत आहेत. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीत सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलाविली; पण पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, भाजपचे पक्षप्रमुख अशी मंडळी उपस्थित नव्हती. प्रधानमंत्री तर हल्ल्यानंतरही कामांची उद्घाटने करीत, पक्षाचा प्रचार करीत फिरत होते. तरीही आम्ही त्यावर टीका केली नाही. निवडणुका येतील, जातील. अशा कठीण प्रसंगात लष्कराच्या पाठीशी ठाम राहिले पाहिजे. दुर्दैवाने जवानांच्या त्यागाचा राजकीय लाभ उठविण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे, असे पवार म्हणाले.सरकारकडून जनतेची फसवणूकसरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या. त्या सगळ्या फसव्या निघाल्या आहेत. नोटाबंदी केल्यामुळे १५ लाख तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केली. कर्जाचा बोजा वाढतोय तशा आत्महत्याही वाढत आहेत. जानेवारी २०१५ पासून आजपर्यंत या सरकारच्या कारकिर्दीत ११ हजार ९९८ शेतकºयांनी आत्महत्या केल्या. ही आकडेवारी केवळ महाराष्टÑाची आहे. समुद्रात शिवछत्रपतींचे स्मारक बांधण्याचे आश्वासन दिले. इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले. पण त्यातही फसवणूक केली गेली, असे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRafale Dealराफेल डील