शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
3
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
4
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
5
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
6
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
7
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
8
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
9
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
12
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
13
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
14
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
15
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
16
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
17
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
18
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

राधानगरी तालुका - तलाठ्यांची रिक्त पदे त्रासदायक : आठ पदे दीर्घकाळापासून रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:48 IST

राधानगरी तालुक्यातील ११६ गावांसाठी महसूल विभागाचे ३८ सज्जे आहेत. मात्र, यासाठी ३0 तलाठी आहेत. यातील आठ पदे दीर्घकाळापासून रिक्त आहेत, तर दोन तलाठी दीर्घ रजेवर आहेत. त्यामुळे या गावांचा

ठळक मुद्दे कर्मचाऱ्यांची ससेहोलपट, ग्रामस्थांची गैरसोय

संजय पारकर ।राधानगरी : राधानगरी तालुक्यातील ११६ गावांसाठी महसूल विभागाचे ३८ सज्जे आहेत. मात्र, यासाठी ३0 तलाठी आहेत. यातील आठ पदे दीर्घकाळापासून रिक्त आहेत, तर दोन तलाठी दीर्घ रजेवर आहेत. त्यामुळे या गावांचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या तलाठी यांना मूळ कामकाज पाहत हे काम पाहावे लागत असल्याने त्यांची ससेहोलपट होत आहे.

तर लोकांनाही वेळेत आपली कामे होत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. आॅनलाईनसात-बारा यासह वाढलेले प्रचंड काम व यासाठी वरिष्ठ अधिकाºयांचा असलेला रेटा यामुळे सुखाची नोकरी म्हणून तलाठी झालेल्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

महसूल विभागाचा गाव पातळीवरील महत्त्वाचा दुवा म्हणून तलाठ्यांना महत्त्वाचे स्थान आहे. जमिनीच्या नोंदी असलेली सर्व कागदपत्रे हाताळणे, त्यातील फेरबदलाच्या नोंदी करणे, यासाठी असलेला शासनाचा कर वसूल करणे हे त्यांचे महत्त्वाचे काम असते. लोकांना घरबसल्या आपल्या जमिनीचे कागद पाहता यावेत यासाठी हे सर्व आॅनलाईन करण्याचे काम मागील पाच-सहा वर्षे सुरू होते. यासाठी मूलभूत गरज असलेले संगणक व इंटरनेट यांची पुरेशी उपलब्धता हे मोठे आव्हान होते. यासह असंख्य अडचणींना तोंड देत हे काम कसेतरी पूर्ण झाले आहे. मात्र, यात अजूनही अनेक त्रुट्या आहेत.

बदलत्या स्थितीत तलाठ्यांचे कामाचे स्वरूप बदलले आहे. शासनाने त्यांच्यावर अनेक जबाबदाºया लादल्या आहेत. एका सज्जात दोन ते आठ गावांचा समावेश असतो. शासनाच्या अनेक योजना व लोकांच्या कामासाठी तलाठ्यांचा दाखला आवश्यक असतो. अशावेळी इतक्या गावांचा कारभार पाहणाºया तलाठ्यांना शोधणे हे दिव्य असते. उतारे, दाखले आॅनलाईन द्यावे लागतात. मात्र, बीएसएनएलच्या इंटरनेटचा कमी वेग, वारंवार होणारा सर्व्हर डाऊन याचा व्यत्यय असतो. त्यामुळे दिवस-दिवस प्रतीक्षा करावी लागते. तालुक्यात एकाही तलाठ्याला स्वतंत्र कार्यालय नाही. असलेल्या जागेत लाईट, इंटरनेट असेलच याचा भरवसा नाही.काही मंडल कार्यालयांसाठी निधी मंजूर झाला आहे; पण जागेचा पत्ता नाही. राधानगरीत असलेल्या मंडल कार्यालयाची इमारत दोन वर्षांपूर्वी पावसाने पडली आहे.पिरळ, कौलव येथील तलाठी दीर्घ रजेवरसरवडे, सावर्डे पाठणकर, सोन्याची शिरोली, सिरसे, शिरगाव, बांबर्डे येथील तलाठी पदे रिक्त आहेत. तर पिरळ व कौलव येथील तलाठी दीर्घ रजेवर आहेत. सहापैकी एक मंडल अधिकारी पद रिक्त आहे. तालुक्यात ९८ ग्रामपंचायती, ११६ गावे, दोन लाखांच्या पुढे लोकसंख्या व ८९ हजार २३२ हेक्टर जमीन आहे. ४० हाजारांच्या पुढे कुटुंबे आहेत. तलाठ्यांना प्रत्येक सज्जात कार्यालय व अन्य सुविधा द्याव्यात, अशी मागणी होत आहे. यामुळे त्यांना सुरळीतपणे काम करता येईल व लोकांचीही कामे वेळेत होऊन त्यांना होणारा मनस्ताप कमी होईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार