शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राधानगरी तालुका - तलाठ्यांची रिक्त पदे त्रासदायक : आठ पदे दीर्घकाळापासून रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:48 IST

राधानगरी तालुक्यातील ११६ गावांसाठी महसूल विभागाचे ३८ सज्जे आहेत. मात्र, यासाठी ३0 तलाठी आहेत. यातील आठ पदे दीर्घकाळापासून रिक्त आहेत, तर दोन तलाठी दीर्घ रजेवर आहेत. त्यामुळे या गावांचा

ठळक मुद्दे कर्मचाऱ्यांची ससेहोलपट, ग्रामस्थांची गैरसोय

संजय पारकर ।राधानगरी : राधानगरी तालुक्यातील ११६ गावांसाठी महसूल विभागाचे ३८ सज्जे आहेत. मात्र, यासाठी ३0 तलाठी आहेत. यातील आठ पदे दीर्घकाळापासून रिक्त आहेत, तर दोन तलाठी दीर्घ रजेवर आहेत. त्यामुळे या गावांचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या तलाठी यांना मूळ कामकाज पाहत हे काम पाहावे लागत असल्याने त्यांची ससेहोलपट होत आहे.

तर लोकांनाही वेळेत आपली कामे होत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. आॅनलाईनसात-बारा यासह वाढलेले प्रचंड काम व यासाठी वरिष्ठ अधिकाºयांचा असलेला रेटा यामुळे सुखाची नोकरी म्हणून तलाठी झालेल्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

महसूल विभागाचा गाव पातळीवरील महत्त्वाचा दुवा म्हणून तलाठ्यांना महत्त्वाचे स्थान आहे. जमिनीच्या नोंदी असलेली सर्व कागदपत्रे हाताळणे, त्यातील फेरबदलाच्या नोंदी करणे, यासाठी असलेला शासनाचा कर वसूल करणे हे त्यांचे महत्त्वाचे काम असते. लोकांना घरबसल्या आपल्या जमिनीचे कागद पाहता यावेत यासाठी हे सर्व आॅनलाईन करण्याचे काम मागील पाच-सहा वर्षे सुरू होते. यासाठी मूलभूत गरज असलेले संगणक व इंटरनेट यांची पुरेशी उपलब्धता हे मोठे आव्हान होते. यासह असंख्य अडचणींना तोंड देत हे काम कसेतरी पूर्ण झाले आहे. मात्र, यात अजूनही अनेक त्रुट्या आहेत.

बदलत्या स्थितीत तलाठ्यांचे कामाचे स्वरूप बदलले आहे. शासनाने त्यांच्यावर अनेक जबाबदाºया लादल्या आहेत. एका सज्जात दोन ते आठ गावांचा समावेश असतो. शासनाच्या अनेक योजना व लोकांच्या कामासाठी तलाठ्यांचा दाखला आवश्यक असतो. अशावेळी इतक्या गावांचा कारभार पाहणाºया तलाठ्यांना शोधणे हे दिव्य असते. उतारे, दाखले आॅनलाईन द्यावे लागतात. मात्र, बीएसएनएलच्या इंटरनेटचा कमी वेग, वारंवार होणारा सर्व्हर डाऊन याचा व्यत्यय असतो. त्यामुळे दिवस-दिवस प्रतीक्षा करावी लागते. तालुक्यात एकाही तलाठ्याला स्वतंत्र कार्यालय नाही. असलेल्या जागेत लाईट, इंटरनेट असेलच याचा भरवसा नाही.काही मंडल कार्यालयांसाठी निधी मंजूर झाला आहे; पण जागेचा पत्ता नाही. राधानगरीत असलेल्या मंडल कार्यालयाची इमारत दोन वर्षांपूर्वी पावसाने पडली आहे.पिरळ, कौलव येथील तलाठी दीर्घ रजेवरसरवडे, सावर्डे पाठणकर, सोन्याची शिरोली, सिरसे, शिरगाव, बांबर्डे येथील तलाठी पदे रिक्त आहेत. तर पिरळ व कौलव येथील तलाठी दीर्घ रजेवर आहेत. सहापैकी एक मंडल अधिकारी पद रिक्त आहे. तालुक्यात ९८ ग्रामपंचायती, ११६ गावे, दोन लाखांच्या पुढे लोकसंख्या व ८९ हजार २३२ हेक्टर जमीन आहे. ४० हाजारांच्या पुढे कुटुंबे आहेत. तलाठ्यांना प्रत्येक सज्जात कार्यालय व अन्य सुविधा द्याव्यात, अशी मागणी होत आहे. यामुळे त्यांना सुरळीतपणे काम करता येईल व लोकांचीही कामे वेळेत होऊन त्यांना होणारा मनस्ताप कमी होईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार