शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

राधानगरी ग्रामपंचायत राबविणार सौर ऊर्जा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:20 IST

राधानगरी : गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या नळ योजनेच्या वीज बिलावर होणारा प्रचंड खर्च कमी करण्यासाठी राधानगरी ग्रामपंचायत सौर विजेचा ...

राधानगरी : गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या नळ योजनेच्या वीज बिलावर होणारा प्रचंड खर्च कमी करण्यासाठी राधानगरी ग्रामपंचायत सौर विजेचा वापर करणार आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाच्या वतीने हा प्रकल्प उभारण्यात येत असून, जिल्हा नियोजन मंडळाकडून 27.81 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा प्रकल्प राबविणारी कोल्हापूर विभागातील ही पहिली ग्रामपंचायत ठरणार आहे.

विजेच्या वाढत्या दरामुळे पाणी योजनेसाठी मोठा खर्च होतो. पाणीपट्टीच्या दरात मर्यादा असल्याने यातील उत्पन्न व खर्च याचे प्रमाण व्यस्त असते. त्यामुळे विजेची लाखो रुपये थकबाकी आहे.

तालुक्याचे ठिकाण व पूर्वीचा वाड्या-वस्त्यांचा विस्तारही मोठा आहे. राधानगरी धरणातून थेट पाणीपुरवठा योजना सुरू झाली असली तरी बहुतांश वस्ती धरणापेक्षा उंचवट्यावर आहे. परिणामी मोटारपंपाचा वापर करावाच लागतो. त्यामुळे दरमहा एक लाखाच्या घरात वीज बिल येते. यासह कर्मचारी पगार, देखभाल यासाठीही मोठा खर्च होतो.

त्यामुळे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. 50 किलोवॅट क्षमतेच्या या प्रकल्पावर नदीतील पाणी उपसा करणारे 25 व 15 एचपीचे दोन पंप चालतील. पावसाळ्याचे काही महिने सोडले तरी किमान 8 ते 9 महिने याद्वारे वीज मिळेल. त्यामुळे वर्षाला किमान आठ लाख रुपये वाचणार आहेत. एकदा उभारणी झाल्यावर किमान 25 वर्षे कसलाही खर्च येणार नाही. जिल्हा नियोजन मंडळाकडून यासाठी 27 लाख 81 हजार 236 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

प्रतिक्रिया

- वीज बिलावर मोठा खर्च होतो. प्रसंगी एखादे विकास काम बाजूला ठेवून तो करावा लागतो. त्यामुळे ग्रामपंचायतीने हा प्रकल्प हाती घेतला आहे. यातून शिल्लक राहणाऱ्या निधीतून गावातील विकास कामे करता येतील. यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांची मोठी मदत झाली. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व स्थानिक नेतेमंडळी यांचेही सहकार्य लाभले.

कविता दीपक शेट्टी सरपंच, राधानगरी.