शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानक अन् मार्गही बदला : राधाकृष्णन बी.

By admin | Updated: May 20, 2015 00:14 IST

वाहतूक कोंडीवर ‘गावाला वळसा’-- रस्ता सुरक्षा समिती बैठकीत प्रशासनाला सूचना

रत्नागिरी  : रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात विनाअपघात व सुरळीत वाहतुकीबरोबरच वाहतुकीचे नियम पाळले जावेत. रत्नागिरी बाजारपेठेत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून एस. टी.च्या ग्रामीण बसेससाठी रहाटाघर स्थानक करून या बसेस मिऱ्या-कोल्हापूर महामार्गाने नेण्यात याव्यात, असा अजब पर्याय जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सुचवला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आयोजित जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंंदे, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, एस. टी.चे विभाग नियंत्रक के. एस. देशमुख, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मारुती खोडके, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे एस. आर. देसाई उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. रत्नागिरी शहरातील रस्ता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली अतिक्रमणे हटवावीत. त्याचबरोबर मुख्य रस्त्यावरील पार्किगचा प्रश्न सोडविण्यासाठी सम-विषम तारखेला पार्किंगचा पर्याय अवलंबवावा. एक दिशा मार्गाबाबत आवश्यक सूचना फलक लावण्यात यावेत. अंतर्गत रस्ते मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या ठिकाणी असणारे रिक्षा थांबे काही अंतरावर स्थलांतरित करुन वाहतुकीची होणारी कोंडी व अपघात टाळावेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘नो आॅटो झोन’ जाहीर करावा, शहरातील आठवडा बाजारामुळे वाहतुकीची कोंडी होत असेल तर बाजार शिस्तबद्ध पद्धतीने भरविण्यासाठी नगरपरिषद आणि पोलीस यांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले. एस. टी. महामंडळाच्या बसेसमुळे एस. टी. आगारातून बसेस बाहेर पडताना होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील पर्यायी बसस्थानकाचा वापर करावा आणि बसेस मिऱ्या-कोल्हापूर महामार्गाने न्याव्यात, असे सांगतानाच गोगटे जोगळेकर महाविद्यालय रस्त्यावर होणारी बेशिस्त पार्किग रोखण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)वाहतूक कोंडीवर ‘गावाला वळसा’रोगापेक्षा इलाज भयंकर : बसेस गावाबाहेरून नेण्याचा अजब पर्यायरत्नागिरी : एस. टी. महामंडळाच्या बसेसमुळे आगारातून बसेस बाहेर पडताना होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील पर्यायी म्हणजेच रहाटाघर येथील बसस्थानकाचा वापर करून मिऱ्या कोल्हापूर महामार्गावरून बाहेर काढण्याचा अजब पर्याय जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सुचवला आहे. हा पर्याय म्हणजे ‘गावाला वळसा’ ठरणार आहे. प्रवाशी, व एस. टी. दोहोंनाही याचा भुर्दंड बसणार आहे.ग्रामीण भागातील व लांब पल्ल्याच्या गाड्या रहाटाघर बसस्थानक येथे हलविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरी बसस्थानक मात्र नियोजित ठिकाणी रहाणार आहे. वास्तविक मध्यवर्ती ठिकाणी हायटेक बसस्थानक मंजूर झाले आहे. १७ कोटीचा आराखडा असलेले बीओटी तत्वारील बसस्थानकाचे भूमिपूजन झाले आहे. आठ महिने लोटले तरी बांधकाम मात्र रखडले आहे. असे असताना बसस्थानक हलविण्याचा अजब पर्याय जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवला आहे.रहाटाघर बसस्थानक मध्यवर्ती बसस्थानकापासून लांब आहे. शिवाय येथून ग्रामीण व लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्याच्या सूचनेबरोबर मार्ग बदलण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रहाटाघर बसस्थानकातून बाहेर पडलेली बस मिऱ्या कोल्हापूर महामार्गावरून बाहेर काढण्याचा पर्याय जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी आयोजित बैठकीत सुचवला आहे. यामुळे रत्नागिरी शहरातील जयस्तंभ, माळनाका, मारूती मंदिर, शिवाजीनगर येथे कामासाठी आलेल्या प्रवाशांना बसमध्ये बसण्यासाठी साळवीस्टॉप येथे किंवा रहाटाघर येथे यावे लागणार आहे. तेथे पोहोचण्यासाठी रिक्षाला अनावश्यक पैसे मोजावे लागणार आहेत.शहरातील शाळा, महाविद्यालयात येणारे विद्यार्थी असो व नोकरदार मंडळी यांनाही गावाकडे जाण्यासाठी अधिकचा भुर्दंड पडणार आहे. शिवाय कोतवडे किंवा आरेवारे मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रहाटाघर किंवा परटवणे स्टॉप गाठावा लागणार आहे. एकूणच प्रवाशांना बसस्थानक हलविल्यास नाहक भुर्दंड बसणार आहे.बसस्थानक स्थलांतराबरोबर मार्ग बदलण्याचा निर्णय गोरगरीबांना खर्चिक आहे. प्रवासी भारमान कमी झाले तर त्याचा परिणाम एस. टी.च्या उत्पनावरही होऊ शकतो. याआधी तसा परिणाम झालेलाही आहे. म्हणूनच रहाटाघरऐवजी गाड्या पुन्हा मूळ स्थानकातून सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. (प्रतिनिधी)