शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

बसस्थानक अन् मार्गही बदला : राधाकृष्णन बी.

By admin | Updated: May 20, 2015 00:14 IST

वाहतूक कोंडीवर ‘गावाला वळसा’-- रस्ता सुरक्षा समिती बैठकीत प्रशासनाला सूचना

रत्नागिरी  : रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात विनाअपघात व सुरळीत वाहतुकीबरोबरच वाहतुकीचे नियम पाळले जावेत. रत्नागिरी बाजारपेठेत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून एस. टी.च्या ग्रामीण बसेससाठी रहाटाघर स्थानक करून या बसेस मिऱ्या-कोल्हापूर महामार्गाने नेण्यात याव्यात, असा अजब पर्याय जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सुचवला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आयोजित जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंंदे, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, एस. टी.चे विभाग नियंत्रक के. एस. देशमुख, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मारुती खोडके, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे एस. आर. देसाई उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. रत्नागिरी शहरातील रस्ता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली अतिक्रमणे हटवावीत. त्याचबरोबर मुख्य रस्त्यावरील पार्किगचा प्रश्न सोडविण्यासाठी सम-विषम तारखेला पार्किंगचा पर्याय अवलंबवावा. एक दिशा मार्गाबाबत आवश्यक सूचना फलक लावण्यात यावेत. अंतर्गत रस्ते मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या ठिकाणी असणारे रिक्षा थांबे काही अंतरावर स्थलांतरित करुन वाहतुकीची होणारी कोंडी व अपघात टाळावेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘नो आॅटो झोन’ जाहीर करावा, शहरातील आठवडा बाजारामुळे वाहतुकीची कोंडी होत असेल तर बाजार शिस्तबद्ध पद्धतीने भरविण्यासाठी नगरपरिषद आणि पोलीस यांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले. एस. टी. महामंडळाच्या बसेसमुळे एस. टी. आगारातून बसेस बाहेर पडताना होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील पर्यायी बसस्थानकाचा वापर करावा आणि बसेस मिऱ्या-कोल्हापूर महामार्गाने न्याव्यात, असे सांगतानाच गोगटे जोगळेकर महाविद्यालय रस्त्यावर होणारी बेशिस्त पार्किग रोखण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)वाहतूक कोंडीवर ‘गावाला वळसा’रोगापेक्षा इलाज भयंकर : बसेस गावाबाहेरून नेण्याचा अजब पर्यायरत्नागिरी : एस. टी. महामंडळाच्या बसेसमुळे आगारातून बसेस बाहेर पडताना होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील पर्यायी म्हणजेच रहाटाघर येथील बसस्थानकाचा वापर करून मिऱ्या कोल्हापूर महामार्गावरून बाहेर काढण्याचा अजब पर्याय जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सुचवला आहे. हा पर्याय म्हणजे ‘गावाला वळसा’ ठरणार आहे. प्रवाशी, व एस. टी. दोहोंनाही याचा भुर्दंड बसणार आहे.ग्रामीण भागातील व लांब पल्ल्याच्या गाड्या रहाटाघर बसस्थानक येथे हलविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरी बसस्थानक मात्र नियोजित ठिकाणी रहाणार आहे. वास्तविक मध्यवर्ती ठिकाणी हायटेक बसस्थानक मंजूर झाले आहे. १७ कोटीचा आराखडा असलेले बीओटी तत्वारील बसस्थानकाचे भूमिपूजन झाले आहे. आठ महिने लोटले तरी बांधकाम मात्र रखडले आहे. असे असताना बसस्थानक हलविण्याचा अजब पर्याय जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवला आहे.रहाटाघर बसस्थानक मध्यवर्ती बसस्थानकापासून लांब आहे. शिवाय येथून ग्रामीण व लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्याच्या सूचनेबरोबर मार्ग बदलण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रहाटाघर बसस्थानकातून बाहेर पडलेली बस मिऱ्या कोल्हापूर महामार्गावरून बाहेर काढण्याचा पर्याय जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी आयोजित बैठकीत सुचवला आहे. यामुळे रत्नागिरी शहरातील जयस्तंभ, माळनाका, मारूती मंदिर, शिवाजीनगर येथे कामासाठी आलेल्या प्रवाशांना बसमध्ये बसण्यासाठी साळवीस्टॉप येथे किंवा रहाटाघर येथे यावे लागणार आहे. तेथे पोहोचण्यासाठी रिक्षाला अनावश्यक पैसे मोजावे लागणार आहेत.शहरातील शाळा, महाविद्यालयात येणारे विद्यार्थी असो व नोकरदार मंडळी यांनाही गावाकडे जाण्यासाठी अधिकचा भुर्दंड पडणार आहे. शिवाय कोतवडे किंवा आरेवारे मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रहाटाघर किंवा परटवणे स्टॉप गाठावा लागणार आहे. एकूणच प्रवाशांना बसस्थानक हलविल्यास नाहक भुर्दंड बसणार आहे.बसस्थानक स्थलांतराबरोबर मार्ग बदलण्याचा निर्णय गोरगरीबांना खर्चिक आहे. प्रवासी भारमान कमी झाले तर त्याचा परिणाम एस. टी.च्या उत्पनावरही होऊ शकतो. याआधी तसा परिणाम झालेलाही आहे. म्हणूनच रहाटाघरऐवजी गाड्या पुन्हा मूळ स्थानकातून सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. (प्रतिनिधी)