शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
2
Video : पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
3
BSE Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!
4
संतापजनक! ६ मुलं तरी मुखाग्नीसाठी ६ तास थांबले, अंत्यसंस्कारावेळी संपत्तीवरुन स्मशानभूमीत भिडले
5
हत्या की अपघात? रस्त्यावर स्कूटी, शेतात चप्पल... बेपत्ता बँक मॅनेजरचा विहिरीत सापडला मृतदेह
6
जम्मू-काश्मीरमधील दोडामध्ये भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेले वाहन दरीत कोसळले; सात जणांचा मृत्यू
7
Bread Gulabjam: उरलेल्या ब्रेडच्या स्लाईजपासून १० मिनिटात करा मऊ रसरशीत गुलाबजाम! 
8
"मी एक मोठा सिनेमा करतोय...भाऊ कदम अन् 'हा' अभिनेता दिसणार"; निलेश साबळेचा खुलासा
9
टाटाचा 'हा' स्टॉक ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर! गुंतवणूकदार मालामाल, तुम्ही खरेदी केलाय का?
10
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
11
कुतुहलापोटी रेल्वे इंजिन बघायला वर चढला, पण हाय पॉवर केबलचा करंट जीवावर बेतला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
12
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
13
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!
14
"तो लहान मुलगा म्हणाला मी उंदीर खाल्ला...", 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्रीने सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव
15
DMR Stock Price: ५ वर ८ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरची किंमत २०० रुपयांपेक्षाही कमी, स्टॉकमध्ये १४ टक्क्यांपेक्षाही अधिक तेजी
16
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
17
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
18
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
19
वाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; एकाचवेळी दोन दिग्गज कंपन्या भारतात एन्ट्री करणार
20
निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आणखी एक आशेचा किरण! येमेनच्या बंद खोलीत चर्चा सुरू

राधानगरी-निपाणी राज्यमार्ग बनतोय मृत्यूचा सापळा

By admin | Updated: May 15, 2015 23:37 IST

वाहतुकीसाठी धोकादायक : साडेचार वर्षांत ३२ जण ठार, तर १३६ जण जखमी; दिशादर्शक फलक, संरक्षक कठडे नाहीत

रमेश वारके -बोरवडे- राधानगरी-निपाणी हा राज्यमार्ग वाहतुकीच्यादृष्टीने धोकादायक बनत आहे. या रस्त्यावरील अपघातात दिवसेंदिवस वाढ होत असून, गेल्या साडेचार वर्षांपासून एप्रिल २०१५ अखेर झालेल्या अपघातात ३२ जण ठार झाले आहेत, तर १३६ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३१ पुरुष आणि एका स्त्रीचा समावेश असून, जखमींमध्ये १२१ पुरुष, १० स्त्रिया व पाच लहान मुलांचा समावेश आहे. त्यामुळे राधानगरी-निपाणी हा राज्यमार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.राधानगरी-निपाणी हा राज्यमार्ग नेहमीच वाहतुकीच्यादृष्टीने गजबजलेला आहे. या मार्गावरून प्रवास करताना प्रवासीवर्गाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. किंबहुना, पादचारी लोकांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. कोकणातून फोंडाघाटमार्गे राधानगरी-निपाणी मार्गावरून बेळगावकडे जाणारी वाहनेही मोठ्या संख्येने आहेत. या मार्गावर झालेल्या अपघातांची कारणे वेगवेगळी आहेत. भरधाव वेगाने होणारी बॉक्साईटची जीवघेणी वाहतूक, मर्यादेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक, तीव्र वळणे, या वळणावर नसलेले दिशादर्शक फलक, अनेक मोहऱ्यांवरती नसलेले संरक्षक कठडे, चालकांचे चाललेले मोबाईलवरील संभाषण, अशी अनेक कारणे अपघातास कारणीभूत ठरली आहेत. अनेक अपघातात बॉक्साईट वाहतूक करणाऱ्या ट्रकवर ताडपद्री नसल्याने डोळ्यांत कण जाऊन डोळ्यांना जखमा झाल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील अपघात टाळायचे असतील, तर सार्वजनिक बांधकाम विभागाबरोबरच वाहतूक विभागानेही काटेकोरपणे नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. या मार्गावर वाहने इतकी वेगात असतात की, प्रवासी वर्गाला प्रवास करताना फार मोठी कसरत करावी लागत आहे. दुचाकी वाहनांचा वेगही मोठ्या प्रमाणात असून, वळणावरून जाताना अंदाज न आल्याने अपघात होणे, त्याचबरोबर ओव्हरटेक करतानाही चालकांनी काळजी न घेतल्याने अपघात झाल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे.या मार्गावर २०११ मध्ये मुरगूड पोलीस ठाण्यात २९ अपघातांची नोंद झाली असून, यामध्ये ट्रक-ट्रॅक्टर अपघातात चार पुरुष, मोटारसायकल-चारचाकी अपघातात एक पुरुष व एका स्त्रीचा मृत्यू झाला आहे . तर ३६ पुरुष, दोन स्त्रिया व एक लहान मुलगा जखमी झाला आहे. २०१२ मध्ये ३८ अपघातांची नोंद झाली असून, यामध्ये ट्रक-ट्रॅक्टरच्या अपघातात तीन, तर दुचाकी व चारचाकी अपघातात आठ पुरुष मृत झाले आहेत. तर २५ पुरुष व एका स्त्रिचा जखमींमध्ये समावेश आहे.२०१३ मध्ये ४२ अपघातांची नोंद झाली असून, ट्रक-ट्रॅक्टरच्या अपघातात दोन, तर दुचाकी व चारचाकी अपघातात चार पुरुषांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३८ पुरुष, तीन स्त्रिया, तीन लहान मुले जखमी झाली आहेत. २०१४ मध्ये २२ अपघातांची नोंद झाली असून, ट्रक-ट्रॅक्टरच्या अपघातात दोन, तर दुचाकी-चारचाकी अपघातात सहा पुरुषांचा मृत्यू झाला असून, जखमींमध्ये १२ पुरुष, दोन महिला व एका मुलाचा समावेश आहे. एप्रिल २०१५ पर्यंत आठ अपघातांची नोंद झाली असून, दुचाकी अपघातात एक पुरुष मृत झाला असून, दोन पुरुष व एका स्त्रीचा जखमींमध्ये समावेश आहे.वाहन चालवित असताना चालक मोबाईलवर बोलण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. वळणावर व पुढेही वाहन चालवित असताना वेगावर नियंत्रण ठेवावे. लहान मुलांच्या हाती गाड्या देऊ नयेत.- तुकाराम सूर्यवंशी, वाहतूक पोलीस नियंत्रकया मार्गावर अनेक वळणे असून, वाहनांचा वेग जास्त असतो. त्यामुळे वळणावर ओव्हरटेक करण्याचे प्रमाण खूप असल्याने अपघात होतात. जीव धोक्यात घालून येथे प्रवास करावा लागत आहे. चालकांनी वाहन नियंत्रित चालवून अपघात टाळावेत. - एम. आर. फराकटे, स्थानिक रहिवाशी