शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

रा. कृ. कणबरकर यांचे निधन

By admin | Updated: April 14, 2015 01:24 IST

ज्ञानतपस्वी : कोल्हापुरात आज अंत्यसंस्कार

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्ञानतपस्वी रा. कृ. कणबरकर (वय ९४) यांचे सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास भोगावती (ता. करवीर) येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रांवर शोककळा पसरली आहे. कणबरकर यांच्या पश्चात पत्नी शालिनी, मुलगा डॉ. अरुण, मुली डॉ. अंजली साबळे, मेघा वागळे, डॉ. नमिता खोत, सून डॉ. सुवर्णा यांच्यासह जावई, नातवंडे असा परिवार आहे. आज, मंगळवारी सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवाची आयटीआयसमोरील नाळे कॉलनी येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार असून, पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. रा. कृ. कणबरकर हे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचे चिरंजीव डॉ. अरुण यांच्याकडे भोगावती येथे राहत होते. या ठिकाणीच सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव कोल्हापुरात आणण्यात आले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या नातेवाइकांसह त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना शोक अनावर झाला. कणबरकर यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानापासून सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यानंतर पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. रा. कृ. कणबरकर हे मूळचे बेळगाव येथील. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरातील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण राजाराम महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सातारा येथील शिवाजी कॉलेज येथे व्याख्याता म्हणून आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली. नंतर ते कऱ्हाडच्या एस. जी. एम. महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य झाले. त्यानंतर त्यांनी उस्मानाबादच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे, कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयाचे, तसेच न्यू कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम केले. तेथून त्यांची १९८० साली शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नेमणूक झाली. कुलगुरुपदाच्या कारकिर्दीत त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध शैक्षणिक समित्यांवर काम केले. येथून ते १९८३ साली निवृत्त झाले. कणबरकर यांना शासनाचा राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाला होता. शाहू मेमोरियल ट्रस्टचे ते २५ वर्षे विश्वस्त म्हणून काम पाहत होते. त्यांना सन्मानाचा ‘शाहू’ पुुरस्कारही मिळाला होता. त्यांनी बाबूराव धारवाडे यांच्यासमवेत भाई माधवराव बागल विद्यापीठाची स्थापना केली. सध्या ते ताराराणी विद्यापीठाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. (प्रतिनिधी)