शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

रा. कृ. कणबरकर यांचे निधन

By admin | Updated: April 14, 2015 01:24 IST

ज्ञानतपस्वी : कोल्हापुरात आज अंत्यसंस्कार

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्ञानतपस्वी रा. कृ. कणबरकर (वय ९४) यांचे सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास भोगावती (ता. करवीर) येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रांवर शोककळा पसरली आहे. कणबरकर यांच्या पश्चात पत्नी शालिनी, मुलगा डॉ. अरुण, मुली डॉ. अंजली साबळे, मेघा वागळे, डॉ. नमिता खोत, सून डॉ. सुवर्णा यांच्यासह जावई, नातवंडे असा परिवार आहे. आज, मंगळवारी सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवाची आयटीआयसमोरील नाळे कॉलनी येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार असून, पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. रा. कृ. कणबरकर हे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचे चिरंजीव डॉ. अरुण यांच्याकडे भोगावती येथे राहत होते. या ठिकाणीच सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव कोल्हापुरात आणण्यात आले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या नातेवाइकांसह त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना शोक अनावर झाला. कणबरकर यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानापासून सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यानंतर पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. रा. कृ. कणबरकर हे मूळचे बेळगाव येथील. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरातील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण राजाराम महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सातारा येथील शिवाजी कॉलेज येथे व्याख्याता म्हणून आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली. नंतर ते कऱ्हाडच्या एस. जी. एम. महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य झाले. त्यानंतर त्यांनी उस्मानाबादच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे, कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयाचे, तसेच न्यू कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम केले. तेथून त्यांची १९८० साली शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नेमणूक झाली. कुलगुरुपदाच्या कारकिर्दीत त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध शैक्षणिक समित्यांवर काम केले. येथून ते १९८३ साली निवृत्त झाले. कणबरकर यांना शासनाचा राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाला होता. शाहू मेमोरियल ट्रस्टचे ते २५ वर्षे विश्वस्त म्हणून काम पाहत होते. त्यांना सन्मानाचा ‘शाहू’ पुुरस्कारही मिळाला होता. त्यांनी बाबूराव धारवाडे यांच्यासमवेत भाई माधवराव बागल विद्यापीठाची स्थापना केली. सध्या ते ताराराणी विद्यापीठाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. (प्रतिनिधी)