शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आर. के. नगर नाक्यावर ओसंडून वाहतोय कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:23 IST

ज्योती पाटील पाचगाव : एकीकडे स्वच्छतेसाठी प्रशासनाकडून उपदेशांचे डोस दिले जात असले तरी आर.के. नगर नाक्यावरील कचऱ्याचे ढीग ...

ज्योती पाटील

पाचगाव : एकीकडे स्वच्छतेसाठी प्रशासनाकडून उपदेशांचे डोस दिले जात असले तरी आर.के. नगर नाक्यावरील कचऱ्याचे ढीग पाहिल्यावर मात्र, प्रशासनाची ही संवेदनशीलता कुठे हरवली आहे असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. आर. के. नाक्यावर गेल्या कित्येक दिवसांपासून मोठाले ढीग साचले आहेत. हा कचरा रस्त्यावर ओसंडून वाहत आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याने या परिसरात कचऱ्याची दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे हे कचऱ्याचे ढीग प्रशासन कधी उचलणार असा सवाल येथील नागरिकांमधून उपस्थित होत आहे. कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या आर. के. नगरसह उपनगर भागात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या या भागात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कचराकुंड्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. दिवसागणिक गोळा होणारा कचरा वेळेत उठाव न केल्याने इतरत्र पसरला जातो. अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर व मुख्य चौकातच कचराकुंड्या ठेवल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. शिवाय या कचऱ्याची दुर्गंधी सुटल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. अनेक कचराकुंड्यांमध्ये कचरा साचून राहिल्याने या ठिकाणी कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. अनेकदा ही कुत्री वाहनधारक आणि पादचाऱ्यांवरही हल्ला करीत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर कचरा प्रशासनाने तत्काळ उचलावा अशी मागणी होत आहे.

चौकट : हद्दीचा वाद...कचरा रस्त्यावरच

या रस्त्याचा काही भाग महापालिकेच्या हद्दीत येतो तर काही भाग पाचगाव व मोरेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. त्यामुळे नेमका कचरा कुणी उचलायचा या वादातच येथील कचरा पडून आहे. या परिसरातील बहुतेकजण नोकरदार असल्याने कामानिमित्त सकाळी बाहेर पडताना कचऱ्याची पिशवी घेऊन ते जाता-जाताच रस्त्याकडेला भिरकावत असतात.

कोट : आर. के. नगर नाक्यावर रस्त्याशेजारी कचऱ्याचे मोठे ढीग लागल्याने वाहनधारकांना व येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना याचा खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अनेकांच्या आरोग्याच्या तक्रारीही वाढले आहेत. याकडे संबंधित प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावावा.

- भिकाजी भिलुगडे, नागरिक मोरेवाडी.

कोट : नागरिकांनी रस्त्यावर कचरा न टाकता ग्रामपंचायत कर्मचारी ज्यावेळी घंटागाडी घेऊन येतात. त्यावेळी कचरा देऊन सहकार्य करावे. तसेच रस्त्यावर टाकलेला कचरा लवकरच उचलू. - अमर मोरे, माजी सरपंच, मोरेवाड.