शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

भाव ज्याचे गाठी। त्यासी लाभ उठा उठी।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 23:30 IST

इंद्रजित देशमुख माणसाची कर्मे चार गोष्टींनी पूर्ण होतात. कर्मातील भाव, कर्मातील विचार, कर्माची वाणी आणि कर्माची कृती. म्हणजे भाव, ...

इंद्रजित देशमुखमाणसाची कर्मे चार गोष्टींनी पूर्ण होतात. कर्मातील भाव, कर्मातील विचार, कर्माची वाणी आणि कर्माची कृती. म्हणजे भाव, विचार, वाणी आणि कृती यांनी कर्म बनते. यातील भाव हा सर्वांत सूक्ष्म असतो. कारण भाव जितका शुद्ध तितके कर्म चांगले. ईश्वर प्राप्तीसुद्धा भावानेच प्राप्त होते. संपूर्ण पालखी सोहळा भावानेच तोलून भरला आहे. बुद्धी भेद निर्माण करते, पण भाव माणसाला एकत्र आणतो. विठ्ठल नामाने भरलेली हृदये या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. ध्येय ध्याता एकच असतो विठ्ठल विठ्ठल आणि विठ्ठल. तो सोबत आहे. आता पावसाच्या सरीवर सरी सुरू आहेत, पण पावलांना थांबणे ठाऊक नाही. माउलीच्या सोबत चालणे सुरूच आहे. निष्ठावंत वारकरी माउलीसोबतच चालतात, माउलीसोबतच थांबतात. माउली विश्रांती घेतात तेव्हाच ते विश्रांती घेतात. चालणं, जागरणं, अत्यवस्था याची कोणतीही फिकीर नाही. कारण त्यांची श्रद्धा सांगते.भाव ज्याचे गाठी।त्यासी लाभ उठा उठी।संत वचनाप्रमाणे भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठाउठी. आधुनिक मानसशास्त्रात बुद्ध्यांकाबरोबर व्यक्तीस भावनांक असेल तरच व्यक्तिमत्त्व परिपूर्ण होते, हे सिद्ध होत आहे. भाव हा हृदयाचा आधार आहे. भावाने ओतप्रोत भरलेल्या भक्तास दुसरे काही सुचत नाही. त्याला सर्वत्र तोच दिसतो. त्याच्या चालण्या, बोलण्या-वागण्यात, मनात, स्वप्नात तोच असतो.पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी।जागृती स्वप्नी पांडुरंग। ससंगतु।जळी, स्थळी, चर, अचरात भरलेला देव हा भावानेच प्राप्त होतो. भाव जेवढा घनदाट तेवढी मानसिकता उच्चस्तरीय असते. भावानेच साधनेला गती आणि परिपक्वता प्राप्त होते. भावाची घनता वाढली की, दिव्यत्वाला सुरुवात होते. निर्दोष जगण्यास सुरुवात होते. भाव दिव्यत्वाच्या राज्यात प्रवेश करण्याचे महाद्वार आहे.भावेविण देव न कळे संदेह। किंवाभाव बले आकळे येºहवी नाकळी।करतळी आवळे तैसा हरी।या हरिपाठातील वर्णनानुसार तो आकळता येतो.भावाचे अंतरंग सर्वार्थाने समजण्यासाठी अलीकडे इंदिरा संतांची एक छान कविता वाचण्यात आली. ‘कुब्जा’ या कवितेत इंदिरा संत लिहितात, अजून पहाट व्हायची आहे आणि अशा अवेळी कुब्जा दासी मथुरेच्या बाजूने यमुनेमध्ये उतरली आहे. ती कुरुप आहे, पण तिचे भावविश्व भगवंताने व्यापून राहिले आहे. ती पाण्यात उतरते आहे. तेव्हा पहाट वारा भणभणतोय, सारी सृष्टी झोपली आहे आणि अशावेळी पैलतीरावरून बासरीचा आवाज येतो आहे. भगवंताची बासरी ही फक्त राधेसाठी असते, गोकुळवासीयांसाठी असते ते तिला माहीत आहे, पण अजूनही जागी नाही राधा, अजूनही जागे नाही गोकुळ. मग ही बासरी कुणासाठी वाजते आहे. असे क्षणभर तिला वाटते, पण तिच्या लक्षात येते तो मुरलीरव फक्त मजचिस्तव आहे आणि ती आनंदाने भरत जाते. भगवंत सर्वांवर प्रेम करतो मग मी दासी आहे, कुरुप आहे. तो माझ्यासाठीसुद्धा वाजवतो, जागा राहतो. हा भाव दाटून तिची सारी कुरुपता नष्ट होते. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. देवाला भक्ताचा निस्सीम भाव सोगावा लागला नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी शब्दांचीच गरज असते असे नाही आणि कुरुपतेचा आणि दिव्यभावाचा काही संबंधच नसतो.शुद्ध ज्याचा भाव झाला।दुरी नाही देव त्याला।किंवा संतवचनाप्रमाणेभावे गावे गीत।शुद्ध करोनिया चित्त।।तुज व्हावा आहे देव ।तरी हा सुलभ उपाय।जो तारणहार आहे, त्याच्याविषयी मानवी जगतात भाव असतोच; परंतु प्राणी जगतातसुद्धा अनाकलनीय भाव असतो. ‘लॉरेन्स अ‍ॅन्थनी’ नावाचा वन्यप्राण्यावर प्रेम करणारा दक्षिण आफ्रिकेतील एक माणूस. हा ७ मार्च २०१२ रोजी मरण पावला. त्याचे हत्तीवर विशेष प्रेम होते. त्याने वाचवलेले ३१ हत्ती जंगलातून २० कि. मी.चा प्रवास करून लॉरेन्स यांच्या दारात येऊन पोहोचले. त्यांच्या अंगणात २ दिवस २ रात्री न काही खाता पिता राहिले आणि तसेच निघून गेले. आपल्या तारणहारास मानवंदना देण्यासाठी ही मुकी जनावरे कशी आली असतील. त्यांना लॉरेन्सचा मृत्यू कुणी सांगितला असेल हे सारे आश्चर्यकारक आहे. त्यांच्या ठायी असलेला कृतज्ञतेचा उच्चतम भाव त्यांना तिथंपर्यंत घेऊन आला.(लेखक संत साहित्याचेअभ्यासक आहेत.)