शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

साखर कारखान्यांसाठी पुन्हा कोटा पद्धत!

By admin | Updated: July 30, 2016 00:47 IST

साठ्यावरही नियंत्रण : साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राच्या हालचाली

चंद्रकांत कित्तुरे -- कोल्हापूर --बाजारातील साखरेचे वाढते भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर कारखान्यांमधील साखरेच्या साठ्यावर नियंत्रण आणण्याचा आणि दर महिन्याला साखरेचा कोटा ठरवून देण्यावर केंद्र सरकार गंभीरपणे विचार करत आहे. १ आॅगस्टपासूनच हे निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास अंशत: नियंत्रणमुक्त झालेला साखर उद्योग पुन्हा सरकारी नियंत्रणाखाली येणार आहे. खुल्या बाजारातील साखरेचे दर प्रतिकिलो ४० रुपयांवर जाऊ नयेत, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. काही महिन्यांपूर्वी साखरेचे दर वाढू लागल्याने सरकारने साखर कारखान्यांना दिलेला निर्यात कोटा मध्येच थांबवून निर्यात अनुदानही बंद केले होते.तसेच साखरेच्या निर्यातीवर २० टक्के कर लागू केला होता. त्यामुळे बाजारातील दर बऱ्यापैकी स्थिर होते. मात्र, गेल्या काही दिवसांत हे दर पुन्हा वाढत आहेत. महाराष्ट्रात शुक्रवारी ते ३४०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल या दरम्यान होते, तर दिल्लीत खुल्या बाजारातील साखरेचा किरकोळ विक्री दर ४३ रुपये प्रतिकिलो आहे. या वाढत्या दराची गंभीर दखल घेऊन केंद्रीय अन्न सचिव वीरेंद्र सरुप यांनी गुरुवारी साखर उत्पादक आणि उपभोक्ते असलेल्या राज्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून साखर दराच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतला. महाराष्ट्रातील कारखान्यामुळेच..साखर कारखानदारांनी उत्पादित साखर मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवल्याने मागणी व पुरवठ्यात तफावत होऊन दर वाढत आहेत. साखरेचे दर वाढतील, या अपेक्षेने साखर कारखान्यांनी आपल्याकडील साखरेची विक्री न करता ती साठा करून ठेवली आहे. यात महाराष्ट्रातील साखर कारखाने आघाडीवर आहेत. अनेक कारखान्यांनी उत्पादित सुमारे ८० टक्क्यांपर्यंत साखर गोदामातच साठा करून ठेवली आहे. अन्य राज्यांत अशी परिस्थिती नाही. महाराष्ट्रमुळेच ही परिस्थती ओढवल्याचे केंद्रातील अधिकाऱ्यांचे मत बनले आहे. यामुळेच कारखान्यांकडील साखरेच्या साठ्यावर नियंत्रण आणण्याचा आणि दर महिन्याला किती साखर विक्री करावयाची याचा कोटा ठरवून देण्याचा विचार अन्न मंत्रालयाने सुरू केला आहे. केंद्राने २०१३ साली हा उद्योग अंशत: नियंत्रणमुक्त केला, त्यावेळी ही कोटा पद्धत रद्द झाली होती. आता ती पुन्हा येण्याची शक्यता आहे.अन्य पर्यायांचाही विचारयाशिवाय केंद्रापुढे साखरेचे दर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्य चार पर्याय आहेत. त्यामध्ये आयात कर कमी करणे, आयातदारांना कच्ची साखर व्हाईट करून ती परत परदेशात पाठविण्यासाठी असलेला ९० दिवसांचा कालावधी १ वर्षाचा करणे, एनसीडीएक्स म्हणजेच वायदेबाजार बंद करणे तसेच ज्या मल्टिनॅशनल कंपन्यांचे भारतात प्रकल्प आहेत, त्यांनी आपल्या उत्पादनासाठी लागणारी देशांतर्गत उत्पादित साखर न वापरता ती परदेशातूनच आणणे यांचा समावेश आहे. व्यापाऱ्यांवर साठा मर्यादासध्या व्यापारी आणि घाऊक विक्रेते यांना ५०० मेट्रिक टन इतकाच साखरेचा साठा करता येतो. तसे त्यांच्यावर बंधन आहे. कोलकात्यात ही साठा मर्यादा १००० टन आहे. साखर कारखान्यांवर मात्र असे कोणतेही बंधन नाही.१ आॅगस्टपासून अंमल शक्ययाशिवाय केंद्र सरकारकडून साखरेचे दर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्य चार पर्यायांवरही विचार सुरू असला तरी देशातील उत्पादित साखर आणि तिचा साठा याची आकडेवारी सरकारकडे उपलब्ध असल्याने तातडीची उपाययोजना म्हणून साखर कारखान्यांसाठी साठा आणि कोटा पद्धत लागू करण्याचा निर्णयच प्राधान्याने होऊ शकतो. कदाचित १ आॅगस्टपासूनच तो लागू होण्याची शक्यता आहे. व्यापारीही कारणीभूतगेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशातील साखरेचे उत्पादन कमी झाले २५ लाख टनांनी कमी झाले आहे. १२०१६-१७च्या हंगामात त्यात आणखी घट होऊन ती २३ ते २३.५ लाख टनापर्यंत राहण्याची शक्यता आहे. यामुळे साखरेचे दर व्यापाऱ्यांकडून वाढविले जात आहे. त्याचप्रमाणे साखरेवर निर्यात कर वाढल्याने तिची निर्यात जवळजवळ बंद झाली आहे. दर वाढल्यास आयात कर कमी करण्याचा उपाय सरकार अवलंबेल आणि साखरेची आयात सुरू होऊन आपला आयात-निर्यातीचा व्यवसाय सुरळीत चालू राहील या उद्देशानेही बड्या व्यापाऱ्यांकडून वायदेबाजारातील साखरेचे दर वाढविले जात असल्याची चर्चा आहे.