शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
2
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
5
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
6
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
7
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
8
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
9
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
10
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
11
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
12
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
13
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
14
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
15
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
16
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
17
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
18
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
19
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
20
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली

बाजारभोगाव पश्चिम भागातील प्रश्न ‘जैसे थे’

By admin | Updated: June 29, 2015 00:15 IST

पडसाली घाटाचा प्रश्न चर्चेत : रस्त्यांची दुरवस्था, शेती धोक्यात

राम करले- बाजारभोगाव -बाजारभोगाव पश्चिम भागातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था, गेल्या अनेक वर्षांपासून भिजत पडलेल्या पडसाळी घाटाचा तसेच मोबाईल टॉवरचा प्रश्न यामुळे जनतेत शासनाच्या उदासीन कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. बाजारभोगाव पश्चिम भागात पडसाळी-वाशी हे मुख्य मार्ग आहेत. पडसाळी मार्गावर लाखो रुपयांचा चुराडा करूनदेखील हा मार्ग खड्ड्यांच्या समस्येतून मुक्त झालेला नाही. वाशी रस्ता आघाडी सरकारच्या काळात पंतप्रधान सडक योजनेतून करण्यात आला. मात्र, निकृष्ट कामामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरील ओढ्यांवर मोऱ्या काही आवश्यक ठिकाणी बांधलेल्या नसल्याने पावसाळी हंगाम म्हणजे येथील लोकांना डोकेदुखी ठरत आहे. पिसात्री, आढाववाडी, सुबेवाडीजवळ मोऱ्या बांधण्याची मागणी ‘कुंभी’चे संचालक प्रकाश पाटील यांनी केली आहे. तरीही प्रशासनाने याकडे कानाडोळा केला आहे. रस्त्याच्या दुर्दशेचा भोग कधी सुटणार, हा खरा प्रश्न आहे.येथील लोकांना किमान पायाभूत सुविधा देऊन न्याय द्यावा, अशी मापक अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मोबाईल टॉवर नसल्याने अनेक गैरसोयीकोलिक, चाफेवाडी, गोठणे, वाशी, आढाववाडी, खापणेवाडी, गुरववाडी, पिसात्री, सोनारवाडी, पोबरे, सुंबेवाडी, आदी गावांमध्ये मोबाईल सेवा नसल्याने येथील ग्रामस्थांना अनेक गैरसोयींचा सामना नेहमीच करावा लागतो. खासदार धनंजय महाडिक यांनी काळजवडे येथे प्रचारादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या सभेत याबाबत आश्वासन देऊन आजअखेर त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पिसात्री अथवा कोलिक येथे टॉवर उभार करावा, अशी मागणी हिंदुस्थानी स्पोर्टस्चे अरुण तळेकर, मानवाडचे फुलाजी पाटील, वाशीचे भिकाजी पाटील यांनी केली आहे.घाटाचा प्रश्न फक्त चर्चेत, कृती शून्यगेल्या पंधरा वर्षांपासून पडसाळी-कार्जिडा घाटाचा प्रश्न राजकीय नेत्यांनी फक्त चर्चेत ठेवला आहे. शासन दरबारी कृती मात्र शून्य केली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. माजी आमदार विनय कोरे यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात कोलिक येथील जाहीर सभेत आपला मानेदय व्यक्त केला होता. मात्र, एक दगडही हलला नाही. विद्यमान आमदार संबंधित मंत्र्यांना तसेच विधानसभेत आवाज वारंवार उठवित असल्याचे सांगत आहेत. सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे, अन्यथा जनआंदोलन करू, असा इशारा ‘कोलिक’चे बाळासो पाटील, दत्तात्रय पाटील, गंगाराम रंगराव पाटील, विलास कांबळे, तुकाराम पाटील यांनी दिला आहे.गवा रेड्यांमुळे शेती धोक्यातजांभळी खोऱ्यात गवा रेड्यांमुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. वनखात्याकडून गव्याच्या बंदोबस्तासाठी जंगलाभोवती वीस लाखांपेक्षा अधिक रक्कम खर्च करून गेल्या चार वर्षांत चरीची खुदाई केली आहे. मात्र, निकृष्ट दर्जामुळे खुदाई केलेली चर म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’, अशी अवस्था आहे. ‘चरी’वरून अलीकडे, पलीकडे जनावरे जात असल्याने गव्यांचा बंदोबस्त कसा होणार त्यामुळे नियोजनबद्ध योजना आखून वन्यप्राण्यांपासून शेतीच्या संरक्षणाची गरज आहे.