शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
2
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
3
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
4
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
5
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
6
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
7
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
8
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
9
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
10
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
11
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
12
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
13
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
14
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
15
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
16
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
17
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
18
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
19
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
20
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.

बाजारभोगाव पश्चिम भागातील प्रश्न ‘जैसे थे’

By admin | Updated: June 29, 2015 00:15 IST

पडसाली घाटाचा प्रश्न चर्चेत : रस्त्यांची दुरवस्था, शेती धोक्यात

राम करले- बाजारभोगाव -बाजारभोगाव पश्चिम भागातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था, गेल्या अनेक वर्षांपासून भिजत पडलेल्या पडसाळी घाटाचा तसेच मोबाईल टॉवरचा प्रश्न यामुळे जनतेत शासनाच्या उदासीन कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. बाजारभोगाव पश्चिम भागात पडसाळी-वाशी हे मुख्य मार्ग आहेत. पडसाळी मार्गावर लाखो रुपयांचा चुराडा करूनदेखील हा मार्ग खड्ड्यांच्या समस्येतून मुक्त झालेला नाही. वाशी रस्ता आघाडी सरकारच्या काळात पंतप्रधान सडक योजनेतून करण्यात आला. मात्र, निकृष्ट कामामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरील ओढ्यांवर मोऱ्या काही आवश्यक ठिकाणी बांधलेल्या नसल्याने पावसाळी हंगाम म्हणजे येथील लोकांना डोकेदुखी ठरत आहे. पिसात्री, आढाववाडी, सुबेवाडीजवळ मोऱ्या बांधण्याची मागणी ‘कुंभी’चे संचालक प्रकाश पाटील यांनी केली आहे. तरीही प्रशासनाने याकडे कानाडोळा केला आहे. रस्त्याच्या दुर्दशेचा भोग कधी सुटणार, हा खरा प्रश्न आहे.येथील लोकांना किमान पायाभूत सुविधा देऊन न्याय द्यावा, अशी मापक अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मोबाईल टॉवर नसल्याने अनेक गैरसोयीकोलिक, चाफेवाडी, गोठणे, वाशी, आढाववाडी, खापणेवाडी, गुरववाडी, पिसात्री, सोनारवाडी, पोबरे, सुंबेवाडी, आदी गावांमध्ये मोबाईल सेवा नसल्याने येथील ग्रामस्थांना अनेक गैरसोयींचा सामना नेहमीच करावा लागतो. खासदार धनंजय महाडिक यांनी काळजवडे येथे प्रचारादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या सभेत याबाबत आश्वासन देऊन आजअखेर त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पिसात्री अथवा कोलिक येथे टॉवर उभार करावा, अशी मागणी हिंदुस्थानी स्पोर्टस्चे अरुण तळेकर, मानवाडचे फुलाजी पाटील, वाशीचे भिकाजी पाटील यांनी केली आहे.घाटाचा प्रश्न फक्त चर्चेत, कृती शून्यगेल्या पंधरा वर्षांपासून पडसाळी-कार्जिडा घाटाचा प्रश्न राजकीय नेत्यांनी फक्त चर्चेत ठेवला आहे. शासन दरबारी कृती मात्र शून्य केली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. माजी आमदार विनय कोरे यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात कोलिक येथील जाहीर सभेत आपला मानेदय व्यक्त केला होता. मात्र, एक दगडही हलला नाही. विद्यमान आमदार संबंधित मंत्र्यांना तसेच विधानसभेत आवाज वारंवार उठवित असल्याचे सांगत आहेत. सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे, अन्यथा जनआंदोलन करू, असा इशारा ‘कोलिक’चे बाळासो पाटील, दत्तात्रय पाटील, गंगाराम रंगराव पाटील, विलास कांबळे, तुकाराम पाटील यांनी दिला आहे.गवा रेड्यांमुळे शेती धोक्यातजांभळी खोऱ्यात गवा रेड्यांमुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. वनखात्याकडून गव्याच्या बंदोबस्तासाठी जंगलाभोवती वीस लाखांपेक्षा अधिक रक्कम खर्च करून गेल्या चार वर्षांत चरीची खुदाई केली आहे. मात्र, निकृष्ट दर्जामुळे खुदाई केलेली चर म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’, अशी अवस्था आहे. ‘चरी’वरून अलीकडे, पलीकडे जनावरे जात असल्याने गव्यांचा बंदोबस्त कसा होणार त्यामुळे नियोजनबद्ध योजना आखून वन्यप्राण्यांपासून शेतीच्या संरक्षणाची गरज आहे.