शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
5
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
6
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
7
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
8
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
9
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
10
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
11
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
12
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
13
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
14
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
15
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
16
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
17
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
18
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
19
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
20
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...

बाजारभोगाव पश्चिम भागातील प्रश्न ‘जैसे थे’

By admin | Updated: June 29, 2015 00:15 IST

पडसाली घाटाचा प्रश्न चर्चेत : रस्त्यांची दुरवस्था, शेती धोक्यात

राम करले- बाजारभोगाव -बाजारभोगाव पश्चिम भागातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था, गेल्या अनेक वर्षांपासून भिजत पडलेल्या पडसाळी घाटाचा तसेच मोबाईल टॉवरचा प्रश्न यामुळे जनतेत शासनाच्या उदासीन कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. बाजारभोगाव पश्चिम भागात पडसाळी-वाशी हे मुख्य मार्ग आहेत. पडसाळी मार्गावर लाखो रुपयांचा चुराडा करूनदेखील हा मार्ग खड्ड्यांच्या समस्येतून मुक्त झालेला नाही. वाशी रस्ता आघाडी सरकारच्या काळात पंतप्रधान सडक योजनेतून करण्यात आला. मात्र, निकृष्ट कामामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरील ओढ्यांवर मोऱ्या काही आवश्यक ठिकाणी बांधलेल्या नसल्याने पावसाळी हंगाम म्हणजे येथील लोकांना डोकेदुखी ठरत आहे. पिसात्री, आढाववाडी, सुबेवाडीजवळ मोऱ्या बांधण्याची मागणी ‘कुंभी’चे संचालक प्रकाश पाटील यांनी केली आहे. तरीही प्रशासनाने याकडे कानाडोळा केला आहे. रस्त्याच्या दुर्दशेचा भोग कधी सुटणार, हा खरा प्रश्न आहे.येथील लोकांना किमान पायाभूत सुविधा देऊन न्याय द्यावा, अशी मापक अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मोबाईल टॉवर नसल्याने अनेक गैरसोयीकोलिक, चाफेवाडी, गोठणे, वाशी, आढाववाडी, खापणेवाडी, गुरववाडी, पिसात्री, सोनारवाडी, पोबरे, सुंबेवाडी, आदी गावांमध्ये मोबाईल सेवा नसल्याने येथील ग्रामस्थांना अनेक गैरसोयींचा सामना नेहमीच करावा लागतो. खासदार धनंजय महाडिक यांनी काळजवडे येथे प्रचारादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या सभेत याबाबत आश्वासन देऊन आजअखेर त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पिसात्री अथवा कोलिक येथे टॉवर उभार करावा, अशी मागणी हिंदुस्थानी स्पोर्टस्चे अरुण तळेकर, मानवाडचे फुलाजी पाटील, वाशीचे भिकाजी पाटील यांनी केली आहे.घाटाचा प्रश्न फक्त चर्चेत, कृती शून्यगेल्या पंधरा वर्षांपासून पडसाळी-कार्जिडा घाटाचा प्रश्न राजकीय नेत्यांनी फक्त चर्चेत ठेवला आहे. शासन दरबारी कृती मात्र शून्य केली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. माजी आमदार विनय कोरे यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात कोलिक येथील जाहीर सभेत आपला मानेदय व्यक्त केला होता. मात्र, एक दगडही हलला नाही. विद्यमान आमदार संबंधित मंत्र्यांना तसेच विधानसभेत आवाज वारंवार उठवित असल्याचे सांगत आहेत. सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे, अन्यथा जनआंदोलन करू, असा इशारा ‘कोलिक’चे बाळासो पाटील, दत्तात्रय पाटील, गंगाराम रंगराव पाटील, विलास कांबळे, तुकाराम पाटील यांनी दिला आहे.गवा रेड्यांमुळे शेती धोक्यातजांभळी खोऱ्यात गवा रेड्यांमुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. वनखात्याकडून गव्याच्या बंदोबस्तासाठी जंगलाभोवती वीस लाखांपेक्षा अधिक रक्कम खर्च करून गेल्या चार वर्षांत चरीची खुदाई केली आहे. मात्र, निकृष्ट दर्जामुळे खुदाई केलेली चर म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’, अशी अवस्था आहे. ‘चरी’वरून अलीकडे, पलीकडे जनावरे जात असल्याने गव्यांचा बंदोबस्त कसा होणार त्यामुळे नियोजनबद्ध योजना आखून वन्यप्राण्यांपासून शेतीच्या संरक्षणाची गरज आहे.