शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By admin | Updated: October 24, 2015 00:37 IST

आजरा शहर : २००८ ची पुनरावृत्ती टळली; अतिक्रमणाचा प्रश्नही मार्गी लागण्याची गरज

ज्योतीप्रसाद सावंत- आजरा --मंगळवारी सायंकाळी दुचाकी पार्किंगवरून वाहनचालक व पोलीस निरीक्षक यांच्यात झालेल्या वादग्रस्त प्रकरणामुळे २००८ची पुनरावृत्ती टळली असली, तरी प्रकरणाचे मूळ पाहिल्यास आता पुन्हा एखादे प्रकरण घडण्याआधी शहरातील वाहतुकीचा, अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागण्याची गरज निर्माण झाली आहे.शहरामध्ये वाहतूक समस्येच्या पार्श्वभूमीवर आजरा ग्रामपंचायत, पोलीस खाते, महसूल यांची वारंवार बैठक झाली. चर्चेचे गुऱ्हाळही झाले. प्रत्यक्षात कार्यवाही मात्र शून्य, असाच प्रकार राहिला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्ता मुळातच अरुंद आहे. त्यात असणारी अतिक्रमणे तसेच रस्त्याशेजारी चारचाकी व दुचाकी उभी असणारी वाहने अक्षरक्ष: डोकेदुखी ठरतात.याच कारणावरून वाहनचालक, पादचारी यांच्यात वारंवार वाद होताना दिसतात. हाच वाद मंगळवारी पोलीस निरीक्षक व संबंधित दुकानदार यांच्यात झाला; पण पडसाद वेगळ्या पद्धतीने उमटले. पंधरवड्यापूर्वी गणेश मंडळावर डॉल्बीप्रकरणी झालेली कारवाई, स्थानिक नेतेमंडळींना पोलीस निरीक्षकांकडून न दिली जाणारी किंमत. नवरात्रौत्सवातील कार्यक्रमानंतर कायद्याच्या बडग्यामुळे येणाऱ्या मर्यादा व पोलीस दलातीलच काही मंडळींकडून पोलीस निरीक्षकांबाबत व्यक्त केली जाणारी नाराजी, या सर्वांची परिणती नागरिक रस्त्यावर उतरण्यामध्ये झाली. या घटनेला वेगळे वळण लागण्यापूर्वीच उपविभागीय अधिकारी डॉ. सागर पाटील व ज्येष्ठ नेते बाबूराव कुंभार यांनी सावध भूमिका घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.चूक कोणाची? या प्रश्नाचे उत्तर चौकशीअंती मिळेलच; पण वाहतुकीतील अडथळा हा या प्रकरणातील महत्त्वाचा भाग आहे, हे नाकारता येत नाही. जोपर्यंत वाहतुकीचे योग्य नियोजन होत नाही, तोपर्यंत असे प्रकार घडतच राहणार. फरक एवढाच असेल की, कधी वाहनचालक व नागरिक, कधी फेरीवाले व दुकानदार, दुकानदार व कधी पोलीस, वाहनधारक व नागरिक, कधी फेरीवाले व दुकानदार, तर कधी पोलीस व वाहनधारक असाच आहे.हल्ला कुणाचा ?जमावाच्या मध्यभागी असणाऱ्या तक्रारदार कृष्णा इंदलकर यांचा मुलगा सचिन याच्या डोक्यावर जमावातीलच एकाने जोरदार वार करून त्याला जखमी केले. यामुळे जमावातील काही मंडळी प्रकरणाला वेगळे वळण लावण्याच्या प्रयत्नात होते, असेही पुढे येत आहे.