शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

कागल पालिका दुकानगाळ्यांचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:25 IST

जहाँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : कागल शहरातील नगरपालिकेच्या दुकानगाळ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बाजारपेठेतील आर्थिक उलाढालीनुसार दुकानगाळ्यांचे भाडे निश्चित करावे आणि प्रत्येकी किमान एक लाख रुपये अनामत घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेऊन तशा नोटिसा दुकानगाळेधारकांना लागू केल्या आहेत.याबाबत शिवराज्य गाळाधारक असोसिएशनने नोटाबंदी आणि जीएसटीमुळे बाजारपेठ ठप्प आहे. ...

जहाँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : कागल शहरातील नगरपालिकेच्या दुकानगाळ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बाजारपेठेतील आर्थिक उलाढालीनुसार दुकानगाळ्यांचे भाडे निश्चित करावे आणि प्रत्येकी किमान एक लाख रुपये अनामत घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेऊन तशा नोटिसा दुकानगाळेधारकांना लागू केल्या आहेत.याबाबत शिवराज्य गाळाधारक असोसिएशनने नोटाबंदी आणि जीएसटीमुळे बाजारपेठ ठप्प आहे. व्यापारी वर्ग ही अनामत भरू शकणार नाही, असे सांगितले आहे. याबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन गाळेधारकांच्या शिष्टमंडळाने आपले गाºहाणे त्यांना सांगितले आहे.नगरपालिकेने वेळोवेळी विविध योजनांमधून शहरात व्यापारी संकुले उभारली आहेत. जवळपास १६० अशी दुकाने आहेत. मात्र यापैकी दहा टक्के दुकानगाळे वर्षानुवर्षे पडून आहेत. तर काही दुकानगाळे नेहमी बंद असतात. पण त्याचे भाडे संबंधित गाळाधारक रितसर अदा करतो. जेथे दुकानगाळ्यांना महत्त्व आहे, मात्र जेथे व्यापार होत नाही तेथे भाडेकरू मिळणेही मुश्किल होते. तसेच भाडेपट्टी आणि अनामत रक्कम किती असावी हे ठरविण्याचा अधिकार नगररचना कार्यालयाला आहे. त्यामुळे त्यांनी ठरविलेल्या रकमेवर दुकानगाळा घेण्यास कोणी तयार होत नसल्याने पालिकेने काही ठिकाणी तडजोडीने भाडेपट्टी आकारली आहे. मात्र आता कागलची विकसित झालेली बाजारपेठ लक्षात घेऊन प्रशासनाने अनामत रक्कम नव्याने आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.दुकानगाळ्यांचे आर्थिक आॅडिट होणे गरजेचेकागल नगरपालिकेचे महात्मा फुले मार्केट आता जीर्ण झाले आहे. तेथे वार्षिक भाडे सात ते आठ हजार आहे. तेथे नव्याने संकुल उभारण्यात येणार आहे. याशिवाय पोलीस ठाण्यासमोर अण्णाभाऊ साठे व्यापार संकुल, काकासाहेब वाड्यासमोरचे संकुल, नगरपालिका मुख्य इमारतीजवळ, रिंंगरोडवरील छत्रपती शिवाजी आणि छत्रपती शाहू व्यापार संकुल, सुभाष चौक, घरकुल, जयसिंगराव पार्क येथे ही दुकानगाळे आहेत. ठिकठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे नगरपालिकेने गाळाधारक, लोकप्रतिनिधी आदींची एक समिती नेमून याबद्दल आर्थिक आॅडिट करावे, अशी मागणी होत आहे.