शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

कागल पालिका दुकानगाळ्यांचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:25 IST

जहाँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : कागल शहरातील नगरपालिकेच्या दुकानगाळ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बाजारपेठेतील आर्थिक उलाढालीनुसार दुकानगाळ्यांचे भाडे निश्चित करावे आणि प्रत्येकी किमान एक लाख रुपये अनामत घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेऊन तशा नोटिसा दुकानगाळेधारकांना लागू केल्या आहेत.याबाबत शिवराज्य गाळाधारक असोसिएशनने नोटाबंदी आणि जीएसटीमुळे बाजारपेठ ठप्प आहे. ...

जहाँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : कागल शहरातील नगरपालिकेच्या दुकानगाळ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बाजारपेठेतील आर्थिक उलाढालीनुसार दुकानगाळ्यांचे भाडे निश्चित करावे आणि प्रत्येकी किमान एक लाख रुपये अनामत घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेऊन तशा नोटिसा दुकानगाळेधारकांना लागू केल्या आहेत.याबाबत शिवराज्य गाळाधारक असोसिएशनने नोटाबंदी आणि जीएसटीमुळे बाजारपेठ ठप्प आहे. व्यापारी वर्ग ही अनामत भरू शकणार नाही, असे सांगितले आहे. याबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन गाळेधारकांच्या शिष्टमंडळाने आपले गाºहाणे त्यांना सांगितले आहे.नगरपालिकेने वेळोवेळी विविध योजनांमधून शहरात व्यापारी संकुले उभारली आहेत. जवळपास १६० अशी दुकाने आहेत. मात्र यापैकी दहा टक्के दुकानगाळे वर्षानुवर्षे पडून आहेत. तर काही दुकानगाळे नेहमी बंद असतात. पण त्याचे भाडे संबंधित गाळाधारक रितसर अदा करतो. जेथे दुकानगाळ्यांना महत्त्व आहे, मात्र जेथे व्यापार होत नाही तेथे भाडेकरू मिळणेही मुश्किल होते. तसेच भाडेपट्टी आणि अनामत रक्कम किती असावी हे ठरविण्याचा अधिकार नगररचना कार्यालयाला आहे. त्यामुळे त्यांनी ठरविलेल्या रकमेवर दुकानगाळा घेण्यास कोणी तयार होत नसल्याने पालिकेने काही ठिकाणी तडजोडीने भाडेपट्टी आकारली आहे. मात्र आता कागलची विकसित झालेली बाजारपेठ लक्षात घेऊन प्रशासनाने अनामत रक्कम नव्याने आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.दुकानगाळ्यांचे आर्थिक आॅडिट होणे गरजेचेकागल नगरपालिकेचे महात्मा फुले मार्केट आता जीर्ण झाले आहे. तेथे वार्षिक भाडे सात ते आठ हजार आहे. तेथे नव्याने संकुल उभारण्यात येणार आहे. याशिवाय पोलीस ठाण्यासमोर अण्णाभाऊ साठे व्यापार संकुल, काकासाहेब वाड्यासमोरचे संकुल, नगरपालिका मुख्य इमारतीजवळ, रिंंगरोडवरील छत्रपती शिवाजी आणि छत्रपती शाहू व्यापार संकुल, सुभाष चौक, घरकुल, जयसिंगराव पार्क येथे ही दुकानगाळे आहेत. ठिकठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे नगरपालिकेने गाळाधारक, लोकप्रतिनिधी आदींची एक समिती नेमून याबद्दल आर्थिक आॅडिट करावे, अशी मागणी होत आहे.