शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

कागल पालिका दुकानगाळ्यांचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:25 IST

जहाँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : कागल शहरातील नगरपालिकेच्या दुकानगाळ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बाजारपेठेतील आर्थिक उलाढालीनुसार दुकानगाळ्यांचे भाडे निश्चित करावे आणि प्रत्येकी किमान एक लाख रुपये अनामत घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेऊन तशा नोटिसा दुकानगाळेधारकांना लागू केल्या आहेत.याबाबत शिवराज्य गाळाधारक असोसिएशनने नोटाबंदी आणि जीएसटीमुळे बाजारपेठ ठप्प आहे. ...

जहाँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : कागल शहरातील नगरपालिकेच्या दुकानगाळ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बाजारपेठेतील आर्थिक उलाढालीनुसार दुकानगाळ्यांचे भाडे निश्चित करावे आणि प्रत्येकी किमान एक लाख रुपये अनामत घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेऊन तशा नोटिसा दुकानगाळेधारकांना लागू केल्या आहेत.याबाबत शिवराज्य गाळाधारक असोसिएशनने नोटाबंदी आणि जीएसटीमुळे बाजारपेठ ठप्प आहे. व्यापारी वर्ग ही अनामत भरू शकणार नाही, असे सांगितले आहे. याबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन गाळेधारकांच्या शिष्टमंडळाने आपले गाºहाणे त्यांना सांगितले आहे.नगरपालिकेने वेळोवेळी विविध योजनांमधून शहरात व्यापारी संकुले उभारली आहेत. जवळपास १६० अशी दुकाने आहेत. मात्र यापैकी दहा टक्के दुकानगाळे वर्षानुवर्षे पडून आहेत. तर काही दुकानगाळे नेहमी बंद असतात. पण त्याचे भाडे संबंधित गाळाधारक रितसर अदा करतो. जेथे दुकानगाळ्यांना महत्त्व आहे, मात्र जेथे व्यापार होत नाही तेथे भाडेकरू मिळणेही मुश्किल होते. तसेच भाडेपट्टी आणि अनामत रक्कम किती असावी हे ठरविण्याचा अधिकार नगररचना कार्यालयाला आहे. त्यामुळे त्यांनी ठरविलेल्या रकमेवर दुकानगाळा घेण्यास कोणी तयार होत नसल्याने पालिकेने काही ठिकाणी तडजोडीने भाडेपट्टी आकारली आहे. मात्र आता कागलची विकसित झालेली बाजारपेठ लक्षात घेऊन प्रशासनाने अनामत रक्कम नव्याने आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.दुकानगाळ्यांचे आर्थिक आॅडिट होणे गरजेचेकागल नगरपालिकेचे महात्मा फुले मार्केट आता जीर्ण झाले आहे. तेथे वार्षिक भाडे सात ते आठ हजार आहे. तेथे नव्याने संकुल उभारण्यात येणार आहे. याशिवाय पोलीस ठाण्यासमोर अण्णाभाऊ साठे व्यापार संकुल, काकासाहेब वाड्यासमोरचे संकुल, नगरपालिका मुख्य इमारतीजवळ, रिंंगरोडवरील छत्रपती शिवाजी आणि छत्रपती शाहू व्यापार संकुल, सुभाष चौक, घरकुल, जयसिंगराव पार्क येथे ही दुकानगाळे आहेत. ठिकठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे नगरपालिकेने गाळाधारक, लोकप्रतिनिधी आदींची एक समिती नेमून याबद्दल आर्थिक आॅडिट करावे, अशी मागणी होत आहे.