शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

डोळ्यांत चटणी टाकून दोघांवर वार

By admin | Updated: January 6, 2015 22:40 IST

बनघर येथील घटना : क्षुल्लक कारणावरून कोयत्याने हल्ला; अन्य तिघांना दांडक्याने मारहाण

सातारा : बनघर (ता. सातारा) येथील दोघा मित्रांमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून कोयत्याने वार करण्यात आले. डोळ्यांमध्ये चटणी टाकून हे वार करण्यात आले असून, यामध्ये सख्खे चुलत भाऊ जखमी झाले आहेत. मनोहर रघुनाथ जाधव (वय २८) व गणेश एकनाथ जाधव (३५, दोघे रा. बनघर) अशी त्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मनोहर व गणेश हे दोघेही मुंबई येथे नोकरीला असून, ते घरगुती कार्यक्रमासाठी गावी आले आहेत. रविवारी (दि. ४) रात्री दहा वाजता हे दोघे बनघरच्या बसस्थानकात बसले होते.त्यावेळी गणेश सपकाळ हा तेथे आला व त्यांच्याशी चेष्टामस्करी करू लागला. त्यावेळी किरकोळ वादावादी झाली व गणेश सपकाळ याने शिवीगाळ करत ‘उद्या आम्ही तुमच्याकडे बघतोच,’ असे म्हणून तो तेथून निघून गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी (दि. ५) रात्री पावणेनऊच्या सुमारास मनोहर व गणेश घरामध्ये जेवण करत असताना गणेश व रमाकांत सपकाळ या दोघा भावांनी त्यांना बाहेर बोलावले. बाहेर येताच ‘काल काय झालं होतं,’ असे विचारत डोळ्यांमध्ये चटणी टाकून मनोहरच्या डोक्यात, हातावर व पाठीवर कोयत्याने वार केले. त्यावेळी मनोहर ओरडल्याने गणेश जाधव बाहेर आला. त्याने सोडविण्याचा प्रयत्न केला; परंतु गणेशच्याही हातावर त्यांनी वार केला.यावेळी घरातील लोक बाहेर आले. त्यावेळी त्यांनी दारात असलेल्या दांडक्यांनी रघुनाथ जाधव, एकनाथ जाधव, हौसाबाई जाधव या तिघांना दांडक्याने मारहाण केली. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. या घटनेची सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, अधिक तपास हवालदार पाटील करत आहेत. (प्रतिनिधी)मीच सांगितले मारायलासपकाळ बंधूंनी जाधव बंधूंना कोयत्याने वार करून त्यांच्या कुटुंबीयांना दांडक्याने मारहाण केली. या घटनेबद्दल गावातील काही व्यक्ती मधुकर सपकाळ यांना विचारण्यास गेल्या तेव्हा चक्क मुलांच्या वडिलांनीच ग्रामस्थांना ‘मीच सांगितले त्यांना मारायला,’ असे उत्तर दिले.