शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’ला दे धक्का..!

By admin | Updated: October 20, 2014 00:40 IST

सगळीकडेच वाताहत : संघटना उरली केवळ आंदोलनापुरती

विश्वास पाटील - कोल्हापूर -लोकसभा निवडणुकीत स्वत:चा करिश्मा निर्माण करून देशभर चर्चेत आलेल्या खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मात्र विधानसभा निवडणुकीत वाताहत झाली. कोल्हापूर जिल्ह्यात संघटनेने पाच जागा लढविल्या होत्या. त्यापैकी एकाही मतदारसंघात त्यांचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर नाही. याचा अर्थच असा की लोक ऊस आंदोलनापुरते संघटनेचा झेंडा हातात घेतात, परंतु निवडणुकीत मात्र त्यांना हव्या असलेल्या झेंड्याच्या मागे जातात. स्वाभिमानी संघटनेचा विचार करता या निवडणुकीत त्यांच्या सगळ््या वजाबाक्याच झाल्या आहेत.शिरोळ हा शेट्टी यांचा प्रभाव असलेला मतदारसंघ. विधानसभेच्या २००४च्या निवडणुकीत ते पहिल्यांदा निवडणूक लढवूनही मातब्बरांचा पराभव करून विजयी झाले. परंतु त्यानंतरच्या दोन्ही निवडणुकीत त्यांना आपल्या वारसदारांना विजयी करता आले नाही. या निवडणुकीत त्यांनी संघटनेच्या उमेदवारीचे नैसर्गिक हक्कदार उल्हास पाटील यांना बाजूला करून सावकर-मादनाईक यांना उमेदवारी दिली. शेट्टी यांनी आपल्या जातीच्या माणसाला उमेदवारी दिल्याचा प्रचार त्यातून झाला. महायुतीच्या राजकारणात शेट्टी भाजपच्या बाजूने राहिल्याचा राग म्हणून शिवसेनेने संघटनेचे बंडखोर उल्हास पाटील यांना लगेच उमेदवारी दिली. तिथे संघटनेचा हिशेब चुकता करण्यासाठी अनेक गट एकत्र आल्याने संघटनेचा दारूण पराभव झाला. लोकसभेला शेट्टी यांना मताधिक्य देणाऱ्या या मतदारसंघात विधानसभेला मात्र पराभव झाला. शेट्टी व काँग्रेसचे पराभूत आमदार सा. रे. पाटील यांच्यात मिलीभगत असल्याचा प्रचारही संघटनेस अडचणीचा ठरला.शाहूवाडीत शेट्टी यांना विनय कोरे व शिवसेनेच्या सत्यजित पाटील यांना पराभूत करायचे होते. परंतु त्यात त्यांना निम्मेच यश आले. सत्यजित पाटील यांना ते रोखू शकले नाहीत. राधानगरी मतदारसंघात मात्र जालंदर पाटील यांना मानहानीकारक पराभवास सामोरे जावे लागले. पाटील हे जिल्हाध्यक्ष असूनही त्यांना कशी-बशी सहा हजार मते मिळाली, तशीच स्थिती चंदगडला राजेंद्र गड्ड्याण्णावार यांची झाली. पोटनिवडणुकीनंतर आपण आमदार झालोच, अशा अविर्भावात राहिलेल्या गड्ड्याण्णावार यांचाही मोठा पराभव झाला. जिल्ह्यात स्वाभिमानीचे उमेदवार पराभूत झाले असले तरी कोल्हापूर दक्षिणमध्ये मात्र अमल महाडिक यांच्या विजयासाठी संघटनेची चांगली मदत झाली.'स्वाभिमानी'च्या उमेदवारांना मिळालेली मतेअनिल मादनाईक (शिरोळ) - ४८ हजार ५११ (तिसऱ्या स्थानावर)अमरसिंह पाटील (शाहूवाडी) - २७ हजार ८६६ (तिसऱ्या स्थानावर)जालंदर पाटील (राधानगरी) - ५ हजार ९१५ (तिसऱ्या स्थानावर)राजेंद्र गड्ड्याण्णावार (चंदगड)- १९ हजार ८४७ (सहाव्या स्थानावर)प्रमोद कदम (हातकणंगले) - २१ हजार ३१८ (चौथ्या स्थानावर)