शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

जांभळीत आईने मुलींसह केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:39 IST

जयसिंगपूर : दोन चिमुरड्या मुलीसह आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शिरोळ तालुक्यातील जांभळी येथे घडली. सुप्रिया शिवाजी ...

जयसिंगपूर : दोन चिमुरड्या मुलीसह आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शिरोळ तालुक्यातील जांभळी येथे घडली. सुप्रिया शिवाजी भोसले (वय २४), मृणाली शिवाजी भोसले (४), मृण्मयी शिवाजी भोसले (५) अशी मृतांची नावे आहेत. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे गावातून हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सुप्रिया भोसले या सोमवारी (दि. १४) दुपारी साडेबाराच्या सुमारास मुलींना घेऊन अंगणवाडीमध्ये उंची, वजन करण्याकरिता जाते, असे सांगून घरातून निघून गेल्या होत्या. सायंकाळपर्यंत त्या घरी न परतल्याने पती शिवाजी यांनी शोधाशोध सुरू केली. जांभळीसह ठिकठिकाणी व नातेवाइकांकडे शोध घेतल्यानंतर त्या मिळून न आल्याने शिरोळ पोलिसांत बेपत्ताची तक्रार दिली होती. दरम्यान, मंगळवारी सकाळी जांभळी येथील पिराच्या मळ्यातील विहिरीत लहान मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यानंतर पोलिसांच्या रेस्क्यू पथकाने शोधमोहीम राबवून तीनही मृतदेह बाहेर काढण्यात आल्यानंतर पती शिवाजीसह नातेवाइकांनी आक्रोश केला. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैंजणे यांनी पाहणी केली. शिरोळ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. सुप्रिया हिचा पाच वर्षांपूर्वी शिवाजी हिच्याशी प्रेमविवाह झाला होता.

------------

चौकट - सीसीटीव्ही फुटेजवरून शोध

मंगळवारी सकाळी पती शिवाजी याने नातेवाईक, पै-पाहुण्यांकडे चौकशी केली होती. ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक महिला दोन मुलींसह पिराच्या मळ्याकडे जाताना निदर्शनास आली होती. त्यावरून शोध घेत असताना विहिरीत मुलगी मृण्मयी हिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्यावरून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.

चौकट - मृतदेह शोधताना अडचणी

जांभळी ओढ्यालगत असणाऱ्या गट नं. ३४९ मधील विहिरीभोवती झाडेझुडपे आणि पाण्यावर तरंगणाऱ्या कचऱ्यामुळे वजीर रेस्क्यू फोर्स पथकाला मृतदेह शोधताना अडचणी आल्या. झाडे तोडून पाण्यात जाण्यासाठी मार्ग करण्यात आला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

फोटो - १५१२२०२०-जेएवाय-०२-मृत सुप्रिया भोसले, मृत मृण्मयी भोसले, मृत मृणाली भोसले.

०३) जांभळी (ता. शिरोळ) येथे विहिरीतून मृतदेह काढताना ग्रामस्थांनी गर्दी केली होती.