शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

रोजाचा उपवास सोडण्यासाठी पुरणपोळी, कटाची आमटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:24 IST

समीर देशपांडे लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जातीभेदाच्या भिंती माणुसकीच्या लाटेपुढे जमीनदोस्त होतात. अशीच एक समृध्द परंपरा छत्रपती शाहू ...

समीर देशपांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जातीभेदाच्या भिंती माणुसकीच्या लाटेपुढे जमीनदोस्त होतात. अशीच एक समृध्द परंपरा छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीत घडत आली आहे. माणुसकीचा धागा घट्ट करणारी ही परंपरा जपण्याचे कार्य दिगवडे (ता.पन्हाळा) येथील पवार आणि कोल्हापुरातील मणेर कुटुंबीयांनी सुरू ठेवले आहे.

दिगवडे येथील राजाराम पवार आणि कोल्हापुरातील खलीलशेठ मणेर यांची जगावेगळी मैत्री. या दोघांच्या मैत्रीमध्ये कधीच त्यांचा धर्म आड आला नाही. अशाच एका रमजानच्या महिन्यात खलीलशेठ यांना शुभेच्छा देण्यासाठी राजाराम पवार गेले. त्यांनी सोबत ५० पुरणपोळ्या आणि कटाची आमटी आणली होती. दोघांची गळाभेट झाली आणि पवार यांनी प्रेमाचा आग्रह धरला की तुमचा उपवास पुरणपोळीने सोडायचा. गहिवरलेल्या खलीलशेठनी राजाराम यांना मिठी मारली. उपवास सोडण्यासाठी केलेली पारंपरिक तयारी बाजुला सारली गेली आणि मित्राने आस्थेेने आणलेल्या पुरणपोळीचा आस्वाद घेत मणेर कुटुंबीयांनी रोजाचा उपवास सोडला.

काळाच्या ओघामध्ये राजाराम आणि खलीलशेठ यांचे निधन झाले. परंतु राजाराम यांचे चिरंजीव संतोष यांनी ही परंपरा कायम ठेवली. आजही रमजानच्या महिन्यात दिगवड्याहून पुरणपोळ्या आणि कटाची आमटी येणं चुकलं नाही आणि मणेर परिवाराचा उपवास पुरणपोळी आणि कटाच्या आमटीशिवाय सुटला नाही. पवार आणि मणेर परिवारातील हा वेगळा ऋणानुबंध निश्चितच अनुकरणीय आहे.

------------------------------------

रुग्णालयात असतानाही....

रसरशीत माणुसकीचे हे वेगळेपण जपणारी ही परंपरा यंदा खंडित होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. संतोष पवार हे आजारी असल्याने रुग्णालयात दाखल होते. हिदायत मणेर यांनी त्यांना फोन करून प्रकृतीची विचारपूस केली. काळजी घेण्यास सांगितले. परंतु संतोष जरी रुग्णालयात दाखल असले तरी दुसऱ्याच दिवशी मणेर यांच्या घरी ५० पुरणपोळ्या आणि कटाची आमटी पोहोच झाली. उपवासाची भूक माणुसकीने भागली.

------------------------------------

कोट

कोल्हापूर जिल्ह्यावर राजर्षी शाहू महाराजांचे संस्कार किती खोलवर रुजले आहेत याचे प्रत्यंतर या परंपरेतून होते. आमच्या वाडवडिलांची माणूसपण जपण्याची परंपरा आम्ही पुढे चालवू शकलो याचा अभिमान आहे. संतोष पवारसारख्या मित्राने त्यांच्या वडिलांच्या पश्चातही ही परंपरा सुरू ठेवली आणि जातीधर्मापेक्षा माणूसपण मोठे असल्याचे सिध्द केले.

- हिदायत मणेर, कोल्हापूर

------------------------------------

फोटो: २४ कोल्हापूर ०१

दिगवडे (ता.पन्हाळा) येथील पवार कुटुंबीयांनी पाठवलेल्या पुरणपोळी आणि कटाच्या आमटीने कोल्हापुरातील मणेर परिवाराचा रोजाचा उपवास सुटतो.