शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

पुरंदरे यांचा ‘महाराष्ट्र भूषण’ रद्द करा

By admin | Updated: June 3, 2015 01:06 IST

मनोज आखरे : संभाजी ब्रिगेड व्यापक लढा उभारणार

कोल्हापूर : बाबासाहेब पुरंदरे यांना राज्य शासनाने जाहीर केलेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार रद्द करावा, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. त्याबाबत शासनाला वारंवार निवेदने दिली, आंदोलने केली. तसेच शासनाला या पुरस्काराबाबत फेरविचार करण्यास सांगितले असून पुरस्कार रद्द करावा, या मागणीसाठी व्यापक लढा उभारण्यात येणार असल्याची माहिती ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.प्रदेशाध्यक्ष आखरे म्हणाले, महाराष्ट्रातील साहित्य, कला-क्रीडा, विज्ञान, समाजप्रबोधन, पत्रकारिता, लोकप्रशासन आणि आरोग्य सेवा, आदी क्षेत्रांत एकनिष्ठेने, प्रदीर्घ काळ सेवा केलेल्या मान्यवर व्यक्तींच्या कार्याचा यथोचित सन्मान करण्यासाठी शासनातर्फे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यात येतो. मात्र, बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर केलेला पुरस्कार हा निकषात बसत नाही. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात येऊ नये, अशी आमची ठाम मागणी आहे. या मागणीसाठी सभा, परिषदा, आदींच्या माध्यमातून लढ्याबाबत जनजागृती केली जाईल. त्यासाठी किल्ले रायगड येथे शनिवारी (दि. ६) होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात शपथ घेण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे, प्रदेश उपाध्यक्ष हिंदुराव हुजरे-पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, संपत चव्हाण, प्रवीण पाटील, सुनील पाटील, बाजीराव दिडे, आदी उपस्थित होते.कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढविणारज्या पद्धतीने आम्ही महामानवांचा खरा इतिहास सांगतो, प्रबोधन करतो, तरुण, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलने करतो, त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. त्यामुळे आगामी कोल्हापूर मनपा निवडणुकीत समविचारी संघटना, पक्ष यांना बरोबर घेऊन संभाजी ब्रिगेड निवडणूक लढविणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष आखरे यांनी सांगितले.