शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपिकासह नुकसानीचे पंचनामे आजपासून गतीने होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:27 IST

जयसिंगपूर : महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील ४३ गावे बाधित झाली होती. बाधित गावांमधील शेती पीक, घरांची पडझड, तसेच सानुग्रह अनुदानाबाबत ...

जयसिंगपूर : महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील ४३ गावे बाधित झाली होती. बाधित गावांमधील शेती पीक, घरांची पडझड, तसेच सानुग्रह अनुदानाबाबत शासकीय यंत्रणेमार्फत गावोगावी पंचनामे सुरू आहेत. पंचनामे गतीने पूर्ण होण्यासाठी ज्यादा २४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आज शनिवारपासून पंचनामे लवकर पूर्ण होणार आहेत, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

सध्या कृषी विभाग व महसूल विभागाकडून १८ अधिकारी व कर्मचारी पूरबाधित गावांमध्ये जाऊन पंचनाम्याचे काम पूर्ण करीत आहेत; परंतु नुकसानीचे स्वरूप पाहता पंचनाम्यासाठी ज्यादा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत होती. पंचनामे तातडीने पूर्ण झाले तरच शेतीमध्ये तातडीने मशागत करून पुढचे पीक घेता येणार आहे. यासाठी पंचनामे जलद गतीने पूर्ण करा, अशा सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे व तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांच्याशी बोलून पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, असे आदेश दिले होते. याचाच भाग म्हणून तालुका कृषी अधिकारी यांच्या मागणीप्रमाणे जिल्हा कृषी अधिकारी यांनी आज शनिवारपासून पंचनामे गतीने होण्यासाठी आणखी २४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असल्याने शिरोळ तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे गतीने होणार असल्याची माहिती मंत्री यड्रावकर यांनी दिली. सध्या अठरा गावांतील पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित २५ गावांमधील पंचनाम्याचे काम आठवडाभरात पूर्ण करा, अशा सूचनाही दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.