शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

‘पल्स’च्या गुंतवणूकदारांचे धरणे आंदोलन

By admin | Updated: May 15, 2017 16:39 IST

कंपनीच्या मालमत्ता राज्य शासनाने ताब्यात घ्यावेत : गुंतवणूकदारांची मागणी

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १५ : पल्स कंपनीतील रक्कम गुंतवणूकदारांनी आपल्या ठेवी परत मिळाव्यात या मागणीसाठी सोमवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यांनी जिल्हाधिकारी डॉ अविनाश सुभेदार यांना निवेदन देताना चर्चेत, पल्स कंपनीच्या मालमत्ता महाराष्ट्र शासनाने ताब्यात घ्याव्यात व त्याच्याविक्री करुन त्यातून गुंतवणूकदारांचे पैसे भागवावेत अशी मागणी केली.पल्स कंपनीने (पीएसीएल) या कंपनीने देशभरातील सुमारे सहा कोटी लोकांकडून एकोणपन्नास हजार एकशे कोटी इतकी रक्कम जमा करुन मुदतीनंतरही त्या परत दिलेल्या नाहीत. सीबीआयने पल्स कंपनीच्या संचालकांना पकडून त्यांना तुरुंगात डांबले, त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या. अशा २८ हजार मालमत्ता सेबीच्या ताब्यात न्यायालयाने दिलेल्या आहेत, या मालमत्तांची विक्री करुन गुंतवणूकदारांच्या रकमा देण्याचे आश्वासन सेबीने दिले होते. पण त्या कामाला गती नाही. त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.अशा फसवणुक करणाऱ्या कंपन्यांना आळा बसावा, त्यांना राजकारण्यांनी पाठींबा देऊ नये अशीही मागणी करण्यात आली. यावेळी शिष्ठमंडळात, सतिशचंद्र कांबळे, बी. एल. बरगे, महेश लोहार, रमेश वडणगेकर, इजाज जामदार, कृष्णात बिरंजे, राजकुमार नायकवडी, रविकिरण हरणे, बापू मोरे, नामदेव शिसेकर आदींचा सहभाग होता.आंदोलकांच्या मागण्या

 - पल्सकडून जप्त केलेल्या महाराष्ट्रातील मालमत्ता महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेऊन त्यांच्या विक्रीतून गुंतवणूकदारांचे पैसे भागवावेत.

-प्रत्येक जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात सामान्य जनतेकडून बचतीचे किंवा जास्त परतीचे अमिष दाखवून रकमा जमा करणाऱ्या कंपन्यावर राज्य शासनाने नियंत्रण ठेवावे.

-अशा कंपन्यांची वस्तूस्थिती सामान्यपर्यत पोहचविण्याची जबाबदारी राज्य शासनाने उचलावी

- शासकिय पातळीवर बचतीसाठी योग्य पर्याय निवडावेत