शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

जनता बझारच्या ‘कारभाऱ्यां’कडून वसुली होणार

By admin | Updated: February 21, 2017 01:36 IST

‘कलम ८८’च्या कारवाईने जबाबदारी निश्चित : प्रशासक मंडळ कार्यरत, बांधकाम समिती नियुक्तीचा ठराव बोगस

कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता कंझ्युमर्सच्या (जनता बझार) कारभारी संचालकांवर ६३ लाख ६० हजाराच्या अपहारप्रकरणी फौजदारी दाखल झाली असली तरी त्यांच्यावर वसुलीची कारवाईही होणार आहे. लेखापरीक्षणाचा अहवालाच्या आधारे थेट ‘कलम ८८’ ची कारवाई करून संबंधितांवर जबाबदारी निश्चिती केली जाणार आहे. जनता बझार बंद पडून त्यावर प्रशासक मंडळ कार्यरत आहे. जुन्या-जाणत्या प्रतिष्ठित म्हणवणाऱ्यांनी संपलेल्या संस्थेतून ‘अर्थ’ शोधण्याचा प्रयत्न केला. राजारामपुरी व वरुणतीर्थ शाखांचे नूतनीकरण व सुशोभीकरण दाखवून मोठा हात मारला. फरशी बसविणे, बदलणे, भिंतीचे नवीन बांधकाम, खिडकी दुरुस्ती, इलेक्ट्रिक वायरिंग बदलणे, डिझाईन करणे अशी मोघम स्वरूपातील कपोलकल्पित कामे केल्याचे दाखविले आहे. बांधकाम समिती नियुक्तीचा ठराव बोगस करून प्रोेसिडिंगमध्ये घुसडला आहे. विना बयाणा रकमेची निविदा काढली आहे, संपूर्ण प्रक्रियाच बोगस असल्याचा ठपका लेखापरीक्षकांनी ठेवला आहे. संगनमताने केलेल्या अपहाराची रक्कम मोठी असल्याने विशेष लेखापरीक्षक (ग्राहक) विष्णू कदम यांनी फौजदारी दाखल केली आहे. अशाप्रकारच्या अपहारामध्ये दोन कारवाई होऊ शकतात. पहिली क्रिमिनल अ‍ॅक्शन (फौजदारी)ची केली जाते. त्यानंतर सहकार न्यायालय अथवा जिल्हा उपनिबंधक ‘कलम ८८’ नुसार जबाबदारी निश्चित करून वसुलीची प्रक्रिया राबवू शकतात. चौकशी करूनच अटक : सावंतकोल्हापूर : जनता बझार, राजारामपुरी व वरुणतीर्थ या दोन्ही शाखांतील ६४ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा अपहार प्रकरणाची चौकशी सुरू आहे. कायदेतज्ज्ञांची मदत घेऊन परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून गुन्ह्यांतील आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली. दरम्यान, आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच माजी महापौर प्रल्हाद भाऊसाहेब चव्हाण (रा. शिवाजी पेठ), माजी उपमहापौर संस्थेचे चेअरमन उदय ऊर्फ उद्धव रा. पोवार (रा. शुक्रवार पेठ), प्रकाश परशराम बोंद्रे (शिवाजी पेठ) यांच्यासह अन्य आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी वकिलांना साकडे घातले आहे. जनता बझार, राजारामपुरी व वरुणतीर्थ या दोन्ही शाखांच्या नूतनीकरण व सुशोभीकरणाच्या खर्चाची खोटी कागदपत्रे तयार करून ६४ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा अपहार केल्याचे लेखापरीक्षणामध्ये निष्पन्न झाले. या प्रकरणी विशेष लेखापरीक्षक वर्ग २ चे विष्णू गणपती कदम यांनी संस्थेचे चेअरमन उदय पोवार, संचालक प्रल्हाद चव्हाण (रा. शिवाजी पेठ), प्रकाश बोंद्रे (शिवाजी पेठ), तानाजी धोंडिराम साजणीकर (रा. हनुमाननगर, उजळाईवाडी), अरुण यशवंत साळोखे (रा. आपटेनगर), शिवाजी बा. घाटगे (रा. शिवाजी पेठ), नीरज कैलास जाजू (रा. नागाळा पार्क), कात्यायनी मजूर सहकारी संस्थेचे चेअरमन मधुकर लक्ष्मण शिंदे (रा. निकम गल्ली, कळंबा), व्यवस्थापक आनंदराव बा. फडतरे (रा. भुये, ता. करवीर) आदींच्या विरोधात फिर्याद दिल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. हा अपहार चार वर्षांपूर्वीचा आहे. कागदोपत्री तपास असल्याने त्यासाठी कायदेतज्ज्ञांची मदत घेवून आरोपींच्या विरोधात परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले जातील. त्यानंतर त्यांना अटक केली जाईल, असे पोलिस निरीक्षक सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)