शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

‘वरद’ हत्याप्रकरणी आरोपीची केली मनोवैज्ञानिक चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:29 IST

कोल्हापूर : कागल तालुक्यातील सोनाळी येथील वरद पाटील या बालकाच्या हत्येप्रकरणात संशयित आरोपी दत्तात्रय उर्फ मारुती तुकाराम वैद्य (रा. ...

कोल्हापूर : कागल तालुक्यातील सोनाळी येथील वरद पाटील या बालकाच्या हत्येप्रकरणात संशयित आरोपी दत्तात्रय उर्फ मारुती तुकाराम वैद्य (रा. सोनाळी) याने हत्येची कबुली दिली, तरीही हत्या नेमकी कशासाठी केली याचे गूढ अद्याप उकललेले नाही. त्यामुळे संशयित आरोपीची मंगळवारी नवी मुंबईत मनोवैज्ञानिक चाचणी करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. संशयिताची नार्को चाचणी करण्यात येत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सोनाळी (ता. कागल) येथील वरद पाटील या बालकाची हत्या करण्यात आली होती. त्याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी दत्तात्रय वैद्य याला अटक केली. हत्येला प्रथम नरबळीचा रंग देण्यात आला. नंतर हे नरबळी नसल्याचे स्पष्ट झाले. संशयित आरोपीने वरद या बालकाची हत्या करण्यामागचे कारण शोधण्यात पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहेत. हत्या प्रकरणाला महिना उलटला तरीही नेमके कारणाचे गूढ उकललेले नाही. संशयित आरोपी दत्तात्रय वैद्य याची मानसिकता तपासणीसाठी सोमवारी रात्री त्याला कडेकोट बंदोबस्तात पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे हे घेऊन नवी मुंबईला रवाना झाले होते. मंगळवारी दुपारी १२ वाजता नवी मुंबईत न्यायवैद्यक प्रयोगशाळेत त्याच्यावर मनोवैज्ञानिक चाचणी करण्यात आली. सुमारे दोन ते अडीच तास ही चाचणी घेण्यात आली. चाचणीचा अहवाल येण्यास उशीर लागणार आहे. कोणत्याही गंभीर अगर क्रूर गुन्ह्यात आरोपीची पोलिसांमार्फत मनोवैज्ञानिक चाचणी अग्रक्रमाने केली जाते. त्याच पद्धतीने ही चाचणी करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी दिली. तूर्त तरी नार्को चाचणी करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तपास स्थानिक पोलिसांमार्फतच

हत्याप्रकरणाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरीही स्थानिक पोलिसांकडून योग्य पद्धतीने व गतीने तपास सुरु आहे. तपास कामाबाबत गोपनीयता पाळली जात आहे, तरीही हत्येचे गूढ लवकरच उलगडेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.