शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

सकल मराठा समाजाची दसरा चौकात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 19:49 IST

राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणास स्थगिती आली आहे. मंत्रिगटाचे अध्यक्ष म्हणून अशोक चव्हाण हेच सर्वस्वी जबाबदार असल्यामुळे येथून पुढे त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, मराठा स्टाईलनेच उत्तर दिले जाईल, असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे.

ठळक मुद्देआरक्षणासाठी पुन्हा एल्गार मंत्री अशोक चव्हाण यांना फिरू देणार नाही

कोल्हापूर : राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणास स्थगिती आली आहे. मंत्रिगटाचे अध्यक्ष म्हणून अशोक चव्हाण हेच सर्वस्वी जबाबदार असल्यामुळे येथून पुढे त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, मराठा स्टाईलनेच उत्तर दिले जाईल, असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. शुक्रवारी दुपारी दसरा चौकात छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करून समाजातील तरुणांनी राग व्यक्त केला.हातात भगवे झेंड घेऊन शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर बैठक मारून या तरुणांनी आरक्षण आमच्या हक्काचे, राज्य सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असतानाही ॲड. कुंभकोणी हे संपूर्ण खटल्यादरम्यान एकदाही सुनावणीला हजर राहिले नाहीत.

हरिष साळवेंसारखे सीनियर कौन्सिल बदलून ज्यांची क्षमता नाही, असे वकील नेमले. यावरून हे सरकार मराठा समाज आणि आरक्षणप्रश्नी असंवेदनशील होते, हे दिसून येते. याला जबाबदार असणारे मंत्री अशोक चव्हाण यांचा समाज तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे, असे यावेळी समन्वयक सचिन तोडकर यांनी सांगितले.यावेळी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील, रवींद्र मुदगी, नितीन देसाई, स्वप्निल चव्हाण, विकी जाधव, शैलेश जाधव, राजेंद्र चव्हाण, स्वप्निल पार्टे, आकाश साळोखे, प्रमोद पाटील, नीलेश सुतार, समरजित तोडकर, शौनिका चव्हाण यांनी सहभाग घेतला. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाkolhapurकोल्हापूर