शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्थाकडील १ लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण : सहकारमंत्री सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 17:56 IST

राज्यातील सहकारी पतसंस्थांकडील एक लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याची राज्य शासनाची भूमिका असून, यासाठी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र सहकार विकास मंडळ काम करील, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी येथे केले.

ठळक मुद्देपतसंस्थाकडील १ लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण : सहकारमंत्रीकोल्हापूर विभागातील सहकारी पतसंस्थांची विशेष बैठक

कोल्हापूर : राज्यातील सहकारी पतसंस्थांकडील एक लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याची राज्य शासनाची भूमिका असून, यासाठी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र सहकार विकास मंडळ काम करील, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात कोल्हापूर विभागातील सहकारी पतसंस्थांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी सहकार विभागाचे विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील, महाराष्ट्र सहकार विकास मंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद आकरे, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था धनंजय डोईफोडे, विभागीय सहनिबंधक लेखापरीक्षण तुषार काकडे, कोल्हापूरचे जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, सांगलीचे जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन शंकर पाटील, वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अनिल पाटील, आदी उपस्थित होते.मंत्री देशमुख म्हणाले, सहकारी संस्थांच्या विशेषत: पतसंस्थांच्या निकोप वाढीसाठी सहकारात शिस्त आणि पारदर्शकता जोपासून सभासदहितास प्राधान्य देणे गरजेचे आहे. चांगल्या आणि दर्जेदार पतसंस्थांची संख्या वाढविणे आवश्यक असून, अडचणीतील पतसंस्थांना ‘एमसीडीसी’च्या माध्यमातून साहाय्य करून त्या सक्षम आणि आदर्श बनविण्यासाठी शासन पुढाकार घेईल.शंकर पाटील म्हणाले, जिल्ह्यातील पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून ‘एमसीडीसी’ला भाग भांडवलाप्रती एक कोटी उपलब्ध करून दिले जाईल. संतोष पाटील यांनी स्वागत केले

कर्ज वितरणासाठी तीन सदस्यांची समितीअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना विविध व्यवसाय उद्योगासाठी देण्यात येणाºया कर्जाचे व्याज शासन भरणार आहे. राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी बँकांनी या कर्जयोजनांमध्ये सक्रिय होऊन अधिकाधिक तरुणांना कर्ज उपलब्ध करून देण्याची भूमिका घ्यावी. कर्ज वितरणासाठी जिल्हास्तरावर जिल्हा उपनिबंधकांसह तीन सदस्यांची समिती स्थापन करून ही कर्जप्रकरणे मंजूर करण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे मंत्री देशमुख म्हणाले.

 कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आयोजित कोल्हापूर विभागातील सहकारी पतसंस्थांच्या विशेष बैठकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मार्गदर्शन केले. संतोष पाटील, मिलिंद आकरे, धनंजय डोईफोडे, तुषार काकडे, अरुण काकडे, नीलकंठ करे, शंकर पाटील, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखkolhapurकोल्हापूर