शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

पतसंस्थाकडील १ लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण : सहकारमंत्री सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 17:56 IST

राज्यातील सहकारी पतसंस्थांकडील एक लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याची राज्य शासनाची भूमिका असून, यासाठी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र सहकार विकास मंडळ काम करील, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी येथे केले.

ठळक मुद्देपतसंस्थाकडील १ लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण : सहकारमंत्रीकोल्हापूर विभागातील सहकारी पतसंस्थांची विशेष बैठक

कोल्हापूर : राज्यातील सहकारी पतसंस्थांकडील एक लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याची राज्य शासनाची भूमिका असून, यासाठी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र सहकार विकास मंडळ काम करील, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात कोल्हापूर विभागातील सहकारी पतसंस्थांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी सहकार विभागाचे विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील, महाराष्ट्र सहकार विकास मंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद आकरे, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था धनंजय डोईफोडे, विभागीय सहनिबंधक लेखापरीक्षण तुषार काकडे, कोल्हापूरचे जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, सांगलीचे जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन शंकर पाटील, वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अनिल पाटील, आदी उपस्थित होते.मंत्री देशमुख म्हणाले, सहकारी संस्थांच्या विशेषत: पतसंस्थांच्या निकोप वाढीसाठी सहकारात शिस्त आणि पारदर्शकता जोपासून सभासदहितास प्राधान्य देणे गरजेचे आहे. चांगल्या आणि दर्जेदार पतसंस्थांची संख्या वाढविणे आवश्यक असून, अडचणीतील पतसंस्थांना ‘एमसीडीसी’च्या माध्यमातून साहाय्य करून त्या सक्षम आणि आदर्श बनविण्यासाठी शासन पुढाकार घेईल.शंकर पाटील म्हणाले, जिल्ह्यातील पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून ‘एमसीडीसी’ला भाग भांडवलाप्रती एक कोटी उपलब्ध करून दिले जाईल. संतोष पाटील यांनी स्वागत केले

कर्ज वितरणासाठी तीन सदस्यांची समितीअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना विविध व्यवसाय उद्योगासाठी देण्यात येणाºया कर्जाचे व्याज शासन भरणार आहे. राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी बँकांनी या कर्जयोजनांमध्ये सक्रिय होऊन अधिकाधिक तरुणांना कर्ज उपलब्ध करून देण्याची भूमिका घ्यावी. कर्ज वितरणासाठी जिल्हास्तरावर जिल्हा उपनिबंधकांसह तीन सदस्यांची समिती स्थापन करून ही कर्जप्रकरणे मंजूर करण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे मंत्री देशमुख म्हणाले.

 कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आयोजित कोल्हापूर विभागातील सहकारी पतसंस्थांच्या विशेष बैठकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मार्गदर्शन केले. संतोष पाटील, मिलिंद आकरे, धनंजय डोईफोडे, तुषार काकडे, अरुण काकडे, नीलकंठ करे, शंकर पाटील, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखkolhapurकोल्हापूर