शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

नोंदणीआडून नव्या बालगृहांचे प्रस्ताव, स्वयंसेवी संस्थांकडून तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 5:36 AM

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कायद्याचा आधार घेऊन राज्यात अस्तित्वात असलेल्या बालगृहांच्या नोंदणीचे काम सुरू आहे; परंतु त्याच्या आडून काही स्वयंसेवी संस्थांकडून नव्याने बालगृहे सुरू करण्याचे प्रस्तावही दाखल होत आहेत.

विश्वास पाटील कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कायद्याचा आधार घेऊन राज्यात अस्तित्वात असलेल्या बालगृहांच्या नोंदणीचे काम सुरू आहे; परंतु त्याच्या आडून काही स्वयंसेवी संस्थांकडून नव्याने बालगृहे सुरू करण्याचे प्रस्तावही दाखल होत आहेत. मुले बालगृहांपेक्षा कुटुंबातच राहिली पाहिजेत हे धोरण असताना पुन्हा बालगृहांचे प्रस्ताव स्वीकारले जात असल्याने या क्षेत्रात काम करणाºया जाणकारांकडून तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.केंद्राने १ जानेवारी २०१६पासून बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ लागू केला आहे. या कायद्याच्या कलम ४१ (१) अंतर्गत बालकांसाठी कार्यरत आणि इच्छुक असणाºया सर्व अनुदानित, विनाअनुदानित, शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी संस्था यांनी या कायद्यांतर्गत शासनाकडून नोंदणी प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित संस्थांकडून नोंदणी करण्यासाठी धावपळ सुरू असून, त्याला जोडूनच काही जिल्ह्यांतून नवीन बालगृहांचे प्रस्ताव सादर केले जात आहेत.आम्ही फक्त जुन्याच संस्थांची नोंदणी करून घेत आहोत, असे आयुक्तालय म्हणत असले तरी मग नवीन प्रस्ताव का स्वीकारले जात आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.आता नव्याने नोंदणी होणाºया आणि सध्या सुरू असलेल्या बालगृहांत बालकल्याण समितीमार्फतच प्रवेश दिले जाणार आहेत. मग मुले येणार कुठून? संस्था हा बालकांसाठी अंतिम पर्याय म्हणूनच स्वीकारला पाहिजे या तत्त्वाला हरताळ फासला जाणार आहे.- अतुल देसाई, अध्यक्ष, आभास फाउंडेशन, कोल्हापूर