शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

पुराचे पाणी दुष्काळी भागात नेण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 01:09 IST

कोल्हापूर : अतिवृष्टी होऊन पुराचे वाहून जाणारे ११५ टीएमसी पाणी बोगदा (टनेल)द्वारे दुष्काळी भागात नेण्यासाठी प्रस्तावित केलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण ...

कोल्हापूर : अतिवृष्टी होऊन पुराचे वाहून जाणारे ११५ टीएमसी पाणी बोगदा (टनेल)द्वारे दुष्काळी भागात नेण्यासाठी प्रस्तावित केलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पासाठी २७ हजार कोटींची आवश्यकता आहे. याचे सादरीकरण जागतिक बॅँकेच्या प्रतिनिधींसमोर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात व पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र संकपाळ यांनी राधानगरी धरण येथे मंगळवारी केले. दरम्यान, जिल्ह्यात चार पथकांनी पूरग्रस्त भागात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.यानंतर जागतिक बॅँकेचे राज सिंग, रंजन समंतराय, युकियो टनाका यांनी राधानगरी धरण येथे भेट दिली. या ठिकाणी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र संकपाळ, कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील यांनी भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचे सादरीकरण करून माहिती दिली. पुराचे सुमारे ११५ टीएमसी पाणी वाहून जाते, हे पाणी कुंभी, कासारी, वारणा, कोयना, कृष्णा, नीरा, भीमा या नद्यांमार्गे उजनी धरण येथे नेण्याचा हा प्रकल्प आहे; त्यासाठी २०१ कि. मी. अंतर लागणार आहे. दुष्काळ असलेल्या सांगलीतील पाच तालुके, साताऱ्यातील चार, सोलापुरातील ११, पुणे दोन, मराठवाड्यातील उस्मानाबाद येथील एका तालुक्याला याचा लाभ होईल. यामुळे सुमारे पाच लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावर या प्रकल्पाची संकल्पना चांगली असल्याचे जागतिक बॅँकेच्या प्रतिनिधींनी सांगितले. राधानगरी धरणाचे दरवाजे स्वयंचलित असल्याने १00 टक्के धरण भरल्यावरच ते उघडतात, असे पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर प्रतिनिधींनी ५० टक्के धरण भरल्यानंतर हे दरवाजे उघडता येतील, या पद्धतीने रचना असायला हवी, असे सांगितले; परंतु हे धरण हेरिटेज असल्याने ते शक्य नसल्याचे पाटबंधारे अधिकाºयांनी सांगितले. त्याचबरोबर प्रतिनिधींनी २५ वर्षांत येणारा पूर डोळ्यासमोर ठेवून ५० वर्षांची ब्लू लाईन आखून नद्यांच्या परिसरातील कुटुंबांचे स्थलांतर करावे, असे मत मांडले; परंतु हे शक्य नसल्याचे पाटबंधारे अधिकाºयांनी स्पष्ट केले.दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी जागतिक बॅँकेच्या व एशियन बॅँकेच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी, सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र संकपाळ, आदी उपस्थित होते.शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणारपूरग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी करून बॅँकेचे प्रतिनिधी उद्या, गुरुवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. पुराच्या पाण्याचा वापर कसा करता येईल, पुरामुळे रस्ते पाण्याखाली जाऊ नये, तसेच घरांचे नुकसान होणार नाही, या पद्धतीने घरांची निर्मिती, पूरग्रस्त भागात उड्डाणपूल बांधण्याची आवश्यकता आहे, यासंदर्भातील माहिती बॅँकेच्या प्रतिनिधींना दिली आहे, असे प्रवीणसिंह परदेशी यांनी सांगितले.उड्डाणपुलाचा विषय ‘लोकमत’ने मांडलापूरग्रस्त भागात उड्डाणपूल होणार अशा आशयाचे वृत्त ४ सप्टेंबरला ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या उड्डाणपुलासंदर्भात जागतिक बँकेच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीत चर्चा झाली.बँकेचे शिष्टमंडळ असेपुरामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणाºया जागतिक बॅँकेच्या शिष्टमंडळात अनुप करनाथ, पीयूष शेखसरिया, पूनम अहलुवालिया, राज सिंग, रंजन सामंतराय, युकीओ टनाका, आय जसब्रँड एच. डी. जोंग, विजयशेखर कलवाकोंडा, इड्युरडो फेरियरा यांचा समावेश होता.