शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

शिरोळमध्ये पूरबाधित गावांत नौकांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 01:05 IST

महापुराच्या आपत्तीनंतर गाव तिथं नाव हा प्रस्ताव आता पुढे आला आहे. सुमारे ४७ गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. सुरुवातीला लाकडी नावेच्या साहाय्याने पूरग्रस्तांचे स्थलांतर सुरू होते.

ठळक मुद्दे लाकडी नौकांना यांत्रिकी मशीन बसविण्याचा प्रस्ताव तालुक्यात ३६ पैकी २३ नौका नादुरुस्त

संदीप बावचे।शिरोळ : एनडीआरफ, लष्कर, नौदलाच्या पुढे जाऊन लाकडी नावेच्या साहाय्याने पूरग्रस्तांना सुरक्षितपणे स्थलांतरित करण्याची कामगिरी शिरोळ तालुक्यातील अनेक नावाड्यांनी बजावली. प्रामुख्याने आलास, कनवाड, गणेशवाडी, कवठेसार, खिद्रापूर या ठिकाणी नावेच्या साहाय्याने पूरग्रस्तांना पैलतीरी पोहोचवून नावाड्यांनी जिगरबाज कामगिरी बजावली.

महापुराच्या आपत्तीनंतर गाव तिथं नाव हा प्रस्ताव आता पुढे आला आहे. सुमारे ४७ गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. सुरुवातीला लाकडी नावेच्या साहाय्याने पूरग्रस्तांचे स्थलांतर सुरू होते. त्यानंतर सरकारी यंत्रणा आली. त्यामुळे आपत्ती काळात लाकडी नावांना यांत्रिकी मशीन बसविण्याचा प्रस्ताव पुढे येत आहे.

शंभर वर्षांतील सर्व रेकॉर्ड मोडून प्रलयकारी महापुराने शिरोळ तालुक्यात थैमान घातले. सन २००५ च्या महापुराची गणिते मांडणाऱ्या अनेक पूरग्रस्तांची गणिते चुकली. सुरुवातीला अनेक पूरग्रस्तांनी पै-पाहुणे, नातेवाईक यांच्याकडे आसरा घेतला. मात्र, ५ आॅगस्टनंतर पुराचे पाणी झपाट्याने वाढू लागल्यानंतर अनेक गावांचे मार्ग बंद झाले. त्यामुळे नावेतून स्थलांतर होण्याशिवाय पर्याय नव्हता. वाढणाºया पाण्याची धास्ती घेतलेले अनेकजण जिवाच्या आकांताने चिंताग्रस्त होते.

अशा संकटात पूरग्रस्तांसाठी स्थानिक नावाडी धावून आले. आलाससह कनवाड, गणेशवाडी, खिद्रापूर, कवठेसार, कोथळी, औरवाड येथील नावाड्यांनी अनेक पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. त्यानंतर लष्कर, नौदल, एनडीआरएफची पथके दाखल झाली. त्यांच्याबरोबरीनेच स्थानिक नावाड्यांनीदेखील जीव धोक्यात घालून पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी पोहोचविले.महापुराच्या या आपत्तीनंतर ‘गाव तिथं नाव’ हा प्रस्ताव पुढे आला आहे. सन २००५ च्या महापुरात सुमारे ४० गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला होता, तर यंदाच्या महापुरात सुमारे ४७ गावे पूरबाधित झाली.

२००५ सालातील महापुरानंतर गाव तिथं नाव असा ठराव पंचायत समितीच्या सभेत करण्यात आला होता. त्यानंतर ४२ गावांत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लाकडी नौका आल्या होत्या. त्यानंतर कालांतराने ३६ गावांत लाकडी नौका राहिल्या. मात्र, महापुराच्या आपत्तीत तेरा गावांतीलच नौका सुस्थितीत असल्याची माहिती पुढे आली आहे. कनवाड, आलास, गणेशवाडी, कवठेसार, खिद्रापूर, राजापूर, नांदणी, धरणगुत्ती, कोथळी, उदगाव, औरवाड, नृसिंहवाडी, आदी गावांतील नौका चांगल्या स्थितीत असल्यामुळे त्याचा वापर झाला.

गाव तिथं नाव या माध्यमातून सुस्थितीत नौका सुरू ठेवण्याबरोबरच आपत्ती काळात अशा नौकांना यांत्रिकी मशीन बसवून पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यासाठी उपयोग होऊ शकतो, असा प्रस्ताव पुढे आला आहे. क्षमतेपेक्षा जादा लोकांची वाहतूक लाकडी नौकांतून पूरकाळात करण्यात आली. मात्र, मर्यादित संख्याच नावेत असावी, हा मुद्दा पुढे आला आहे. लाकडी नौकांना यांत्रिकी मशीन बसविल्यास महापुराच्या काळात त्याचा निश्चित फायदा होणार आहे.शासकीय यंत्रणेबरोबरच कामगिरीअनेक जिगरबाज नावाड्यांनी महापूर काळात विनामोबदला सेवा बजावली. जीव धोक्यात घालून नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचविणाºया नावाड्यांना मदतीचे हात आता पुढे आले आहेत. शासकीय यंत्रणेबरोबर त्यांनीही महापूर काळात चांगली सेवा बजावली. लाकडी नौकांना यांत्रिकी मशीन बसविल्यास शासनाच्या यंत्रणेची गरजच भासणार नाही. त्यामुळे शासन पातळीवर याबाबत कार्यवाही होणे तितकेच गरजेचे आहे. 

लाकडी नौकांना यांत्रिकी मशीन बसविल्यास निश्चितच फायदा होणार आहे. अशा नौका चालविणाºया नावाड्यांना शासनाने कायमस्वरूपी मानधन द्यावे. शिवाय लाईफ जॅकेट याबरोबरच आपत्तीकाळातील सुविधा पुरवाव्यात.- सदाशिव आंबी, नावाडी गणेशवाडीमहापूर काळात लाकडी नौका चालविणाऱ्यांनी पूरग्रस्तांना स्थलांतरित करून चांगले काम केले आहे. या लाकडी नौकांना यांत्रिकी मशीन बसविल्यास आणखीन जलद काम त्यांना करता येईल. त्यासाठी शासनाकडे अशा नौकांना यांत्रिकी मशीन बसविण्याचा प्रस्ताव देणार आहोत. - समीर शिंगटे, प्रांताधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर