शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
4
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
5
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
6
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
7
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
9
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा
10
ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार
11
Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!
12
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
13
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
14
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे लवकरच बांधणार लग्नगाठ? स्वतःच केला खुलासा, म्हणाला...
15
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
16
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
17
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
18
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
19
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
20
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई

लक्ष्मीपुरी परिसरात समस्यांचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यातील दुर्गम भागात सोयीसुविधा पोहोचल्या. वाड्यावस्त्यांना जोडणारे रस्ते झाले. खेडेगावांनी विकासासाठी कुस बदलली. एकीकडे हे सकारात्मक चित्र असताना कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत असणाºया लक्ष्मीपुरी परिसराला मात्र अनेक गैरसोयींनी घेरले असून, अतिदुर्गम आणि अतिदुर्लक्षित भाग असल्यासारखी येथे परिस्थिती तयार झाली आहे. महापालिका अधिकाºयांचे दुर्लक्ष, निधीची कमतरता यामुळे ही ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यातील दुर्गम भागात सोयीसुविधा पोहोचल्या. वाड्यावस्त्यांना जोडणारे रस्ते झाले. खेडेगावांनी विकासासाठी कुस बदलली. एकीकडे हे सकारात्मक चित्र असताना कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत असणाºया लक्ष्मीपुरी परिसराला मात्र अनेक गैरसोयींनी घेरले असून, अतिदुर्गम आणि अतिदुर्लक्षित भाग असल्यासारखी येथे परिस्थिती तयार झाली आहे. महापालिका अधिकाºयांचे दुर्लक्ष, निधीची कमतरता यामुळे ही परिस्थिती उद्भवली असली तरी किती दिवस नागरिकांनी अशा गैरसोयींचा सामना करायचा असा संतप्त सवाल येथे विचारला जात आहे.एकीकडे शहरात सगळीकडे सुधारणा होत आहेत. रस्ते, गटारी, ड्रेनेज होत आहेत. वाहतुकीचे नियोजन केले जात आहे; पण लक्ष्मीपुरीला मात्र सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याने व्यावसायिक व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. मुळात लक्ष्मीपुरी परिसर हा सखल भागात असल्याने शहरात मोठा पाऊस झाला की, मिरजकर तिकटी, शिवाजी पुतळा, महानगरपालिका कार्यालय, बिंदू चौक, आदी परिसरातील पाणी थेट लक्ष्मीपुरीत घुसते आणि तेथे एखाद्या तळ्याचे स्वरूप येते. पाऊस उघडल्यानंतर हे पाणी लगेच निचरा होत नाही, तर ठिकठिकाणी साचून राहते. या साचलेल्या पाण्यात ड्रेनेजचेही सांडपाणी जाऊन मिसळत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. डास, कीटक यांचे साम्राज्य निर्माण होते.या परिसरातील मोठ्या गटारी, ड्रेनेज यांची झाकणे बºयाच ठिकाणी तुटून पडली आहेत. त्यामुळे ती उघडीच राहिली आहेत. मोठा पाऊस झाला की त्याचा अंदाज येत नाही. कोणी तरी गटारीत पडून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. काही गटारींवर मोठे लांबडे दगड ठेवून झाकले आहेत; परंतु या दगडावरून वाहने गेल्यास अपघात होण्याचीही शक्यता आहे. अनेक वेळा गटारी तुंबल्यामुळे त्यातील सांडपाणी रस्त्यावरून वाहत राहते.रस्त्यावर सहा-सहा इंचांपर्यंत खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी रस्त्याची खडी निघून गेली असल्याने खाचखळगे झाले आहेत. खड्डे पडलेल्या रस्त्यात पावसाचे पाणी अनेक दिवस तुंबून राहते. त्यामुळे परिसरात दलदल ही कायमची डोकेदुखी आहे.फेरीवाल्यांचे भर रस्त्यावर झालेले अतिक्रमण, माल वाहतूक करणाºया ट्रक, टेम्पो, अवजड वाहनांची दिवसभर असणारी रहदारी ही वाहतुकीची गंभीर समस्या आहे. दुचाकीसह अन्य चारचाकी वाहनांच्या पार्किंगचे कोणतेच नियोजन येथे नसल्याने वाहतुकीची कायम कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यातच श्रमिक हॉलच्या समोरील रस्त्यावर अनेकांनी थेट रस्त्यावरच दुकाने थाटली आहेत. भर रस्त्यावरच वाहने दुरुस्तीचे काम केले जाते. त्यामुळे अशा कोंडी झालेल्या परिस्थितूनच वाहनधारक, पादचाºयांना मार्ग काढावा लागतो.