शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

लॉकडाऊनमुळे ‘केएमटी’समोर अडचणींत : महिनाभर वर्कशॉपमध्ये बस धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 17:10 IST

कोट्यवधींचे उत्पन्न बुडत असल्यामुळे केएमटी आर्थिक अडचणीत आहे. सर्व बसेस वर्कशॉपमध्ये गेल्या महिन्यापासून धूळ खात थांबून आहेत. वापरच नसल्यामुळे सुटे भाग खराब होण्याची शक्यता आहे. यामध्ये वर्कशॉपमध्ये बॅटरी, टायर खराब होण्याचा सर्वाधिक धोका आहे.

विनोद सावंत / लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : लॉकडाऊन, संचारबंदीमुळे केएमटीसमोर अडचणींचा डोंगर निर्माण झाला आहे. गेल्या महिन्यापासून बस वर्कशॉपमध्ये धूळ खात उभ्या आहेत. वापर नसल्यामुळे बॅटरी, टायर खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नवीन बसेसही नादुरुस्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन केले आहे. याचा सर्व घटकांना फटका बसला आहे. यातून ‘केएमटी’ही सुटलेली नाही. गेल्या महिन्यापासून बससेवा बंद आहे. कोट्यवधींचे उत्पन्न बुडत असल्यामुळे केएमटी आर्थिक अडचणीत आहे. सर्व बसेस वर्कशॉपमध्ये गेल्या महिन्यापासून धूळ खात थांबून आहेत. वापरच नसल्यामुळे सुटे भाग खराब होण्याची शक्यता आहे. यामध्येवर्कशॉपमध्ये बॅटरी, टायर खराब होण्याचा सर्वाधिक धोका आहे. 

थांबून असणाऱ्या बसेस - १२९नवीन बसेस- ७५नादुरुस्त बसेस - १३रोज मार्गस्थ असणा-या बसेस - १००

  1. लॉकडाऊननंतर सार्वजानिक वाहतूक सेवा सुरू होतील याची शाश्वती नाही. परिणामी एकाच ठिकाणी किमान दीड ते दोन महिने बस थांबून राहणार अशी स्थिती आहे. त्यामुळे डिझेल खर्च कमी होणार असला तरी हवा नसल्याने टायर तसेच बॅटरी खराब होण्याची शक्यता आहे. याचबरोबर इंजिन, वायरिंंगची देखभाल करावी लागणार आहे. त्यामुळे वर्कशॉप विभागाची जबाबदारी वाढली आहे.
  2. अशोक लेलँड कंपनीच्या ७५ नवीन बसेस असून ६५ बसेस सुस्थित आहेत. या बसेस अद्ययावत तंत्रज्ञानाच्या असून सेन्सरवर त्यांचे कामकाज चालते. यामध्ये काही मोठा बिघाड झाल्यास परराज्यांतून टेक्निशियन आणावे लागतात. त्यामुळे बंददरम्यान, नवीन बसेसची विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे. अन्यथा लॉकडाऊन उठविल्यानंतर सर्व बसेस मार्गस्थ होण्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

बॅटरी खराब होऊ नये यासाठी दोन दिवसांतून बसेस एकदा तासभर बस सुरू करून ठेवल्या जात आहेत. तसेच हवेचीही तपासणी केली जात आहे. वापराविना बसेस नादुरुस्त होणार नाहीत, याची योग्य ती दक्षता घेतली जात आहे.- सुभाष देसाई, केएमटी व्यवस्थापक 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका