शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

विकासाभिमुख कागलच्या समस्याही बेसुमार--कागल तालुका

By admin | Updated: November 5, 2014 00:04 IST

तालुक्यातील महत्त्वाच्या समस्या

जहाँगीर शेख - कागल --तीन नद्यांचे वरदान लाभलेला कागल तालुका आज जिल्ह्यात सर्वाधिक जमीन सिंचनाखाली असलेला तालुका आहे. चार साखर कारखाने, दोन दूध संघ, पंचतारांकित औद्योगिक वसाहत, विविध शैक्षणिक केंद्रे, दळणवळणाच्या सुविधा यांनी तालुका आज प्रगतिपथावर आहे. मात्र, या प्रगतीबरोबरच काही समस्याही तितक्याच गंभीर झाल्या आहेत.येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे येथे जसा रोजगार निर्माण झाला, तसा परिसराचा सामाजिक बाजही बदलला आहे. कागल, कसबा सांगाव परिसरात त्याचे परिणाम दिसत आहेत. औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक आणि कामगारांना शासनाकडून सहकार्याची गरज आहे. नवे प्रकल्प येण्याचे प्रमाण मंदावले आहेत. नागनवाडी जलसिंचन प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना पर्यायी जमीन मिळाली नसल्याने गेली चार वर्षे या प्रकल्पाचे काम थांबलेले आहे. हीच अवस्था दूधगंगा प्रकल्पाच्या कालव्याची आहे. तालुक्यातील या कालव्याची खोदाई झाली; पण गेली दहा वर्षे पुढची कामे ठप्प झाली आहेत. ज्या कालव्यांमध्ये पाणी सोडले जाते, त्याचे अस्तरीकरण झाले नसल्याने हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांचे नुकसान होत आहे. कागल आणि मुरगूड ग्रामीण रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारासाठी कोल्हापूरला जावे लागत आहे.तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचारी कार्यालयात पूर्णवेळ हजर नसतात. परिणामी, जनतेच्या कामांचा खेळखंडोबा आणि जनतेच्या पैशाचा दुरुपयोग होत असल्याचे तालुक्यात चित्र आहे.तालुक्यातील महत्त्वाच्या समस्यासरकारी गायराने, पाणंदीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे... दिवसेंदिवस वाढचमहसूल विभाग, सिटी सर्व्हे विभाग, रेशन धान्य विभागातील कामकाजाबद्दल जनतेमध्ये रोष, जाणीवपूर्वक दिरंगाईमुळे नागरिक वेठीस८६ पैकी केवळ ४२ गावांचाच सिटी सर्व्हेपंचायत समितीला नव्या प्रशासकीय इमारतीची गरजशेतकऱ्यांच्या रद्द झालेल्या कर्जमाफीमुळे शेतकरी आणि सेवा संस्था आर्थिक गर्तेत.बुडीत पतसंस्थांमध्ये लोकांचे कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत... कार्यवाही नाही.कागल तालुका कृषी विभागाला स्वत:चे जागा कार्यालय नाही.लिंगनूर, कापशी भागात स्वतंत्र पोलीस ठाण्याची गरज.कागल तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा चिंताजनक.कागल शहराच्या समस्याकागल शहरासाठी सुधारित विकास आराखडा हवाजयसिंगराव तलाव पाणलोट क्षेत्र निश्चितीकरणाचे काम रखडलेलेमहामार्ग चौपदरीकरणातील कामाच्या त्रुटीमुळे नागरिकांना त्रासकागल ग्रामीण रुग्णालयात अद्ययावतअपघात विभाग हवाकागल पोलीस ठाणे इतिहासकालीन इमारतीत, नव्या इमारतीची गरजमुरगूड शहराच्या समस्यामुरगूड शहराच्या हद्दवाढीची गरजशहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा (पिण्याच्या) यंत्रणेची गरजमुरगूड शहरात एकही बगिचा नाहीमुरगूड बसस्थानकाची दुरवस्था - स्वतंत्र डेपोची गरजतहसील कार्यालयातील प्रतिज्ञापत्रे मुरगूडमध्येच मिळावीतपाणी समस्या शेतीसाठीचीतालुक्याच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला नागनवाडी प्रकल्प ४५ टक्के काम झाल्यानंतर रखडला आहे. या प्रकल्पासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनावरून हे काम थांबले आहे.दूधगंगा प्रकल्पातून निढोरी शाखेतून निघालेले तीनही कालव्यांचे काम ठप्प आहे. काही ठिकाणी केवळ खोदाईच झालेली आहे, तर अस्तरीकरण नसल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे.शेती पंपाच्या वीजबिलाच्या आकारणीबद्दलही नाराजी.पाणी समस्या पिण्यासाठीचीगावागावांत नळपाणी पुरवठा योजना झाल्या आहेत; पण त्या दर्जेदार नाहीत. जलस्वराज्य प्रकल्पातील बहुतांश योजना कुचकामी, परिणामी पाणीपुरवठ्यावर परिणाम, दूषित पाण्याचा पुरवठा.ग्रामपंचायतींना पाणी योजना आणि रस्त्यावरील विजेची बिले भरणे अशक्य होत असल्याने वारंवार वीजपुरवठा तोडण्याचे प्रकार होतात.पंचतारांकित वसाहतीमध्ये नवीन प्रकल्प येईनात : दूधगंगा कालवा, नागनवाडी जलसिंचन प्रकल्पाचे कामही रखडलेजहाँगीर शेख ल्ल कागलतीन नद्यांचे वरदान लाभलेला कागल तालुका आज जिल्ह्यात सर्वाधिक जमीन सिंचनाखाली असलेला तालुका आहे. चार साखर कारखाने, दोन दूध संघ, पंचतारांकित औद्योगिक वसाहत, विविध शैक्षणिक केंद्रे, दळणवळणाच्या सुविधा यांनी तालुका आज प्रगतिपथावर आहे. मात्र, या प्रगतीबरोबरच काही समस्याही तितक्याच गंभीर झाल्या आहेत.येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे येथे जसा रोजगार निर्माण झाला, तसा परिसराचा सामाजिक बाजही बदलला आहे. कागल, कसबा सांगाव परिसरात त्याचे परिणाम दिसत आहेत. औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक आणि कामगारांना शासनाकडून सहकार्याची गरज आहे. नवे प्रकल्प येण्याचे प्रमाण मंदावले आहेत. नागनवाडी जलसिंचन प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना पर्यायी जमीन मिळाली नसल्याने गेली चार वर्षे या प्रकल्पाचे काम थांबलेले आहे. हीच अवस्था दूधगंगा प्रकल्पाच्या कालव्याची आहे. तालुक्यातील या कालव्याची खोदाई झाली; पण गेली दहा वर्षे पुढची कामे ठप्प झाली आहेत. ज्या कालव्यांमध्ये पाणी सोडले जाते, त्याचे अस्तरीकरण झाले नसल्याने हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांचे नुकसान होत आहे. कागल आणि मुरगूड ग्रामीण रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारासाठी कोल्हापूरला जावे लागत आहे.तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचारी कार्यालयात पूर्णवेळ हजर नसतात. परिणामी, जनतेच्या कामांचा खेळखंडोबा आणि जनतेच्या पैशाचा दुरुपयोग होत असल्याचे तालुक्यात चित्र आहे.