शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विकासाभिमुख कागलच्या समस्याही बेसुमार--कागल तालुका

By admin | Updated: November 5, 2014 00:04 IST

तालुक्यातील महत्त्वाच्या समस्या

जहाँगीर शेख - कागल --तीन नद्यांचे वरदान लाभलेला कागल तालुका आज जिल्ह्यात सर्वाधिक जमीन सिंचनाखाली असलेला तालुका आहे. चार साखर कारखाने, दोन दूध संघ, पंचतारांकित औद्योगिक वसाहत, विविध शैक्षणिक केंद्रे, दळणवळणाच्या सुविधा यांनी तालुका आज प्रगतिपथावर आहे. मात्र, या प्रगतीबरोबरच काही समस्याही तितक्याच गंभीर झाल्या आहेत.येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे येथे जसा रोजगार निर्माण झाला, तसा परिसराचा सामाजिक बाजही बदलला आहे. कागल, कसबा सांगाव परिसरात त्याचे परिणाम दिसत आहेत. औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक आणि कामगारांना शासनाकडून सहकार्याची गरज आहे. नवे प्रकल्प येण्याचे प्रमाण मंदावले आहेत. नागनवाडी जलसिंचन प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना पर्यायी जमीन मिळाली नसल्याने गेली चार वर्षे या प्रकल्पाचे काम थांबलेले आहे. हीच अवस्था दूधगंगा प्रकल्पाच्या कालव्याची आहे. तालुक्यातील या कालव्याची खोदाई झाली; पण गेली दहा वर्षे पुढची कामे ठप्प झाली आहेत. ज्या कालव्यांमध्ये पाणी सोडले जाते, त्याचे अस्तरीकरण झाले नसल्याने हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांचे नुकसान होत आहे. कागल आणि मुरगूड ग्रामीण रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारासाठी कोल्हापूरला जावे लागत आहे.तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचारी कार्यालयात पूर्णवेळ हजर नसतात. परिणामी, जनतेच्या कामांचा खेळखंडोबा आणि जनतेच्या पैशाचा दुरुपयोग होत असल्याचे तालुक्यात चित्र आहे.तालुक्यातील महत्त्वाच्या समस्यासरकारी गायराने, पाणंदीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे... दिवसेंदिवस वाढचमहसूल विभाग, सिटी सर्व्हे विभाग, रेशन धान्य विभागातील कामकाजाबद्दल जनतेमध्ये रोष, जाणीवपूर्वक दिरंगाईमुळे नागरिक वेठीस८६ पैकी केवळ ४२ गावांचाच सिटी सर्व्हेपंचायत समितीला नव्या प्रशासकीय इमारतीची गरजशेतकऱ्यांच्या रद्द झालेल्या कर्जमाफीमुळे शेतकरी आणि सेवा संस्था आर्थिक गर्तेत.बुडीत पतसंस्थांमध्ये लोकांचे कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत... कार्यवाही नाही.कागल तालुका कृषी विभागाला स्वत:चे जागा कार्यालय नाही.लिंगनूर, कापशी भागात स्वतंत्र पोलीस ठाण्याची गरज.कागल तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा चिंताजनक.कागल शहराच्या समस्याकागल शहरासाठी सुधारित विकास आराखडा हवाजयसिंगराव तलाव पाणलोट क्षेत्र निश्चितीकरणाचे काम रखडलेलेमहामार्ग चौपदरीकरणातील कामाच्या त्रुटीमुळे नागरिकांना त्रासकागल ग्रामीण रुग्णालयात अद्ययावतअपघात विभाग हवाकागल पोलीस ठाणे इतिहासकालीन इमारतीत, नव्या इमारतीची गरजमुरगूड शहराच्या समस्यामुरगूड शहराच्या हद्दवाढीची गरजशहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा (पिण्याच्या) यंत्रणेची गरजमुरगूड शहरात एकही बगिचा नाहीमुरगूड बसस्थानकाची दुरवस्था - स्वतंत्र डेपोची गरजतहसील कार्यालयातील प्रतिज्ञापत्रे मुरगूडमध्येच मिळावीतपाणी समस्या शेतीसाठीचीतालुक्याच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला नागनवाडी प्रकल्प ४५ टक्के काम झाल्यानंतर रखडला आहे. या प्रकल्पासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनावरून हे काम थांबले आहे.दूधगंगा प्रकल्पातून निढोरी शाखेतून निघालेले तीनही कालव्यांचे काम ठप्प आहे. काही ठिकाणी केवळ खोदाईच झालेली आहे, तर अस्तरीकरण नसल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे.शेती पंपाच्या वीजबिलाच्या आकारणीबद्दलही नाराजी.पाणी समस्या पिण्यासाठीचीगावागावांत नळपाणी पुरवठा योजना झाल्या आहेत; पण त्या दर्जेदार नाहीत. जलस्वराज्य प्रकल्पातील बहुतांश योजना कुचकामी, परिणामी पाणीपुरवठ्यावर परिणाम, दूषित पाण्याचा पुरवठा.ग्रामपंचायतींना पाणी योजना आणि रस्त्यावरील विजेची बिले भरणे अशक्य होत असल्याने वारंवार वीजपुरवठा तोडण्याचे प्रकार होतात.पंचतारांकित वसाहतीमध्ये नवीन प्रकल्प येईनात : दूधगंगा कालवा, नागनवाडी जलसिंचन प्रकल्पाचे कामही रखडलेजहाँगीर शेख ल्ल कागलतीन नद्यांचे वरदान लाभलेला कागल तालुका आज जिल्ह्यात सर्वाधिक जमीन सिंचनाखाली असलेला तालुका आहे. चार साखर कारखाने, दोन दूध संघ, पंचतारांकित औद्योगिक वसाहत, विविध शैक्षणिक केंद्रे, दळणवळणाच्या सुविधा यांनी तालुका आज प्रगतिपथावर आहे. मात्र, या प्रगतीबरोबरच काही समस्याही तितक्याच गंभीर झाल्या आहेत.येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे येथे जसा रोजगार निर्माण झाला, तसा परिसराचा सामाजिक बाजही बदलला आहे. कागल, कसबा सांगाव परिसरात त्याचे परिणाम दिसत आहेत. औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक आणि कामगारांना शासनाकडून सहकार्याची गरज आहे. नवे प्रकल्प येण्याचे प्रमाण मंदावले आहेत. नागनवाडी जलसिंचन प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना पर्यायी जमीन मिळाली नसल्याने गेली चार वर्षे या प्रकल्पाचे काम थांबलेले आहे. हीच अवस्था दूधगंगा प्रकल्पाच्या कालव्याची आहे. तालुक्यातील या कालव्याची खोदाई झाली; पण गेली दहा वर्षे पुढची कामे ठप्प झाली आहेत. ज्या कालव्यांमध्ये पाणी सोडले जाते, त्याचे अस्तरीकरण झाले नसल्याने हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांचे नुकसान होत आहे. कागल आणि मुरगूड ग्रामीण रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारासाठी कोल्हापूरला जावे लागत आहे.तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचारी कार्यालयात पूर्णवेळ हजर नसतात. परिणामी, जनतेच्या कामांचा खेळखंडोबा आणि जनतेच्या पैशाचा दुरुपयोग होत असल्याचे तालुक्यात चित्र आहे.