शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

विकासाभिमुख कागलच्या समस्याही बेसुमार--कागल तालुका

By admin | Updated: November 5, 2014 00:04 IST

तालुक्यातील महत्त्वाच्या समस्या

जहाँगीर शेख - कागल --तीन नद्यांचे वरदान लाभलेला कागल तालुका आज जिल्ह्यात सर्वाधिक जमीन सिंचनाखाली असलेला तालुका आहे. चार साखर कारखाने, दोन दूध संघ, पंचतारांकित औद्योगिक वसाहत, विविध शैक्षणिक केंद्रे, दळणवळणाच्या सुविधा यांनी तालुका आज प्रगतिपथावर आहे. मात्र, या प्रगतीबरोबरच काही समस्याही तितक्याच गंभीर झाल्या आहेत.येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे येथे जसा रोजगार निर्माण झाला, तसा परिसराचा सामाजिक बाजही बदलला आहे. कागल, कसबा सांगाव परिसरात त्याचे परिणाम दिसत आहेत. औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक आणि कामगारांना शासनाकडून सहकार्याची गरज आहे. नवे प्रकल्प येण्याचे प्रमाण मंदावले आहेत. नागनवाडी जलसिंचन प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना पर्यायी जमीन मिळाली नसल्याने गेली चार वर्षे या प्रकल्पाचे काम थांबलेले आहे. हीच अवस्था दूधगंगा प्रकल्पाच्या कालव्याची आहे. तालुक्यातील या कालव्याची खोदाई झाली; पण गेली दहा वर्षे पुढची कामे ठप्प झाली आहेत. ज्या कालव्यांमध्ये पाणी सोडले जाते, त्याचे अस्तरीकरण झाले नसल्याने हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांचे नुकसान होत आहे. कागल आणि मुरगूड ग्रामीण रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारासाठी कोल्हापूरला जावे लागत आहे.तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचारी कार्यालयात पूर्णवेळ हजर नसतात. परिणामी, जनतेच्या कामांचा खेळखंडोबा आणि जनतेच्या पैशाचा दुरुपयोग होत असल्याचे तालुक्यात चित्र आहे.तालुक्यातील महत्त्वाच्या समस्यासरकारी गायराने, पाणंदीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे... दिवसेंदिवस वाढचमहसूल विभाग, सिटी सर्व्हे विभाग, रेशन धान्य विभागातील कामकाजाबद्दल जनतेमध्ये रोष, जाणीवपूर्वक दिरंगाईमुळे नागरिक वेठीस८६ पैकी केवळ ४२ गावांचाच सिटी सर्व्हेपंचायत समितीला नव्या प्रशासकीय इमारतीची गरजशेतकऱ्यांच्या रद्द झालेल्या कर्जमाफीमुळे शेतकरी आणि सेवा संस्था आर्थिक गर्तेत.बुडीत पतसंस्थांमध्ये लोकांचे कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत... कार्यवाही नाही.कागल तालुका कृषी विभागाला स्वत:चे जागा कार्यालय नाही.लिंगनूर, कापशी भागात स्वतंत्र पोलीस ठाण्याची गरज.कागल तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा चिंताजनक.कागल शहराच्या समस्याकागल शहरासाठी सुधारित विकास आराखडा हवाजयसिंगराव तलाव पाणलोट क्षेत्र निश्चितीकरणाचे काम रखडलेलेमहामार्ग चौपदरीकरणातील कामाच्या त्रुटीमुळे नागरिकांना त्रासकागल ग्रामीण रुग्णालयात अद्ययावतअपघात विभाग हवाकागल पोलीस ठाणे इतिहासकालीन इमारतीत, नव्या इमारतीची गरजमुरगूड शहराच्या समस्यामुरगूड शहराच्या हद्दवाढीची गरजशहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा (पिण्याच्या) यंत्रणेची गरजमुरगूड शहरात एकही बगिचा नाहीमुरगूड बसस्थानकाची दुरवस्था - स्वतंत्र डेपोची गरजतहसील कार्यालयातील प्रतिज्ञापत्रे मुरगूडमध्येच मिळावीतपाणी समस्या शेतीसाठीचीतालुक्याच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला नागनवाडी प्रकल्प ४५ टक्के काम झाल्यानंतर रखडला आहे. या प्रकल्पासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनावरून हे काम थांबले आहे.दूधगंगा प्रकल्पातून निढोरी शाखेतून निघालेले तीनही कालव्यांचे काम ठप्प आहे. काही ठिकाणी केवळ खोदाईच झालेली आहे, तर अस्तरीकरण नसल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे.शेती पंपाच्या वीजबिलाच्या आकारणीबद्दलही नाराजी.पाणी समस्या पिण्यासाठीचीगावागावांत नळपाणी पुरवठा योजना झाल्या आहेत; पण त्या दर्जेदार नाहीत. जलस्वराज्य प्रकल्पातील बहुतांश योजना कुचकामी, परिणामी पाणीपुरवठ्यावर परिणाम, दूषित पाण्याचा पुरवठा.ग्रामपंचायतींना पाणी योजना आणि रस्त्यावरील विजेची बिले भरणे अशक्य होत असल्याने वारंवार वीजपुरवठा तोडण्याचे प्रकार होतात.पंचतारांकित वसाहतीमध्ये नवीन प्रकल्प येईनात : दूधगंगा कालवा, नागनवाडी जलसिंचन प्रकल्पाचे कामही रखडलेजहाँगीर शेख ल्ल कागलतीन नद्यांचे वरदान लाभलेला कागल तालुका आज जिल्ह्यात सर्वाधिक जमीन सिंचनाखाली असलेला तालुका आहे. चार साखर कारखाने, दोन दूध संघ, पंचतारांकित औद्योगिक वसाहत, विविध शैक्षणिक केंद्रे, दळणवळणाच्या सुविधा यांनी तालुका आज प्रगतिपथावर आहे. मात्र, या प्रगतीबरोबरच काही समस्याही तितक्याच गंभीर झाल्या आहेत.येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे येथे जसा रोजगार निर्माण झाला, तसा परिसराचा सामाजिक बाजही बदलला आहे. कागल, कसबा सांगाव परिसरात त्याचे परिणाम दिसत आहेत. औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक आणि कामगारांना शासनाकडून सहकार्याची गरज आहे. नवे प्रकल्प येण्याचे प्रमाण मंदावले आहेत. नागनवाडी जलसिंचन प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना पर्यायी जमीन मिळाली नसल्याने गेली चार वर्षे या प्रकल्पाचे काम थांबलेले आहे. हीच अवस्था दूधगंगा प्रकल्पाच्या कालव्याची आहे. तालुक्यातील या कालव्याची खोदाई झाली; पण गेली दहा वर्षे पुढची कामे ठप्प झाली आहेत. ज्या कालव्यांमध्ये पाणी सोडले जाते, त्याचे अस्तरीकरण झाले नसल्याने हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांचे नुकसान होत आहे. कागल आणि मुरगूड ग्रामीण रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारासाठी कोल्हापूरला जावे लागत आहे.तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचारी कार्यालयात पूर्णवेळ हजर नसतात. परिणामी, जनतेच्या कामांचा खेळखंडोबा आणि जनतेच्या पैशाचा दुरुपयोग होत असल्याचे तालुक्यात चित्र आहे.