शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
4
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
5
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
6
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
7
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
8
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
9
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
10
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
11
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
12
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
13
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
14
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
15
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
16
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
17
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
18
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
19
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
20
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य

लालफितीत अडकला दगडखाण जमिनीचा प्रश्न

By admin | Updated: October 26, 2014 23:25 IST

४२ एकर जागेचा प्रश्न : जयसिंगपुरातील वडार समाजाला सरकारकडून अपेक्षा

संदीप बावचे- जयसिंगपूर -अनेक आंदोलने झाली, शासनाकडे पाठपुरावा केला; मात्र जयसिंगपुरातील वडार समाज उपेक्षितच राहिला आहे. दगड खाणीसाठी ४२ एकर जमीन मिळावी या मागणीसाठी गेल्या सात ते आठ वर्षांपासून लढाई सुरू आहे. शासनाच्या लालफितीच्या कारभारामध्ये जागेचा प्रश्न सुटलेला नाही. आता नवीन सरकारकडून वडार समाजाला अपेक्षा लागून राहिल्या आहेत. वडार समाजाला दगड खाणीतून रोजगार मिळावा, त्यांचे आर्थिक मागासलेपण कमी व्हावे यासाठी १९६३ मध्ये वडार समाज कामगार सोसायटीची स्थापना करण्यात आली. सोसायटीच्या माध्यमातून शहरात हा समाज व्यवसायाच्या निमित्ताने स्थिरावला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात प्रथमच मंजूर झालेल्या कॉरिझोन गट नंबर ३११ मधील २७५ एकरांपैकी ४२ एकर जमीन वडार समाजाच्या दगड खाणीसाठी मिळावी यासाठी गेल्या सात-आठ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. शासन व प्रशासन या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. यामुळे आता वडार समाजाने आंदोलनाचा निर्णय घेऊन जून २०१४ मध्ये जयसिंगपूर बंद, लाक्षणिक उपोषण करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकाऱ्यांसमवेत शिष्टमंडळाने भेटी घेऊन प्रश्न मार्गी लावण्याबाबत प्रयत्न झाले; मात्र वडार समाजाच्या वाट्याला उपेक्षाच आल्या. आंदोलनात लालबावटा बांधकाम व्यवसाय संघटना, दलित विकास परिषद, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हमाल संघटना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, लिंगायत धर्म महासभा, डीपीआय, किराणा दुकान असोसिएशन, दलित सेना, आम आदमी पार्टी आदींनी वडार समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.प्रश्न न मिटल्याने वडार समाजासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न आवासून उभा आहे. खडी फोडून पोटाची खळगी भरणाऱ्या वडार समाजावर शासनाकडून अन्याय होत आहे. शहरातील दहा हजार वडार समाजातील लोकांना स्थलांतरित व्हावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ही जमीन मिळावी या करिता प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी या समाजाला लोकप्रतिनिधींकडून आश्वासने मिळाली आहेत. एकूणच गेल्या सात-आठ वर्षांपासून मार्गी न लागलेला हा प्रश्न येणाऱ्या नव्या सरकारकडून तरी सुटेल का, अशी अपेक्षा वडार समाजाला लागून राहिली आहे.प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेतवडार समाजाने आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही जमीन लिलाव पद्धतीने देण्याबाबत भूमिका घेण्यात आली होती. याबाबतचा प्रस्तावही पुणे आयुक्तांमार्फत मंत्रालयात पाठविण्यात आला आहे. लिलाव पद्धतीनेच वडार समाजाला ही जमीन मिळण्याची शक्यता आहे. असे असले तरी हा प्रस्तावदेखील मंजुरीसाठी मंत्रालयातच अडकला आहे.