शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

लालफितीत अडकला दगडखाण जमिनीचा प्रश्न

By admin | Updated: October 26, 2014 23:25 IST

४२ एकर जागेचा प्रश्न : जयसिंगपुरातील वडार समाजाला सरकारकडून अपेक्षा

संदीप बावचे- जयसिंगपूर -अनेक आंदोलने झाली, शासनाकडे पाठपुरावा केला; मात्र जयसिंगपुरातील वडार समाज उपेक्षितच राहिला आहे. दगड खाणीसाठी ४२ एकर जमीन मिळावी या मागणीसाठी गेल्या सात ते आठ वर्षांपासून लढाई सुरू आहे. शासनाच्या लालफितीच्या कारभारामध्ये जागेचा प्रश्न सुटलेला नाही. आता नवीन सरकारकडून वडार समाजाला अपेक्षा लागून राहिल्या आहेत. वडार समाजाला दगड खाणीतून रोजगार मिळावा, त्यांचे आर्थिक मागासलेपण कमी व्हावे यासाठी १९६३ मध्ये वडार समाज कामगार सोसायटीची स्थापना करण्यात आली. सोसायटीच्या माध्यमातून शहरात हा समाज व्यवसायाच्या निमित्ताने स्थिरावला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात प्रथमच मंजूर झालेल्या कॉरिझोन गट नंबर ३११ मधील २७५ एकरांपैकी ४२ एकर जमीन वडार समाजाच्या दगड खाणीसाठी मिळावी यासाठी गेल्या सात-आठ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. शासन व प्रशासन या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. यामुळे आता वडार समाजाने आंदोलनाचा निर्णय घेऊन जून २०१४ मध्ये जयसिंगपूर बंद, लाक्षणिक उपोषण करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकाऱ्यांसमवेत शिष्टमंडळाने भेटी घेऊन प्रश्न मार्गी लावण्याबाबत प्रयत्न झाले; मात्र वडार समाजाच्या वाट्याला उपेक्षाच आल्या. आंदोलनात लालबावटा बांधकाम व्यवसाय संघटना, दलित विकास परिषद, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हमाल संघटना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, लिंगायत धर्म महासभा, डीपीआय, किराणा दुकान असोसिएशन, दलित सेना, आम आदमी पार्टी आदींनी वडार समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.प्रश्न न मिटल्याने वडार समाजासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न आवासून उभा आहे. खडी फोडून पोटाची खळगी भरणाऱ्या वडार समाजावर शासनाकडून अन्याय होत आहे. शहरातील दहा हजार वडार समाजातील लोकांना स्थलांतरित व्हावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ही जमीन मिळावी या करिता प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी या समाजाला लोकप्रतिनिधींकडून आश्वासने मिळाली आहेत. एकूणच गेल्या सात-आठ वर्षांपासून मार्गी न लागलेला हा प्रश्न येणाऱ्या नव्या सरकारकडून तरी सुटेल का, अशी अपेक्षा वडार समाजाला लागून राहिली आहे.प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेतवडार समाजाने आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही जमीन लिलाव पद्धतीने देण्याबाबत भूमिका घेण्यात आली होती. याबाबतचा प्रस्तावही पुणे आयुक्तांमार्फत मंत्रालयात पाठविण्यात आला आहे. लिलाव पद्धतीनेच वडार समाजाला ही जमीन मिळण्याची शक्यता आहे. असे असले तरी हा प्रस्तावदेखील मंजुरीसाठी मंत्रालयातच अडकला आहे.