शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

लालफितीत अडकला दगडखाण जमिनीचा प्रश्न

By admin | Updated: October 26, 2014 23:25 IST

४२ एकर जागेचा प्रश्न : जयसिंगपुरातील वडार समाजाला सरकारकडून अपेक्षा

संदीप बावचे- जयसिंगपूर -अनेक आंदोलने झाली, शासनाकडे पाठपुरावा केला; मात्र जयसिंगपुरातील वडार समाज उपेक्षितच राहिला आहे. दगड खाणीसाठी ४२ एकर जमीन मिळावी या मागणीसाठी गेल्या सात ते आठ वर्षांपासून लढाई सुरू आहे. शासनाच्या लालफितीच्या कारभारामध्ये जागेचा प्रश्न सुटलेला नाही. आता नवीन सरकारकडून वडार समाजाला अपेक्षा लागून राहिल्या आहेत. वडार समाजाला दगड खाणीतून रोजगार मिळावा, त्यांचे आर्थिक मागासलेपण कमी व्हावे यासाठी १९६३ मध्ये वडार समाज कामगार सोसायटीची स्थापना करण्यात आली. सोसायटीच्या माध्यमातून शहरात हा समाज व्यवसायाच्या निमित्ताने स्थिरावला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात प्रथमच मंजूर झालेल्या कॉरिझोन गट नंबर ३११ मधील २७५ एकरांपैकी ४२ एकर जमीन वडार समाजाच्या दगड खाणीसाठी मिळावी यासाठी गेल्या सात-आठ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. शासन व प्रशासन या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. यामुळे आता वडार समाजाने आंदोलनाचा निर्णय घेऊन जून २०१४ मध्ये जयसिंगपूर बंद, लाक्षणिक उपोषण करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकाऱ्यांसमवेत शिष्टमंडळाने भेटी घेऊन प्रश्न मार्गी लावण्याबाबत प्रयत्न झाले; मात्र वडार समाजाच्या वाट्याला उपेक्षाच आल्या. आंदोलनात लालबावटा बांधकाम व्यवसाय संघटना, दलित विकास परिषद, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हमाल संघटना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, लिंगायत धर्म महासभा, डीपीआय, किराणा दुकान असोसिएशन, दलित सेना, आम आदमी पार्टी आदींनी वडार समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.प्रश्न न मिटल्याने वडार समाजासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न आवासून उभा आहे. खडी फोडून पोटाची खळगी भरणाऱ्या वडार समाजावर शासनाकडून अन्याय होत आहे. शहरातील दहा हजार वडार समाजातील लोकांना स्थलांतरित व्हावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ही जमीन मिळावी या करिता प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी या समाजाला लोकप्रतिनिधींकडून आश्वासने मिळाली आहेत. एकूणच गेल्या सात-आठ वर्षांपासून मार्गी न लागलेला हा प्रश्न येणाऱ्या नव्या सरकारकडून तरी सुटेल का, अशी अपेक्षा वडार समाजाला लागून राहिली आहे.प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेतवडार समाजाने आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही जमीन लिलाव पद्धतीने देण्याबाबत भूमिका घेण्यात आली होती. याबाबतचा प्रस्तावही पुणे आयुक्तांमार्फत मंत्रालयात पाठविण्यात आला आहे. लिलाव पद्धतीनेच वडार समाजाला ही जमीन मिळण्याची शक्यता आहे. असे असले तरी हा प्रस्तावदेखील मंजुरीसाठी मंत्रालयातच अडकला आहे.