शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

ग्रामीण भागात दुर्गंधीयुक्त गटारींचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विक्रम पाटील करंजफेण : स्वच्छ भारत अभियान योजनेंतर्गत ग्रामीण खेडी स्वच्छ समृद्ध होऊन लोकांचे आरोग्य निरोगी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विक्रम पाटील

करंजफेण : स्वच्छ भारत अभियान योजनेंतर्गत ग्रामीण खेडी स्वच्छ समृद्ध होऊन लोकांचे आरोग्य निरोगी राहावे या हेतूने गाव विकासासाठी शासन लाखोंचा निधी खर्च करूनदेखील गावोगावी गटारींचा प्रश्न जैसै थे अवस्थेत असल्याचे विदारक चित्र निर्माण होऊ लागले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे.

प्रतिवर्षी शासनाचा ग्रामपंचायतींना येणारा वित्त आयोगाचा निधी, जिल्हा परिषद, पंचायत समितीकडून येणारा निधी यातील बहुतांश निधीची रक्कम ही गटारी बांधकामावर खर्च केली जात असल्याचे वास्तव आहे. गावोगावी गल्लीबोळांतील गटारी बांधकाम करण्यावर वर्षानुवर्षे शासनाचा लाखोंचा निधी खर्च होत असतो. गटारीमध्ये पावसाळ्यात साचलेला गाळ, नियमित पडणारा कचरा काढण्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या गटारी अनेक गावात जमिनीत गाडल्या गेल्या असून त्यावरून गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याचे वास्तव चित्र आहे, तर गल्लीबोळांतील गटारींमध्ये स्वच्छतेच्या अभावामुळे दुर्गंधी पसरण्याबरोबर डासांच्या उत्पत्तीत वाढ होऊन मलेरियासारखे जीवघेणे आजार बळावत आहेत. त्यामुळे खेडी स्वच्छ व निरोगी राहण्यासाठी ग्रामपंचायतीने गटारी बांधकामावर खर्च करण्याबरोबर स्वच्छ व वाहत्या गटारी राखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

कोट...

बहुतांश गावांमध्ये गटारी तुंबलेल्या दिसून येतात. त्यामुळे गावोगावी दुर्गंधीचे प्रमाण वाढले असून, आरोग्याच्या दृष्टीने ही धोक्याची बाब आहे. ग्रामपंचायतीने वेळोवेळी स्वच्छता ठेवण्याची आवश्यकता आहे.

शिवाजी यादव

उंड्री,(ता.पन्हाळा)

फोटो : ग्रामीण भागामध्ये गटारींच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.