शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री सुरक्षा योजनेत दहा लाखांवर खाती

By admin | Updated: June 14, 2016 00:18 IST

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : वारसांना अडीच कोटींची मदत; बचत गटासाठी प्रशिक्षण

कोल्हापूर : प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि अटल विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात १० लाख ८ हजार ६७१ खाती उघडण्यात आली असून, यापुढील काळात सर्व बँकांनी या विमा योजनांतर्गत अधिकाधिक खाती उघडण्यात सक्रिय पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी शुक्रवारी केले.जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी सैनीबोलत होते. बैठकीस आमदार डॉ. सुजित मिणचेकर, रिझर्व्ह बँकेचे सहायक महाप्रबंधक पी. एस. पराटे, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू नाईक, बँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक बी. के. आरसेकर, जिल्हा मध्यवर्र्ती बँकेचे कार्यकारी संचालक प्रतापसिंह चव्हाण, प्रकल्प संचालक डॉ. हरीश जगताप, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक एम. जी. कुलकर्र्णी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व बॅँकांचे जिल्हा समन्वयक आणि अन्य विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ५१ हजार ७४० खाती उघडण्यात आली. मार्च २०१६ अखेर १२ दावे मंजूर करण्यात आले. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत तीन लाख ४७ हजार १८९ खाती उघडण्यात आली. आतापर्यंत ११३ दावे मंजूर करून संबंधितांच्या वारसांना अडीच कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले. या योजनांच्या नूतनीकरणाचे काम सर्व बँकांमध्ये सुरू असून, खातेदारांनी आपल्या बचत खात्यामध्ये पुरेशी शिल्लक ठेवून विमा योजनांचे नूतनीकरण करावे. जीवन ज्योती योजनेत दावा पात्रता ही ४५ दिवसांची करण्यात आल्याने पॉलिसी सुरू झाल्यापासून ४५ दिवसांनंतर दावा मंजूर करण्यात येईल. या सर्व योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी अधिकाधिक बचत गटांना यात सामावून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सैनी यांनी केले. अटल विमा योजनेंतर्गत ९ हजार ७४२ खाती उघडण्यात आली. याबरोबरच पंतप्रधान जन-धन योजनेंतर्गत जिल्ह्यात ५ लाख १३ हजार ८५४ खाती उघडण्यात आली. ३ लाख ६२ हजार ३१६ खात्यांसाठी रूपे कार्ड प्रदान करण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील उद्योजकांना २३ हजार २७१ खात्यांमध्ये अर्थसाहाय्य करण्यात आले. यामध्ये शिशू योजनेंतर्गत १९ हजार ८२० खात्यांमध्ये किशोर योजनेंतर्गत २ हजार ७५१ खात्यांमध्ये आणि तरुण योजनेंतर्गत ७०० खात्यांमध्ये अर्थसाहाय्य करण्यात आले. जिल्ह्यात बचत गटांच्या महिलांसाठी आर-सेटी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले असून, या केंद्रामार्फत २०१५-१६ मध्ये घेण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.बँकांतील ठेवींमध्ये १२०० कोटींची वाढ अग्रणी जिल्हा व्यवस्थापक एम. जी. कुलकर्र्णी यांनी सांगितले की जिल्ह्यातील प्राथमिकता सेवा क्षेत्राकरिता ५०४० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला. मार्च २०१६ साठी दिलेल्या उद्दिष्टाच्या ५१२४.६४ कोटींचा वित्तपुरवठा प्राथमिकता क्षेत्राकरिता जिल्ह्यातील सर्व बँकांनी केला. या वर्षामध्ये जिल्ह्यातील सर्व बॅँकांच्या ठेवींमध्ये एक हजार १९६ कोटी वाढ होऊन त्या १९ हजार ३९१ कोटी इतक्या झाल्या आहेत. कर्जामध्ये ९६३ कोटींची वाढ होऊन जिल्ह्यामध्ये प्राथमिकता क्षेत्रासाठी दिलेल्या कर्जाची रक्कम १५ हजार ७६९ कोटी इतकी झाली. सन २०१६-१७ करिता वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला असून, त्यामध्ये पीककर्जासाठी २ हजार ६८८ कोटी इतके उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले. आर्थिक साक्षरता केंद्रकोल्हापूरमध्ये आर्थिक साक्षरता केंद्र स्थापन करण्यात आले असून, या केंद्रामार्फत वेगवेगळ्या गावांमध्ये बँकिंग साक्षरतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आर्थिक साक्षरतेसाठी महिन्यातून किमान एकवेळ ग्रामीण भागात कार्यक्रम घेणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी सैनी यांनी यावेळी स्पष्ट केले.