शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळमुक्ती, शेतकरी सक्षमीकरणाला प्राधान्य

By admin | Updated: March 23, 2017 00:35 IST

अर्थसंकल्पावरील चर्चासत्र : विविध तरतुदींबाबत तज्ज्ञांनी मांडली व्यापक मते

कोल्हापूर : शेती, दुष्काळ, पायाभूत सुविधा यासारख्या प्रश्नांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करणारा हा अर्थसंकल्प आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दीर्घकालीन उपाययोजनेद्वारे सक्षम आणि दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने यंदाच्या अर्थसंकल्पात शासनाने ठोस पावले उचलली आहेत. कर्जमाफी करण्यापेक्षा शेतकरी कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्यासाठी शेती सिंचन, कौशल्य विकास, रस्ते विकास अशा पायाभूत सुविधांसाठी तरतूद केली आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी शाहू स्मारक भवन येथे ‘अर्थसंकल्प राज्याचा, संकल्प विकासाचा’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. डॉ. विजय ककडे, भारती विद्यापीठाच्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. नितीन नायक, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक जॉर्ज क्रुझ यांनी सहभाग घेतला.विजय ककडे म्हणाले, सामाजिक न्याय, रोजगार, शिक्षण, ग्रामीण विकास, वैद्यकीय सेवा, पर्यावरण, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांना वाव देणाऱ्या या अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा मोह टाळत महागाई कमी करण्यासाठी हातभार लावणारा आणि कर्जमाफीबाबत अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली आहे. डॉ. नितीन नायक म्हणाले, अर्थसंकल्पात उच्चशिक्षणासाठी भरीव तरतूद अपेक्षित होती. प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रमावर दिलेला भरमहत्त्वाचा आहे. ललित गांधी म्हणाले, व्यापार उद्योगाच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तरतूद होणे गरजेचे आहे.दशरथ पारेकर म्हणाले, अर्थसंकल्प सामान्य माणसाला समजेल, असा सोपा सुटसुटीत करण्याची पद्धती यंदाच्या अर्थसंकल्पात दिसत आहे. जॉर्ज क्रुझ म्हणाले, शिक्षण, सामाजिक न्याय यासारख्या क्षेत्रामध्ये शासन भरीव तरतूद करत असले तरी हा निधी संपूर्णपणे खर्च करण्याची जबाबदारी प्रशासनाने घेतली पाहिजे. माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी चर्चासत्राची रूपरेषा विशद केली. एस. आर. माने यांनी स्वागत केले. जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी परिचय करून दिला. माहिती सहायक अर्चना माने यांनी आभार व्यक्त केले. या कार्यशाळेस वृत्तपत्र विद्याविभागाचे माजी प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित, गोविंद गोडबोले तसेच वृत्तपत्रांचे, माध्यमांचे प्रतिनिधी, आदी उपस्थित होते...तर तूट होणार नाहीयावेळी ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई यांनी विचारलेल्या धार्मिक स्थळांचे राष्ट्रीयीकरण करता येईल का, या प्रश्नावर विजय ककडे म्हणाले, सर्वच जाती-धर्माच्या धर्मस्थळांचा पैसा व्यवहारात आला तर पुढची पाच वर्षे शासनाचा अर्थसंकल्प तुटीशिवाय सादर होईल. शेतकरी मरताहेत, दुसरीकडे धर्मनिरपेक्ष म्हणविणाऱ्या देशात शाळांना छप्पर नाही व धार्मिक स्थळांना संगमरवरी फरशी चकाचक केले जाते. याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.